शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

४० लोक पळालेला सुरतचा रस्ता बघा, आदित्य ठाकरेंचा टोला; गुलाबराव झाले आक्रमक म्हणाले...तुमचा विषयच संपला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 16:56 IST

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

मुंबई-

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा आणि शहरी भागातील ट्रॅफिकचा मुद्दा उपस्थित करताना शिंदे गटाला जोरदार टोला हाणला. त्यावर मंत्री शंभुराजे देसाई आणि गुलाबराव पाटील चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. गुलाबाराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला भर सभागृहातच 'गेले तुम्ही आणि तुमचा विषयच आता संपला आहे', असं प्रत्युत्तर दिलं.

नेमकं काय घडलं?हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील रस्त्यांवरील अपघात आणि नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत काही प्रश्न उपस्थित केले. तसंच मुंबईसह राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये होणाऱ्या ट्राफिकचा मुद्दा उपस्थित केला. हे बोलत असतानाच आदित्य ठाकरे यांनी मुंबई-सुरत रस्त्याचा उल्लेख केला. "माझी सरकारला एक सूचना अशी आहे की रस्ते बनवताना अलिकडे एक रस्ता असा आहे की ४० लोक रात्रीही पळून जायचे आणि दिवसाही पळून जायचे तो रस्ता म्हणजे मुंबई-सुरत. मग या रस्त्याची क्वालिटी तपासून पाहावी आणि तसा रस्ता जर बनला तर पळता येतं, धावता येतं आणि तिथून गुवाहटीलाही जाता येतं", असं म्हटलं. 

गुलाबराव पाटील झाले आक्रमक"विरोधी पक्षनेत्यांनी जो प्रश्न विचारला. तोच प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला. सुरतचा प्रश्न आणि गुवाहटीचा प्रश्न यांनी काढू नये. यांना जर डिबेट करायचं आहे ना मग यांना दाखवून देऊ की मातोश्रीचे रस्ते कसे होते आणि कसे झाले ही बोलण्याची गरज नाही. सुरत कसे गेले, गुवाहटी कसे गेले हे काय विचारता. गेले...संपला आता विषय तुमचा. गेले तुम्ही", असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना दिलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेGulabrao Patilगुलाबराव पाटील