शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

संपाच्या नावावर ग्राहकांची लूट; भाज्या कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 05:39 IST

देशव्यापी शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवक काहीशी घटली. याचा फायदा उचलत किरकोळ बाजारात छोट्या व्यापा-यांनी भाज्यांचे दर वाढविले. ग्राहकांच्या खिशाला यामुळे चाट बसली.

मुंबई : देशव्यापी शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवक काहीशी घटली. याचा फायदा उचलत किरकोळ बाजारात छोट्या व्यापा-यांनी भाज्यांचे दर वाढविले. ग्राहकांच्या खिशाला यामुळे चाट बसली. मुंबई, ठाणे आदी महानगरांमध्ये संपाच्या पहिल्या दोन दिवसांतच भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत.राज्यात शेतक-यांनी दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून आंदोलन सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी १,५०६ वाहनांमधून कृषिमाल विक्रीसाठी आला होता. त्यात सातारा, सांगली, पुणे व नाशिक परिसरामधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आला. मुंबईत टंचाई नसली, तरी किरकोळ व्यापाºयांनी भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढविले.जळगाव बाजार समितीत टॉमेटोचे भाव दुप्पट तर मिरचीचे दीडपटीने वाढले. ४०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या टॉमेटोचे भाव एक हजार ते दीड हजार व हिरवी मिरची १,५०० वरून २,००० ते २,५०० रुपयांवर गेली. नाशिक व अहमदनगरमध्ये शेतकºयांनी कांदा व दूध रस्त्यावर ओतले. कोल्हापूर बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली.७ जूनपासून शहरांची रसद तोडणार७ जूनपासून शहरांचा भाजीपाला व दूध पुरवठा थांबविणार असल्याचे किसान संघर्ष समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.शेतकरी संपाला संघर्ष समितीचा पाठिंबा किंवा विरोध नसून फक्त शुभेच्छा असल्याचे किसान महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.१० जूनला ‘भारत बंद’ करण्याचा इशारा समितीने दिला आहे. सर्व पक्ष आणि संघटनांनी केवळ शेतकºयांसाठी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नवले यांनी केले.- शेतकरी संपात किसान महासभेसह संघर्ष समिती उतरली नसल्याने, मुंबईतील भाजीपाला व दूधपुरवठ्यावर परिणाम झालेला नाही, असे भायखळा भाजी मार्केटचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी सांगितले आहे.शेतकरी करीत असलेल्या सर्व मागण्या वाजवी आहेत. मागच्या यूपीए सरकारने केलेल्या गंभीर चुकांमुळेच शेतकरी संकटात सापडला आहे.- नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूकमंत्रीप्रसिद्धीसाठी सतत असे करावेच लागत असते. म्हणूनच शेतकरी असे काहीतरी करीत आहेत.- राधामोहन सिंग, केंद्रीय कृषिमंत्री

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपMaharashtraमहाराष्ट्र