शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

इस मिट्टी में कमल नहीं खिलता.!

By meghana.dhoke | Updated: March 3, 2018 20:07 IST

31 जुलै 2015 रोजी भारत-बांग्लादेश सीमा करार अमलात आला. रक्ताचा एकही थेंब न सांडता दोन देशांनी शांतपणे आपल्या सीमा आखून घेतल्या.

साधीशी, सुती, धुवट साडी नेसलेल्या या बाई. पांचाली भट्टाचार्य त्यांचं नाव.निवृत्त शिक्षिका आहेत. त्रिपुराची राजधानी आगतरळ्यात राहतात. ही त्यांची एक ओळख. आता अजून एक ओळख सांगते..त्या आहेत मिसेस माणिक सरकार. 15 वर्षे त्रिपुराचे मुख्यमंत्री असलेल्या माणिक सरकार यांच्या पत्नी. त्यांनी ना आपलं आडनाव बदललं, ना मिसेस सरकार म्हणून त्या कधी लाल दिव्याच्या गाडीतून मिरवल्या.त्यांची ही भेट. 29 जुलै 2015.31 जुलै 2015 रोजी भारत-बांग्लादेश सीमा करार अमलात आला. रक्ताचा एकही थेंब न सांडता दोन देशांनी शांतपणे आपल्या सीमा आखून घेतल्या. आंतरराष्ट्रीय सीमा बदलतात तेव्हा सीमेवर जगणाऱ्या माणसांचं काय होतं याचा अभ्यास करायचा म्हणून मी त्रिपुराला गेले होते. ( लोकमत दीपोत्सव 2015 मध्ये ‘तारकाटा बेडा’ हा लेखही प्रसिद्ध झाला.) आगरतळ्यात होतेच, तर दैनिक संबांद या वृत्तपत्राच्या कार्यालयात गेले. तिथं वृत्तसंपादक भौमिक भेटले. त्यादिवशी सकाळीच मुख्यमंत्र्यांनाही भेटून आले होते. सकाळी गेले, भेट मागितली. सहज भेट मिळाली. संध्याकाळी 7 ला या असं सचिवांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांना भेटूनच दैनिक संबादच्या कार्यालयात गेले होते. बोलता बोलता विषय निघाला तर भौमिक म्हणाले, ‘बहुदीसे मिले?’ काही कळलं नाही, मग तेच म्हणाले, मिसेस सरकार? आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असं कुणालाही कसं भेटतील? तर ते म्हणाले, मै फोन लगाता...बोलणं झालं. त्या या म्हणाल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री निवासात त्यांना भेटायला गेले. सोबत भौमिक होतेच. गेल्या गेल्या बहुदींनी विचारलं, बेटे को साथ नहीं लाए?मी उडालेच. मी मुलाला घेऊन आगरतळ्याला आलेय, हे ह्यांना कसं कळलं. सहज विचारलं, आपको कैसे मालूम?त्या म्हणाल्या, कल रात सीएमसे बोला एक मुंबईसे जर्नलिस्ट आयी है, सुबह मिलने आ रही है. तो उन्होने बताया, बॉर्डर स्टडी करने आयी है, छोटा बच्चा है साथ में. कुछ खास बनाना.’मी स्तब्धच. तेवढ्यात इडली-सांबार-चटणी, बंगाली मिठाई आलीही. बहुदी म्हणाल्या, इधर का खाना अच्छा लगा नहीं होगा, तो मैनेही रात में सोचा आपके लिए इडली बनाए.’बहुदींनी स्वत: सकाळी उठून इडली केली. मुख्यमंत्री असलेल्या नवर्‍याला ऑफिसला जाताना डबा करुन दिला. मग त्या सगळं किचन आवरुन बसल्या होत्या. बरंच बोलणं झालं, बोलता बोलता सहज म्हणाल्याही, अभी पॉवर है बहौत साल से, तो कुछ लोग उसका गलत इस्तेमाल करते है. ये बुरा लगता है.तोवर मी ते साधंसं घर पाहत होते. एक बेडरुम. हॉल. किचन. बाकी सगळी पुस्तकं. हे दोघे पतीपत्नी घर म्हणून एवढय़ाच खोल्या वापरतात. मुलबाळ नाही, दोघंच राहतात. सगळंच साधं. मध्यमवर्गीय. म्हणजे त्या साधेपणाची जाणीवही होऊ नये इतकं साधं. बहुदी स्वत: मासे आणायला जातात, कधी लाल दिव्याची गाडी वापरत नाहीत, सिक्युरीटी नाही, रिक्षेतूनच प्रवास. फक्त प्रोटोकॉल असेल तेव्हा मुख्यमंत्र्यासोबत जातात. हे एरव्ही त्रिपुरात अनेकजण सांगतातच.त्यादिवशी घरी माहेरपणाला आलेल्या लेकीसारखं त्यांनी आगतस्वागत केलं. निघाले तर थेट रस्त्यार्पयत लांब सोडायला आल्या. पुढच्यावेळी लेकाला नक्की घेऊन ये म्हणाल्या.मात्र आम्ही निघतच होतो, तर बंगल्याच्या आवारातल्या बागेत माळी काम करत होता, बहुदीचं त्याच्याशी बंगालीतून बोलणं सुरु होतं. तळ्यात कमळं कशी फुलत नाही, हे तो माळी सांगत होता. त्यावर मी हसले तर त्या म्हणाल्या, बंगाली समझती हे?-थोडीसी. मी म्हटलं.तर त्या हसून म्हणाल्या, कितनी भी कोशीश करलो..इस मिट्टी में कमल नहीं खिलता.!***जुलै 2015 ची ही गोष्ट. दिल्लीत मोदी पंतप्रधान होऊन जेमतेम वर्ष झालं होतं. सुनील देवधरही नुकतेच त्रिपुरा भाजपचे प्रभारी झाले होते. दुसर्‍या दिवशी देवधर आणि आता मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले बिपलब देबही भेटलेच, तेव्हा तर त्रिपुरात कमळ फुलेल असं काही चित्रही नव्हतं. तीन वर्षात सुनील देवधर नावाच्या मराठी माळ्यानं तिथं कमळ फुलवून दाखवलं, त्रिपुरातल्या मातीचा कस बदलला, हवा पालटली.ती कशामुळे.?-त्याविषयी पुढच्या भागात