शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

लोकमत निर्विवाद नंबर १, पहिल्या पंधरा वृत्तपत्रांमध्ये ‘लोकमत’ वगळता इतर एकही मराठी दैनिक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 5:29 AM

‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ हे नामाभिधान सार्थ ठरवत, चांदा ते बांदा आणि आता देशाच्या राजधानीतील मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करणा-या ‘लोकमत’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

मुंबई : ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ हे नामाभिधान सार्थ ठरवत, चांदा ते बांदा आणि आता देशाच्या राजधानीतील मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करणा-या ‘लोकमत’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सजग वाचकांच्या भक्कम पाठबळावर ‘लोकमत’ने खपाच्या बाबतीत प्रादेशिक वृत्तपत्रात देशात द्वितीय, तर महाराष्ट्रात निर्विवादपणे प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. ‘लोकमत’ची वाचकसंख्या तब्बल १ कोटी ८० लाख ६६ हजार झाली असून, निकटच्या प्रतिस्पर्धी वृत्तपत्राच्या वाचक संख्येपेक्षा ती कितीतरी अधिक आहे.इंडियन रिडरशिप सर्व्हे (आयआरएस), या नामांकित संस्थेने केलेल्या २०१७ च्या वाचक सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. डिजिटल, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियामुळे जगभरातील प्रिंट मीडियावर मंदीचे मळभ आलेले असताना, भारतातील प्रिंट मीडियाने मात्र सर्वांगीण वृद्धीचा आलेख उंचावला आहे. विशेषत: प्रादेशिक वृत्तपत्रांची वाढ लक्षणीय ठरली आहे. मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब अशी की, प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये ‘लोकमत’ राज्यात प्रथम आणि देशात दुसºया स्थानी आहे. देशभरातील एकूण (प्रादेशिक वृत्तपत्रांसह) वाचकांची संख्या लक्षात घेता, तिथेही ‘लोकमत’ सहाव्या स्थानी आहे. पहिल्या पंधरा वृत्तपत्रांमध्ये ‘लोकमत’खेरीज अन्य एकही मराठी दैनिक नाही.पुण्यातही नंबर १विद्येचे माहेरघर आणि सारस्वतांची नगरी असलेल्या पुण्यातही ‘लोकमत’प्रथम स्थानीच आहे. ‘आयआरएस’च्या ताज्या सर्वेक्षणाने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीची वाचकसंख्या तब्बल३० लाख ४५ हजारांच्या घरात पोहोचली असून, ‘सकाळ’पेक्षा ती १ लाख ६५ हजारांनी अधिक आहे.भारतातील १५ सर्वोच्च दैनिकांमध्ये एकमेव ‘लोकमत’चा समावेश, हा तमाम मराठी भाषकांचा सन्मान असून, वाचकांच्या पसंतीवर उमटलेली ही मोहोर आहे. वाचक व जाहिरातदारांनी दाखविलेल्या दृढ विश्वासामुळेच ‘लोकमत’ने हे अग्रस्थान कायम ठेवले आहे. देशातील प्रादेशिक वृत्तपत्रेच नवभारताच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करत आहेत. वृत्तपत्रांच्या वाढीमध्ये ग्रामीण भागांतील वाचकांचा सिंहाचा वाटा आहे. वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येत झालेली ४० टक्के वाढ ही आनंददायी बाब आहे़ सत्याच्या बाजूने उभे राहणाºया पत्रकारितेवर वाचक सर्वाधिक विश्वास ठेवतात, हेच ‘लोकमत’च्या अव्वल स्थानातून सिद्ध झाले आहे. याबद्दल वाचक आणि जाहिरातदारांचे मन:पूर्वक आभार, तसेच ‘लोकमत’ टीमचे अभिनंदन!- विजय दर्डा, चेअरमन, लोकमत मीडिया ग्रुप