शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

लोकमत स्पेशल रिपोर्ट! बियाणे कंपन्यांवर कारवाई कधी?; कृषीमंत्र्यांनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 02:42 IST

बियाणे बोगस आढळल्यास गुन्हे दाखल करणार !

राजरत्न सिरसाट 

अकोला : नापिकी, कोरोनानंतरची टाळेबंदी, शेतमालाचे झालेले नुकसान या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा जिद्दीने खरीप हंगामाला सामोरा जात असताना यावर्षी अप्रमाणित, बोगस सोयाबीन बियाण्यांनी त्यांचा घात केला आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळासह (महाबीज) भरवशाच्या काही नामवंत खासगी कंपन्यांचे लाखो हेक्टरवर पेरणी केलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही.

राज्यभरात हजारो शेतकऱ्यांच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला आहे. बियाणे न आलेले क्षेत्र ३० टक्क्यांवर आहे. राज्यात सोयाबीनचे सरासरी ४० लाख हेक्टर क्षेत्र आहे. विदर्भात यातील १६ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीन बियाणे पेरणी केली जाते. या सर्व क्षेत्रावर पेरणीसाठी १० ते ११ लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे. तथापि, गतवर्षी हे पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असताना सतत पाऊस सुरू होता. परिणामी उत्पादन कमी झाले. त्याचा परिणाम यावर्षी बियाणे उपलब्धतेवर झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाबीजने ५.५० लाखांऐवजी ३ लाख क्विंटलच बियाणे बाजारात उपलब्ध करुन दिले. इतर नामवंत ९ कंपन्यांनी बियाणे बाजारात उपलब्ध केले आहे.आजमितीस जवळपास ७० टक्के सोयाबीन बियाण्यांची पेरणी झाली आहे; परंतु महाबीजसह इतर नामवंत कंपन्यांचे बियाणे उगवले नाही. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींनंतर वर्धा येथे कृषी विभागाने ईगल कंपनीला नोटीस बजावली आहे.सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने आता शेतकऱ्यांचे जे व्हायचे ते नुकसान झाले आहे. ते पुन्हा पेरणीने न भरून निघणारे आहे. त्यामुळे शेतकºयांना थेट नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी. - डॉ. प्रकाश मानकर, चेअरमन, महाराष्ट्र राज्य कृषक समाजपावसाची वक्रदृष्टीचांगल्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिल्याने शेतकºयांनी ३० मि.मी. पाऊस पडल्यानंतर लगेच पेरणी केली. त्यानंतर पावसाचा १० दिवस खंड पडला. तापमानही वाढल्याने अनेक भागात सोयाबीन अंकुरण्याऐवजी कुजले. काही भागात पेरणी केल्यानंतर लागलीच त्यावर दमदार पाऊस झाल्याने ते खोलवर दबले. त्यामुळे उगवलेले नाही, असे मत कृषी अधिकाºयांनी व्यक्त केले आहे.सोयाबीन पेरले पण ते उगवले नसल्याच्या तक्रारी राज्याच्या काही भागांतून येत असून त्यांची चौकशी करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. बियाणे बोगस आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी ‘लोकमत’ला दिली.

परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे सोयाबीन विषयक तज्ज्ञ आणि कृषी खात्याचे ज्येष्ठ अधिकारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सोयाबीन नेमके कोणत्या कारणांनी उगवत नाही, याचा अहवाल ही समिती देईल. समितीच्या अहवालाच्या आधारे तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. महाबीज आणि खासगी कंपन्यांची ही बियाणे आहेत. ज्या ठिकाणी महाबीजचे बियाणे उगवले नाही तेथे पर्यायी बियाणे शेतकºयांना तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश मी दिलेले आहेत. सोयाबीन उगवत नसल्याबद्दलच्या तक्रारी नियमानुसार आधी प्रांत अधिकाºयांकडे कराव्या लागत होत्या. मात्र आता शेतकºयांना तक्रारी करणे सोपे जावे व जास्तीत जास्त तक्रारी स्वीकारल्या जाव्यात यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदार पातळीवर तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत, असे भुसे यांनी सांगितले. सोयाबीन न उगवल्यामुळे शेतकºयांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामेदेखील केले जात आहेत. बियाणे बोगस असल्याचे चौकशीत आढळले तर महाबीज असो वा खासगी कंपन्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी