शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

४० लोक पळालेला सुरतचा रस्ता बघा, आदित्य ठाकरेंचा टोला; गुलाबराव झाले आक्रमक म्हणाले...तुमचा विषयच संपला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 16:56 IST

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

मुंबई-

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा आणि शहरी भागातील ट्रॅफिकचा मुद्दा उपस्थित करताना शिंदे गटाला जोरदार टोला हाणला. त्यावर मंत्री शंभुराजे देसाई आणि गुलाबराव पाटील चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. गुलाबाराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला भर सभागृहातच 'गेले तुम्ही आणि तुमचा विषयच आता संपला आहे', असं प्रत्युत्तर दिलं.

नेमकं काय घडलं?हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील रस्त्यांवरील अपघात आणि नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत काही प्रश्न उपस्थित केले. तसंच मुंबईसह राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये होणाऱ्या ट्राफिकचा मुद्दा उपस्थित केला. हे बोलत असतानाच आदित्य ठाकरे यांनी मुंबई-सुरत रस्त्याचा उल्लेख केला. "माझी सरकारला एक सूचना अशी आहे की रस्ते बनवताना अलिकडे एक रस्ता असा आहे की ४० लोक रात्रीही पळून जायचे आणि दिवसाही पळून जायचे तो रस्ता म्हणजे मुंबई-सुरत. मग या रस्त्याची क्वालिटी तपासून पाहावी आणि तसा रस्ता जर बनला तर पळता येतं, धावता येतं आणि तिथून गुवाहटीलाही जाता येतं", असं म्हटलं. 

गुलाबराव पाटील झाले आक्रमक"विरोधी पक्षनेत्यांनी जो प्रश्न विचारला. तोच प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला. सुरतचा प्रश्न आणि गुवाहटीचा प्रश्न यांनी काढू नये. यांना जर डिबेट करायचं आहे ना मग यांना दाखवून देऊ की मातोश्रीचे रस्ते कसे होते आणि कसे झाले ही बोलण्याची गरज नाही. सुरत कसे गेले, गुवाहटी कसे गेले हे काय विचारता. गेले...संपला आता विषय तुमचा. गेले तुम्ही", असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना दिलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेGulabrao Patilगुलाबराव पाटील