शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

४० लोक पळालेला सुरतचा रस्ता बघा, आदित्य ठाकरेंचा टोला; गुलाबराव झाले आक्रमक म्हणाले...तुमचा विषयच संपला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 16:56 IST

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

मुंबई-

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा आणि शहरी भागातील ट्रॅफिकचा मुद्दा उपस्थित करताना शिंदे गटाला जोरदार टोला हाणला. त्यावर मंत्री शंभुराजे देसाई आणि गुलाबराव पाटील चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. गुलाबाराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला भर सभागृहातच 'गेले तुम्ही आणि तुमचा विषयच आता संपला आहे', असं प्रत्युत्तर दिलं.

नेमकं काय घडलं?हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील रस्त्यांवरील अपघात आणि नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत काही प्रश्न उपस्थित केले. तसंच मुंबईसह राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये होणाऱ्या ट्राफिकचा मुद्दा उपस्थित केला. हे बोलत असतानाच आदित्य ठाकरे यांनी मुंबई-सुरत रस्त्याचा उल्लेख केला. "माझी सरकारला एक सूचना अशी आहे की रस्ते बनवताना अलिकडे एक रस्ता असा आहे की ४० लोक रात्रीही पळून जायचे आणि दिवसाही पळून जायचे तो रस्ता म्हणजे मुंबई-सुरत. मग या रस्त्याची क्वालिटी तपासून पाहावी आणि तसा रस्ता जर बनला तर पळता येतं, धावता येतं आणि तिथून गुवाहटीलाही जाता येतं", असं म्हटलं. 

गुलाबराव पाटील झाले आक्रमक"विरोधी पक्षनेत्यांनी जो प्रश्न विचारला. तोच प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला. सुरतचा प्रश्न आणि गुवाहटीचा प्रश्न यांनी काढू नये. यांना जर डिबेट करायचं आहे ना मग यांना दाखवून देऊ की मातोश्रीचे रस्ते कसे होते आणि कसे झाले ही बोलण्याची गरज नाही. सुरत कसे गेले, गुवाहटी कसे गेले हे काय विचारता. गेले...संपला आता विषय तुमचा. गेले तुम्ही", असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना दिलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेGulabrao Patilगुलाबराव पाटील