शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

प्रभुंच्या रेल्वे बजेटला राजकिय वर्तुळातून समिश्र पतिसाद

By admin | Updated: February 25, 2016 20:12 IST

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज (गुरुवार) लोकसभेत आपला दुसरा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. त्यावर विरेधी पक्षाकडून आणि सत्ताधारी पक्षाकडून विविध प्रतिक्रिया आल्या

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज (गुरुवार) लोकसभेत आपला दुसरा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. त्यावर विरोधी पक्षाकडून आणि सत्ताधारी पक्षाकडून विविध प्रतिक्रिया आल्या. त्यामधील काही राजकीय लोकांनी अर्थसंकल्प चांगला आहे असे म्हटले तर काही जण नाराज दिसून आले. काही दिग्गज राजकिय नेत्यानी दिलेल्या प्रतिक्रिया खालिलप्रमाणे आहेत.
 
अमित शहा, भाजपचे अध्यक्ष - 
आजारी आणि दिव्यांग प्रवाशांकडे विशेष लक्ष देतानाच महिलांना कोट्यात आरक्षण देण्यात आले आहे. बंदरे रेल्वेने जोडण्यात आल्यामुळे उद्योग आणि निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. ईशान्य आणि जम्मू-काश्मीरच्या सीमेपर्यंत रेल्वे पोहोचविण्याचे लक्ष्य म्हणजे विशेष पाऊल ठरते.
 
नितीशकुमार, बिहारचे मुख्यमंत्री -
रेल्वे अर्थसंकल्प निराशाजनक असून त्यात स्वच्छता, सुरक्षा आणि रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत ठोस असे काहीही नाही. जागतिक बाजारात तेलाच्या किमती घसरल्या असून डिझेलचा सर्वाधिक वापर करणाऱ्या रेल्वेने प्रवास आणि मालभाडे कमी करायला हवे होते.
 
जयललिता, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री - 
रेल्वे अर्थसंकल्प तामिळनाडूतील जनतेच्या अपेक्षाला उतरू शकला नाही. चेन्नईत रेल्वे आॅटो हब तसेच प्रवासभाडे वाढ न करण्यासारख्या काही घोषणा चांगल्या आहेत. चेन्नईच्या आॅटो हबमुळे उत्पादन केंद्र बनलेल्या प्रमुख शहरांमध्ये चेन्नईला स्थान मिळेल.
 
वसुंधरा राजे, राजस्थानच्या मुख्यमंत्री -
रेल्वेचा कायापालट घडवून आणण्याच्या दिशेने ठोस पाऊल सिद्ध होईल. यापूर्वीच्या सरकारच्या तुुलनेत या रेल्वे अर्थसंकल्पात राजस्थानसाठीच्या निधीत सरासरी १८६ टक्के वाढ झाली आहे.
 
रमणसिंग, छत्तीसगडचे मुख्यमंत्री.
तीन नवे रेल्वे कॉरिडॉर छत्तीसगडमधून जात आहेत. राज्य सरकारने दिलेल्या सर्व प्रस्तावांना रेल्वे अर्थसंकल्पात स्थान देण्यात आल्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानतो.
 
राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात संपूर्ण देशाची घोर निराशा केली आहे. पोकळ अर्थसंकल्प पाहता रेल्वेला प्रभुंच्या कर्तबगारीवर नव्हे तर ‘प्रभू’कृपेवरच विसंबून रहावे लागेल.महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून मोठी अपेक्षा होती. पण राज्यातील प्रलंबीत रेल्वे प्रकल्पांबाबत भरीव निर्णय झालेले नाहीत. 
 
खा. अशोक चव्हाण, महाराष्ट्र, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना करण्याऐवजी शब्दांचा खेळ करून जुन्याच योजना नव्या रूपात मांडण्यात आल्या आहेत.त्यांचा पहिला अर्थसंकल्प दिशाहिन होता आणि दुदैर्वाने दुसरा अर्थसंकल्पदेखील अपेक्षाभंग करणारा ठरला आहे.
 
धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र, विधान परिषद
मागील २-३ वर्षांचे आणि यावर्षीचे बजेट पाहता यात नवीन काहीच नाही: हे बजेट म्हणजे जुन्याच कढीला ऊत असून फक्त वाय फाय देणारे बजेट आहे. रेल्वे मंत्री राज्याचे असल्याने महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा होत्या; मात्र राज्याला दिलासा देणारी एक ही मोठी बाब अर्थसंकल्पात नाही.
 
सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्रराज्य
वनपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी बजेटमध्ये प्रस्तावित केलेल्या संपूर्ण पॅकेज टूर यात्रेचे स्वागत आहे. या नवीन संकल्पनेमुळे राज्यातील वन पर्यटनात मोठी भर पडेल. प्रभू यांनी व्याघ्र संवर्धनाच्यादृष्टीने जनजागृती करण्यासाठी एक संपूर्ण पॅकेज टूर यात्रा रेल्वे अर्थसंकल्पात प्रस्तावित केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पेंच अभयारण्याचा त्यांनी समावेश केला आहे. 
 
विनोद तावडे, महाराष्ट्र, शिक्षण मंत्री व मुंबई पालकमंत्री
सर्वसामान्यांसाठी ‘सुपर फास्ट’ असा रेल्वे अर्थसंकल्प आहे. प्रवास भाड्यात कोणतीही वाढ न करुन देशातील जनतेला प्रभु यांनी मोठा दिलासा दिला आहे. मुंबईकर आणि आसपासच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि नजिकच्या काळात त्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल.