शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

लोकमत'मुळं गरीब लेखकाला समजलं 'माणुसकीचं मोठेपण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 19:05 IST

अनेक कथा, कादंबऱ्या लिहिणाऱ्या एका लेखकाच्या गोष्टीचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश केला गेला; मात्र पोट भरण्यासाठी हा लेखक दुसऱ्या शेतात मोलमजुरी करत असल्याची संवेदनशील स्टोरी  लोकमतमधून प्रसिद्ध होताच अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला.

उंब्रज, दि. 4 - अनेक कथा, कादंबऱ्या लिहिणाऱ्या एका लेखकाच्या गोष्टीचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश केला गेला; मात्र पोट भरण्यासाठी हा लेखक दुसऱ्या शेतात मोलमजुरी करत असल्याची संवेदनशील स्टोरी  लोकमतमधून प्रसिद्ध होताच अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला.सातारा येथील चंद्रशेखर शिंदे-देशमुख यांनी दहा हजारांचा धनादेश शंकर कवळे यांच्या हातात सुपूर्द केला. तसेच साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते अन युवा स्वयंरोजगार संस्थेचे अध्यक्ष सचिन अवघडे यांनीही पाच हजारांची रक्कम कवळे यांच्या कुटुंबीयाला दिली. कऱ्हाड तालुक्यातील मरळी गावात राहणारे शंकर कवळे यांच्या अनेक कादंबऱ्या  प्रकाशित झाल्या असून, विविध पुस्तकेही प्रकाशन संस्थांनी बाजारात आणली आहेत. एका झोपडीत राहणाऱ्या कवळे यांना परिस्थितीपोटी गवंडी काम करावे लागत असून, सध्या त्यांचे हातावरच पोट भागविली जाते.कºहाड तालुक्यातील मरळी हे छोटं गाव. खंडोबाच्या पाली या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेलं आहे. या गावात शंकर दिनकर कवळे यांचा जन्म झाला. वडील दिनकर हे दोरखंड वळायचे काम करत तर आई शकुंतला शेतमजुरी करायची. पाच भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार. एक गुंठा जमीन नाही. गरिबी पाचवीला पुजलेली; पण शंकर यांना शिकायचं होतं.घरच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि शेवटी परिस्थिती पुढे हार पत्करली. दुगलीवरची गाई घेऊन तिला चरण्यासाठी डोंगर गाठू लागले; पण काही तरी शिकायचेच ही इच्छा गप्प बसू देत नव्हती. मोठ्या भावाने आणलेली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, बाबा कदम यांची पुस्तके ते डोंगरात बसून वाचू लागले आणि हीच पुस्तके त्यांच्या लेखणीला प्रेरणादायी ठरली. अन् कवळे यांचीच कथा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी दिला आहे. हा त्यांच्या प्रतिभेचा गौरव आहे. परिस्थितीशी झगडत असलेल्या कवळे यांना सातारकरांनीही मदतीचा हात पुढे देऊ केला आहे.