शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

लोकमत'मुळं गरीब लेखकाला समजलं 'माणुसकीचं मोठेपण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 19:05 IST

अनेक कथा, कादंबऱ्या लिहिणाऱ्या एका लेखकाच्या गोष्टीचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश केला गेला; मात्र पोट भरण्यासाठी हा लेखक दुसऱ्या शेतात मोलमजुरी करत असल्याची संवेदनशील स्टोरी  लोकमतमधून प्रसिद्ध होताच अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला.

उंब्रज, दि. 4 - अनेक कथा, कादंबऱ्या लिहिणाऱ्या एका लेखकाच्या गोष्टीचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश केला गेला; मात्र पोट भरण्यासाठी हा लेखक दुसऱ्या शेतात मोलमजुरी करत असल्याची संवेदनशील स्टोरी  लोकमतमधून प्रसिद्ध होताच अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला.सातारा येथील चंद्रशेखर शिंदे-देशमुख यांनी दहा हजारांचा धनादेश शंकर कवळे यांच्या हातात सुपूर्द केला. तसेच साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते अन युवा स्वयंरोजगार संस्थेचे अध्यक्ष सचिन अवघडे यांनीही पाच हजारांची रक्कम कवळे यांच्या कुटुंबीयाला दिली. कऱ्हाड तालुक्यातील मरळी गावात राहणारे शंकर कवळे यांच्या अनेक कादंबऱ्या  प्रकाशित झाल्या असून, विविध पुस्तकेही प्रकाशन संस्थांनी बाजारात आणली आहेत. एका झोपडीत राहणाऱ्या कवळे यांना परिस्थितीपोटी गवंडी काम करावे लागत असून, सध्या त्यांचे हातावरच पोट भागविली जाते.कºहाड तालुक्यातील मरळी हे छोटं गाव. खंडोबाच्या पाली या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेलं आहे. या गावात शंकर दिनकर कवळे यांचा जन्म झाला. वडील दिनकर हे दोरखंड वळायचे काम करत तर आई शकुंतला शेतमजुरी करायची. पाच भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार. एक गुंठा जमीन नाही. गरिबी पाचवीला पुजलेली; पण शंकर यांना शिकायचं होतं.घरच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि शेवटी परिस्थिती पुढे हार पत्करली. दुगलीवरची गाई घेऊन तिला चरण्यासाठी डोंगर गाठू लागले; पण काही तरी शिकायचेच ही इच्छा गप्प बसू देत नव्हती. मोठ्या भावाने आणलेली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, बाबा कदम यांची पुस्तके ते डोंगरात बसून वाचू लागले आणि हीच पुस्तके त्यांच्या लेखणीला प्रेरणादायी ठरली. अन् कवळे यांचीच कथा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी दिला आहे. हा त्यांच्या प्रतिभेचा गौरव आहे. परिस्थितीशी झगडत असलेल्या कवळे यांना सातारकरांनीही मदतीचा हात पुढे देऊ केला आहे.