शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

संपाच्या नावावर ग्राहकांची लूट; भाज्या कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 05:39 IST

देशव्यापी शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवक काहीशी घटली. याचा फायदा उचलत किरकोळ बाजारात छोट्या व्यापा-यांनी भाज्यांचे दर वाढविले. ग्राहकांच्या खिशाला यामुळे चाट बसली.

मुंबई : देशव्यापी शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवक काहीशी घटली. याचा फायदा उचलत किरकोळ बाजारात छोट्या व्यापा-यांनी भाज्यांचे दर वाढविले. ग्राहकांच्या खिशाला यामुळे चाट बसली. मुंबई, ठाणे आदी महानगरांमध्ये संपाच्या पहिल्या दोन दिवसांतच भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत.राज्यात शेतक-यांनी दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून आंदोलन सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी १,५०६ वाहनांमधून कृषिमाल विक्रीसाठी आला होता. त्यात सातारा, सांगली, पुणे व नाशिक परिसरामधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आला. मुंबईत टंचाई नसली, तरी किरकोळ व्यापाºयांनी भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढविले.जळगाव बाजार समितीत टॉमेटोचे भाव दुप्पट तर मिरचीचे दीडपटीने वाढले. ४०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या टॉमेटोचे भाव एक हजार ते दीड हजार व हिरवी मिरची १,५०० वरून २,००० ते २,५०० रुपयांवर गेली. नाशिक व अहमदनगरमध्ये शेतकºयांनी कांदा व दूध रस्त्यावर ओतले. कोल्हापूर बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली.७ जूनपासून शहरांची रसद तोडणार७ जूनपासून शहरांचा भाजीपाला व दूध पुरवठा थांबविणार असल्याचे किसान संघर्ष समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.शेतकरी संपाला संघर्ष समितीचा पाठिंबा किंवा विरोध नसून फक्त शुभेच्छा असल्याचे किसान महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.१० जूनला ‘भारत बंद’ करण्याचा इशारा समितीने दिला आहे. सर्व पक्ष आणि संघटनांनी केवळ शेतकºयांसाठी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नवले यांनी केले.- शेतकरी संपात किसान महासभेसह संघर्ष समिती उतरली नसल्याने, मुंबईतील भाजीपाला व दूधपुरवठ्यावर परिणाम झालेला नाही, असे भायखळा भाजी मार्केटचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी सांगितले आहे.शेतकरी करीत असलेल्या सर्व मागण्या वाजवी आहेत. मागच्या यूपीए सरकारने केलेल्या गंभीर चुकांमुळेच शेतकरी संकटात सापडला आहे.- नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूकमंत्रीप्रसिद्धीसाठी सतत असे करावेच लागत असते. म्हणूनच शेतकरी असे काहीतरी करीत आहेत.- राधामोहन सिंग, केंद्रीय कृषिमंत्री

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपMaharashtraमहाराष्ट्र