शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

ऐन सुट्टीच्या हंगामात होतेय दुकानदारांकडून ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 05:25 IST

निरीक्षकांची ६७ पदे रिक्त : वैधमापन शास्त्र विभागाचा कारभार अधांतरी

जमीर काझी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उन्हाळी सुट्टीच्या हंगामात कुटुंबीयासमवेत फिरण्यास बाहेर पडलेल्या प्रवाशांची महामार्गावरील मॉल्स व हॉटेल्समधून राजरोस लूट सुरू आहे. तेथे बाटलीबंद पाणी आणि खाद्यपदार्थ अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांच्या माथ्यावर मारले जात आहेत. त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी कार्यरत वैद्यमापन शास्त्र विभागाचा कारभार अधिकाऱ्याविना केवळ कागदावरच कार्यरत राहिला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एका अधिकाºयाकडे तीन-तीन जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याने, त्यांची अवस्था ‘न घर का न घाट का’ अशी बनली आहे. कारण या विभागाकडील निरीक्षकाची २८८ पैकी तब्बल ६७ पदे अनेक वर्षांपासून रिक्तच आहेत, तर सहायक नियत्रकांची सध्या १५ पदे रिक्त असून, येत्या महिन्याअखेरीस त्यामध्ये आणखी दोघांची भर पडणार आहे.

अन्न व औषध विभागाच्या अखत्यारित कार्यरत असलेले वैधमापन शास्त्र विभागाची अपुºया मनुष्यबळामुळे दिवसेंदिवस बिकट अवस्था होत चालली आहे. खाद्यपदार्थाचे सीलबंद पॅकेट, बाटलीबंद पाणी व अन्य वस्तूच्या विक्री करणाºया आस्थापनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या विभागाचे असते. त्यासाठी महसूल वर्गाप्रमाणे त्याचे सात विभाग करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये नियंत्रकाचे (कंट्रोलर) पद हे अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयाकडे असून, त्यांच्यामार्फत पूर्ण विभागाचे नियंत्रण चालविले जाते. त्यांच्यानंतरची विभागवार सात उपनियंत्रककार्यरत असले, तरी प्रत्यक्षात ‘फिल्ड’वरची कामे करणाºया सहायक नियंत्रक व निरीक्षक पदाचा वानवा आहे. दोन्ही पदासाठीअनुक्रमे ४६ व २८८ पदे मंजूर असली, तरी सध्या केवळ ३१ व २११ पदे पूर्ण राज्यात कार्यरत असल्याची माहिती विभागातील सूत्रांकडून देण्यात आली.

दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १५ व ६७ पदे रिक्त असून, अधिकाऱ्यांच्या निवृत्तीप्रमाणे दरवर्षी त्यामध्ये वृद्धी होत राहिली आहे. त्यामुळे एका-एका अधिकाºयाकडे नियमित पदाशिवाय अन्य दोन-दोन, तीन-तीन ठिकाणांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.अशी चालते ग्राहकांची लुटमारसुट्टीच्या हंगामामुळे महामार्गावरील हॉटेल्स, दुकानाच्या ठिकाणी ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. या ठिकाणी १४ रुपयांची पाण्याची बाटली १८ ते २० रुपयांना विकली जात आहे. शीतपेय आणि फूड पॅकेट्सही छापील किमतीपेक्षा सरासरी ४ ते ८ रुपये अधिक दराने विकले जात आहेत. दराच्या तफावतीबाबत दुकानचालकाकडे विचारणा केल्यास, ‘या दरात तुम्हाला घ्यायची असेल, तर घ्या किंवा घेऊ नका,’ असे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना गरजेपोटी जादा दराने वस्तू खरेदी करावे लागते. काही मॉल्स व हॉटेलच्या परिसरात वैधमापन विभागाकडून वस्तू विक्रीबाबतचे फलक लावले असून, तक्रारीसाठी संपर्क क्रमांक दिला आहे. मात्र, त्या क्रमांकावर कॉल केल्यानंतर कार्यवाही तर दूरच काहीच प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे विनाकारण वेळ वाया जात असल्याने नागरिकही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची परिस्थिती आहे.पाण्डेय, सानप यांच्या कारवाईचे स्मरणवैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकाने जर मनात आणले, तर लुटमार करणाºया अस्थापनावर वचक बसतो. साडेतीन, चार वर्षांपासून तत्कालीन नियंत्रक संजय पाण्डये यांनी नियमांची पायमल्ली करणाºयावर कारवाई करून, बेशिस्त मॉल, शॉपवर वचक बसविला. त्यांच्यापूर्वी डॉ. माधवराव सानप यांनी नियमबाह्य अस्थापनावर कारवाईचा बडगा उगारला होता. ग्राहकांना आता त्यांच्या कारकिर्दीचे स्मरण होत आहे.