शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

इस मिट्टी में कमल नहीं खिलता.!

By meghana.dhoke | Updated: March 3, 2018 20:07 IST

31 जुलै 2015 रोजी भारत-बांग्लादेश सीमा करार अमलात आला. रक्ताचा एकही थेंब न सांडता दोन देशांनी शांतपणे आपल्या सीमा आखून घेतल्या.

साधीशी, सुती, धुवट साडी नेसलेल्या या बाई. पांचाली भट्टाचार्य त्यांचं नाव.निवृत्त शिक्षिका आहेत. त्रिपुराची राजधानी आगतरळ्यात राहतात. ही त्यांची एक ओळख. आता अजून एक ओळख सांगते..त्या आहेत मिसेस माणिक सरकार. 15 वर्षे त्रिपुराचे मुख्यमंत्री असलेल्या माणिक सरकार यांच्या पत्नी. त्यांनी ना आपलं आडनाव बदललं, ना मिसेस सरकार म्हणून त्या कधी लाल दिव्याच्या गाडीतून मिरवल्या.त्यांची ही भेट. 29 जुलै 2015.31 जुलै 2015 रोजी भारत-बांग्लादेश सीमा करार अमलात आला. रक्ताचा एकही थेंब न सांडता दोन देशांनी शांतपणे आपल्या सीमा आखून घेतल्या. आंतरराष्ट्रीय सीमा बदलतात तेव्हा सीमेवर जगणाऱ्या माणसांचं काय होतं याचा अभ्यास करायचा म्हणून मी त्रिपुराला गेले होते. ( लोकमत दीपोत्सव 2015 मध्ये ‘तारकाटा बेडा’ हा लेखही प्रसिद्ध झाला.) आगरतळ्यात होतेच, तर दैनिक संबांद या वृत्तपत्राच्या कार्यालयात गेले. तिथं वृत्तसंपादक भौमिक भेटले. त्यादिवशी सकाळीच मुख्यमंत्र्यांनाही भेटून आले होते. सकाळी गेले, भेट मागितली. सहज भेट मिळाली. संध्याकाळी 7 ला या असं सचिवांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांना भेटूनच दैनिक संबादच्या कार्यालयात गेले होते. बोलता बोलता विषय निघाला तर भौमिक म्हणाले, ‘बहुदीसे मिले?’ काही कळलं नाही, मग तेच म्हणाले, मिसेस सरकार? आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असं कुणालाही कसं भेटतील? तर ते म्हणाले, मै फोन लगाता...बोलणं झालं. त्या या म्हणाल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री निवासात त्यांना भेटायला गेले. सोबत भौमिक होतेच. गेल्या गेल्या बहुदींनी विचारलं, बेटे को साथ नहीं लाए?मी उडालेच. मी मुलाला घेऊन आगरतळ्याला आलेय, हे ह्यांना कसं कळलं. सहज विचारलं, आपको कैसे मालूम?त्या म्हणाल्या, कल रात सीएमसे बोला एक मुंबईसे जर्नलिस्ट आयी है, सुबह मिलने आ रही है. तो उन्होने बताया, बॉर्डर स्टडी करने आयी है, छोटा बच्चा है साथ में. कुछ खास बनाना.’मी स्तब्धच. तेवढ्यात इडली-सांबार-चटणी, बंगाली मिठाई आलीही. बहुदी म्हणाल्या, इधर का खाना अच्छा लगा नहीं होगा, तो मैनेही रात में सोचा आपके लिए इडली बनाए.’बहुदींनी स्वत: सकाळी उठून इडली केली. मुख्यमंत्री असलेल्या नवर्‍याला ऑफिसला जाताना डबा करुन दिला. मग त्या सगळं किचन आवरुन बसल्या होत्या. बरंच बोलणं झालं, बोलता बोलता सहज म्हणाल्याही, अभी पॉवर है बहौत साल से, तो कुछ लोग उसका गलत इस्तेमाल करते है. ये बुरा लगता है.तोवर मी ते साधंसं घर पाहत होते. एक बेडरुम. हॉल. किचन. बाकी सगळी पुस्तकं. हे दोघे पतीपत्नी घर म्हणून एवढय़ाच खोल्या वापरतात. मुलबाळ नाही, दोघंच राहतात. सगळंच साधं. मध्यमवर्गीय. म्हणजे त्या साधेपणाची जाणीवही होऊ नये इतकं साधं. बहुदी स्वत: मासे आणायला जातात, कधी लाल दिव्याची गाडी वापरत नाहीत, सिक्युरीटी नाही, रिक्षेतूनच प्रवास. फक्त प्रोटोकॉल असेल तेव्हा मुख्यमंत्र्यासोबत जातात. हे एरव्ही त्रिपुरात अनेकजण सांगतातच.त्यादिवशी घरी माहेरपणाला आलेल्या लेकीसारखं त्यांनी आगतस्वागत केलं. निघाले तर थेट रस्त्यार्पयत लांब सोडायला आल्या. पुढच्यावेळी लेकाला नक्की घेऊन ये म्हणाल्या.मात्र आम्ही निघतच होतो, तर बंगल्याच्या आवारातल्या बागेत माळी काम करत होता, बहुदीचं त्याच्याशी बंगालीतून बोलणं सुरु होतं. तळ्यात कमळं कशी फुलत नाही, हे तो माळी सांगत होता. त्यावर मी हसले तर त्या म्हणाल्या, बंगाली समझती हे?-थोडीसी. मी म्हटलं.तर त्या हसून म्हणाल्या, कितनी भी कोशीश करलो..इस मिट्टी में कमल नहीं खिलता.!***जुलै 2015 ची ही गोष्ट. दिल्लीत मोदी पंतप्रधान होऊन जेमतेम वर्ष झालं होतं. सुनील देवधरही नुकतेच त्रिपुरा भाजपचे प्रभारी झाले होते. दुसर्‍या दिवशी देवधर आणि आता मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले बिपलब देबही भेटलेच, तेव्हा तर त्रिपुरात कमळ फुलेल असं काही चित्रही नव्हतं. तीन वर्षात सुनील देवधर नावाच्या मराठी माळ्यानं तिथं कमळ फुलवून दाखवलं, त्रिपुरातल्या मातीचा कस बदलला, हवा पालटली.ती कशामुळे.?-त्याविषयी पुढच्या भागात