शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत बांधावर! साहेब, आम्ही जगावे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 03:11 IST

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सेनगाव, भानखेडा शिवारातील नुकसानाची पाहणी केली

राजकुमार देशमुख सेनगाव (जि. हिंगोली) : साहेब, व्हतं- नव्हतं सर्व लावून पेरणी केली. गेल्या वर्षी मुलीचे लग्न केले. अंगावर कर्ज आहे. सोयाबीन तर सगळे गेले. मी काय करू, अशी हतबल विचारणा तालुक्यातील भानखेडा येथील आनंदा प्रल्हाद कोटकर या शेतकऱ्याने पाहणी दौºयावर आलेल्या जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली.सेनगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत. सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुड्या पावसाने पूर्णत: भिजल्या आहेत. त्यामुळे जागेवरच सोयाबीनला बुरशी चढली असून कोंब फुटले आहेत. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.भानखेडा शिवारात अल्पभूधारक शेतकरी जगन्नाथ सीताराम कोटकर या तरुणाच्या शेताला भेट दिली. यावेळी पावसाने सडलेल्या सोयाबीनची सुडी लावणे चालू होते. ही परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी व समवेतचे अधिकारीही सुन्न झाले. सर्व नुकसानाचे पंचनामे करून घ्या, हताश होऊ नका. शासन आपल्यासोबत आहे. लवकर मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.शेतकरी भावनाविवशजिल्हाधिकारी जयवंशी यांनी सेनगाव, भानखेडा शिवारातील नुकसानाची पाहणी केली. जिल्हाधिकाºयांसमोर आनंदा प्रल्हाद कोटकर हा शेतकरी भावनाविवश झाला. पाच एकराची सडत चाललेली सोयाबीनची सुडी उकरून दाखवत ‘साहेब ...आम्ही जगाव कसे ? व्हत्याचं नव्हतं झालं. आमचा कोणी वालीच उरला नाही’, अशी अगतिकता त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकाºयांनी त्यांचे सांत्वन केले.

सोलापूरमध्ये खरबुजाचे नुकसानकांद्याचेही मोठे नुकसान सतीश बागल/नासीर कबीरअरुण बारसकर पंढरपूर/करमाळा/सोलापूर (जि. सोलापूर) : मागच्या वर्षी दुष्काळ होता.. यंदा कांदा, बाजरी, मका ही पिके हाताला आलेली असताना परतीच्या पावसाने तोंडचा घास पळवला. यावर्षी चांगले आलेले खरबुजाचे पीक अतिवृष्टीमुळे जागेवरच सोडून द्यावे लागले. ही सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, करमाळा आणि पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा आहे.

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी धर्मा शंकर येडगे यांचा लागवड केलेला दोन एकर खरबुजाचा प्लॉट पक्वतेच्या अवस्थेत होता. यासाठी सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा खर्च त्यांनी केला होता. २० आॅक्टोबर रोजी रात्री अचानक पाऊस झाला. दुसºया दिवशी कडक ऊन पडले.खरबुजावर रोग पडण्यास सुरुवात झाली. दहा दिवसांत प्लॉट हातचा गेला. केलेला खर्च कसा भरून काढायचा, हा प्रश्न येडगे यांच्यासमोर आहे. उपरी (ता. पंढरपूर) येथील शिवाजी मारुती नागणे यांनी दोन एकर क्षेत्रात कांदा केली आहे. सततच्या पावसामुळे कांदा पिवळा पडला आहे. करप्याने प्लॉट वेढला असून, फवारणी करूनही पीक हाती येईल का, याची शाश्वती नसल्याचे त्यांनी सांगितले.करमाळा तालुक्यातील रोसेवाडी येथील चांगुणा बबन ढावरे म्हणाल्या की, गेल्या वर्षीपासून पाऊस आमच्यावर रुसला होता म्हणून रानात कसलीच पेर केली नाही. रान पडीक ठेवले होते, पण आता थोड्या पावसावर रब्बी हंगामात ज्वारी दोन एकरमध्ये पेरली. तिची उगवण झाली, पण गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सुटीच दिली नाही़ यामुळे संपूर्ण ज्वारी पाण्यात बुडाली आहे. हिवरवाडी येथील राजेंद्र मेरगळ यांच्या दीड एकर क्षेत्रात मेथी, शेपू, कोथिंबीर या पालेभाज्या पावसाने चिखल व दलदल निर्माण होऊन सडल्या आहेत. दररोज यातून सात-आठशे रुपये मिळायचे, पण ते आता बंद झाले आहेत.उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावाची एकही दिशा अशी नाहीकी तेथे कांदा दिसत नाही. आॅगस्टमध्ये गावातील काही शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर कांदा लागवड केली तर काहींना शिरापूर उपसा सिंचनाच्या पाण्याचा आधार मिळाला. आॅक्टोबरमधील थंडीमुळे कांदा मोठा होतो व दिवाळीनंतर काढणीची लगबग सुरू होते. मात्र, यावर्षी संपूर्ण आॅक्टोबरमध्ये पाऊस पडत राहिल्याने कांदा पाण्यातच नासू लागला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीRainपाऊस