शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

लोकमत बांधावर! साहेब, आम्ही जगावे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 03:11 IST

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सेनगाव, भानखेडा शिवारातील नुकसानाची पाहणी केली

राजकुमार देशमुख सेनगाव (जि. हिंगोली) : साहेब, व्हतं- नव्हतं सर्व लावून पेरणी केली. गेल्या वर्षी मुलीचे लग्न केले. अंगावर कर्ज आहे. सोयाबीन तर सगळे गेले. मी काय करू, अशी हतबल विचारणा तालुक्यातील भानखेडा येथील आनंदा प्रल्हाद कोटकर या शेतकऱ्याने पाहणी दौºयावर आलेल्या जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली.सेनगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत. सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुड्या पावसाने पूर्णत: भिजल्या आहेत. त्यामुळे जागेवरच सोयाबीनला बुरशी चढली असून कोंब फुटले आहेत. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.भानखेडा शिवारात अल्पभूधारक शेतकरी जगन्नाथ सीताराम कोटकर या तरुणाच्या शेताला भेट दिली. यावेळी पावसाने सडलेल्या सोयाबीनची सुडी लावणे चालू होते. ही परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी व समवेतचे अधिकारीही सुन्न झाले. सर्व नुकसानाचे पंचनामे करून घ्या, हताश होऊ नका. शासन आपल्यासोबत आहे. लवकर मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.शेतकरी भावनाविवशजिल्हाधिकारी जयवंशी यांनी सेनगाव, भानखेडा शिवारातील नुकसानाची पाहणी केली. जिल्हाधिकाºयांसमोर आनंदा प्रल्हाद कोटकर हा शेतकरी भावनाविवश झाला. पाच एकराची सडत चाललेली सोयाबीनची सुडी उकरून दाखवत ‘साहेब ...आम्ही जगाव कसे ? व्हत्याचं नव्हतं झालं. आमचा कोणी वालीच उरला नाही’, अशी अगतिकता त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकाºयांनी त्यांचे सांत्वन केले.

सोलापूरमध्ये खरबुजाचे नुकसानकांद्याचेही मोठे नुकसान सतीश बागल/नासीर कबीरअरुण बारसकर पंढरपूर/करमाळा/सोलापूर (जि. सोलापूर) : मागच्या वर्षी दुष्काळ होता.. यंदा कांदा, बाजरी, मका ही पिके हाताला आलेली असताना परतीच्या पावसाने तोंडचा घास पळवला. यावर्षी चांगले आलेले खरबुजाचे पीक अतिवृष्टीमुळे जागेवरच सोडून द्यावे लागले. ही सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, करमाळा आणि पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा आहे.

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी धर्मा शंकर येडगे यांचा लागवड केलेला दोन एकर खरबुजाचा प्लॉट पक्वतेच्या अवस्थेत होता. यासाठी सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा खर्च त्यांनी केला होता. २० आॅक्टोबर रोजी रात्री अचानक पाऊस झाला. दुसºया दिवशी कडक ऊन पडले.खरबुजावर रोग पडण्यास सुरुवात झाली. दहा दिवसांत प्लॉट हातचा गेला. केलेला खर्च कसा भरून काढायचा, हा प्रश्न येडगे यांच्यासमोर आहे. उपरी (ता. पंढरपूर) येथील शिवाजी मारुती नागणे यांनी दोन एकर क्षेत्रात कांदा केली आहे. सततच्या पावसामुळे कांदा पिवळा पडला आहे. करप्याने प्लॉट वेढला असून, फवारणी करूनही पीक हाती येईल का, याची शाश्वती नसल्याचे त्यांनी सांगितले.करमाळा तालुक्यातील रोसेवाडी येथील चांगुणा बबन ढावरे म्हणाल्या की, गेल्या वर्षीपासून पाऊस आमच्यावर रुसला होता म्हणून रानात कसलीच पेर केली नाही. रान पडीक ठेवले होते, पण आता थोड्या पावसावर रब्बी हंगामात ज्वारी दोन एकरमध्ये पेरली. तिची उगवण झाली, पण गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सुटीच दिली नाही़ यामुळे संपूर्ण ज्वारी पाण्यात बुडाली आहे. हिवरवाडी येथील राजेंद्र मेरगळ यांच्या दीड एकर क्षेत्रात मेथी, शेपू, कोथिंबीर या पालेभाज्या पावसाने चिखल व दलदल निर्माण होऊन सडल्या आहेत. दररोज यातून सात-आठशे रुपये मिळायचे, पण ते आता बंद झाले आहेत.उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावाची एकही दिशा अशी नाहीकी तेथे कांदा दिसत नाही. आॅगस्टमध्ये गावातील काही शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर कांदा लागवड केली तर काहींना शिरापूर उपसा सिंचनाच्या पाण्याचा आधार मिळाला. आॅक्टोबरमधील थंडीमुळे कांदा मोठा होतो व दिवाळीनंतर काढणीची लगबग सुरू होते. मात्र, यावर्षी संपूर्ण आॅक्टोबरमध्ये पाऊस पडत राहिल्याने कांदा पाण्यातच नासू लागला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीRainपाऊस