शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत स्पेशल रिपोर्ट! बियाणे कंपन्यांवर कारवाई कधी?; कृषीमंत्र्यांनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 02:42 IST

बियाणे बोगस आढळल्यास गुन्हे दाखल करणार !

राजरत्न सिरसाट 

अकोला : नापिकी, कोरोनानंतरची टाळेबंदी, शेतमालाचे झालेले नुकसान या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा जिद्दीने खरीप हंगामाला सामोरा जात असताना यावर्षी अप्रमाणित, बोगस सोयाबीन बियाण्यांनी त्यांचा घात केला आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळासह (महाबीज) भरवशाच्या काही नामवंत खासगी कंपन्यांचे लाखो हेक्टरवर पेरणी केलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही.

राज्यभरात हजारो शेतकऱ्यांच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला आहे. बियाणे न आलेले क्षेत्र ३० टक्क्यांवर आहे. राज्यात सोयाबीनचे सरासरी ४० लाख हेक्टर क्षेत्र आहे. विदर्भात यातील १६ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीन बियाणे पेरणी केली जाते. या सर्व क्षेत्रावर पेरणीसाठी १० ते ११ लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे. तथापि, गतवर्षी हे पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असताना सतत पाऊस सुरू होता. परिणामी उत्पादन कमी झाले. त्याचा परिणाम यावर्षी बियाणे उपलब्धतेवर झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाबीजने ५.५० लाखांऐवजी ३ लाख क्विंटलच बियाणे बाजारात उपलब्ध करुन दिले. इतर नामवंत ९ कंपन्यांनी बियाणे बाजारात उपलब्ध केले आहे.आजमितीस जवळपास ७० टक्के सोयाबीन बियाण्यांची पेरणी झाली आहे; परंतु महाबीजसह इतर नामवंत कंपन्यांचे बियाणे उगवले नाही. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींनंतर वर्धा येथे कृषी विभागाने ईगल कंपनीला नोटीस बजावली आहे.सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने आता शेतकऱ्यांचे जे व्हायचे ते नुकसान झाले आहे. ते पुन्हा पेरणीने न भरून निघणारे आहे. त्यामुळे शेतकºयांना थेट नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी. - डॉ. प्रकाश मानकर, चेअरमन, महाराष्ट्र राज्य कृषक समाजपावसाची वक्रदृष्टीचांगल्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिल्याने शेतकºयांनी ३० मि.मी. पाऊस पडल्यानंतर लगेच पेरणी केली. त्यानंतर पावसाचा १० दिवस खंड पडला. तापमानही वाढल्याने अनेक भागात सोयाबीन अंकुरण्याऐवजी कुजले. काही भागात पेरणी केल्यानंतर लागलीच त्यावर दमदार पाऊस झाल्याने ते खोलवर दबले. त्यामुळे उगवलेले नाही, असे मत कृषी अधिकाºयांनी व्यक्त केले आहे.सोयाबीन पेरले पण ते उगवले नसल्याच्या तक्रारी राज्याच्या काही भागांतून येत असून त्यांची चौकशी करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. बियाणे बोगस आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी ‘लोकमत’ला दिली.

परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे सोयाबीन विषयक तज्ज्ञ आणि कृषी खात्याचे ज्येष्ठ अधिकारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सोयाबीन नेमके कोणत्या कारणांनी उगवत नाही, याचा अहवाल ही समिती देईल. समितीच्या अहवालाच्या आधारे तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. महाबीज आणि खासगी कंपन्यांची ही बियाणे आहेत. ज्या ठिकाणी महाबीजचे बियाणे उगवले नाही तेथे पर्यायी बियाणे शेतकºयांना तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश मी दिलेले आहेत. सोयाबीन उगवत नसल्याबद्दलच्या तक्रारी नियमानुसार आधी प्रांत अधिकाºयांकडे कराव्या लागत होत्या. मात्र आता शेतकºयांना तक्रारी करणे सोपे जावे व जास्तीत जास्त तक्रारी स्वीकारल्या जाव्यात यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदार पातळीवर तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत, असे भुसे यांनी सांगितले. सोयाबीन न उगवल्यामुळे शेतकºयांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामेदेखील केले जात आहेत. बियाणे बोगस असल्याचे चौकशीत आढळले तर महाबीज असो वा खासगी कंपन्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी