शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत बांधावर! साहेब, आम्ही जगावे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 03:11 IST

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सेनगाव, भानखेडा शिवारातील नुकसानाची पाहणी केली

राजकुमार देशमुख सेनगाव (जि. हिंगोली) : साहेब, व्हतं- नव्हतं सर्व लावून पेरणी केली. गेल्या वर्षी मुलीचे लग्न केले. अंगावर कर्ज आहे. सोयाबीन तर सगळे गेले. मी काय करू, अशी हतबल विचारणा तालुक्यातील भानखेडा येथील आनंदा प्रल्हाद कोटकर या शेतकऱ्याने पाहणी दौºयावर आलेल्या जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली.सेनगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत. सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुड्या पावसाने पूर्णत: भिजल्या आहेत. त्यामुळे जागेवरच सोयाबीनला बुरशी चढली असून कोंब फुटले आहेत. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.भानखेडा शिवारात अल्पभूधारक शेतकरी जगन्नाथ सीताराम कोटकर या तरुणाच्या शेताला भेट दिली. यावेळी पावसाने सडलेल्या सोयाबीनची सुडी लावणे चालू होते. ही परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी व समवेतचे अधिकारीही सुन्न झाले. सर्व नुकसानाचे पंचनामे करून घ्या, हताश होऊ नका. शासन आपल्यासोबत आहे. लवकर मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.शेतकरी भावनाविवशजिल्हाधिकारी जयवंशी यांनी सेनगाव, भानखेडा शिवारातील नुकसानाची पाहणी केली. जिल्हाधिकाºयांसमोर आनंदा प्रल्हाद कोटकर हा शेतकरी भावनाविवश झाला. पाच एकराची सडत चाललेली सोयाबीनची सुडी उकरून दाखवत ‘साहेब ...आम्ही जगाव कसे ? व्हत्याचं नव्हतं झालं. आमचा कोणी वालीच उरला नाही’, अशी अगतिकता त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकाºयांनी त्यांचे सांत्वन केले.

सोलापूरमध्ये खरबुजाचे नुकसानकांद्याचेही मोठे नुकसान सतीश बागल/नासीर कबीरअरुण बारसकर पंढरपूर/करमाळा/सोलापूर (जि. सोलापूर) : मागच्या वर्षी दुष्काळ होता.. यंदा कांदा, बाजरी, मका ही पिके हाताला आलेली असताना परतीच्या पावसाने तोंडचा घास पळवला. यावर्षी चांगले आलेले खरबुजाचे पीक अतिवृष्टीमुळे जागेवरच सोडून द्यावे लागले. ही सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, करमाळा आणि पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा आहे.

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी धर्मा शंकर येडगे यांचा लागवड केलेला दोन एकर खरबुजाचा प्लॉट पक्वतेच्या अवस्थेत होता. यासाठी सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा खर्च त्यांनी केला होता. २० आॅक्टोबर रोजी रात्री अचानक पाऊस झाला. दुसºया दिवशी कडक ऊन पडले.खरबुजावर रोग पडण्यास सुरुवात झाली. दहा दिवसांत प्लॉट हातचा गेला. केलेला खर्च कसा भरून काढायचा, हा प्रश्न येडगे यांच्यासमोर आहे. उपरी (ता. पंढरपूर) येथील शिवाजी मारुती नागणे यांनी दोन एकर क्षेत्रात कांदा केली आहे. सततच्या पावसामुळे कांदा पिवळा पडला आहे. करप्याने प्लॉट वेढला असून, फवारणी करूनही पीक हाती येईल का, याची शाश्वती नसल्याचे त्यांनी सांगितले.करमाळा तालुक्यातील रोसेवाडी येथील चांगुणा बबन ढावरे म्हणाल्या की, गेल्या वर्षीपासून पाऊस आमच्यावर रुसला होता म्हणून रानात कसलीच पेर केली नाही. रान पडीक ठेवले होते, पण आता थोड्या पावसावर रब्बी हंगामात ज्वारी दोन एकरमध्ये पेरली. तिची उगवण झाली, पण गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सुटीच दिली नाही़ यामुळे संपूर्ण ज्वारी पाण्यात बुडाली आहे. हिवरवाडी येथील राजेंद्र मेरगळ यांच्या दीड एकर क्षेत्रात मेथी, शेपू, कोथिंबीर या पालेभाज्या पावसाने चिखल व दलदल निर्माण होऊन सडल्या आहेत. दररोज यातून सात-आठशे रुपये मिळायचे, पण ते आता बंद झाले आहेत.उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावाची एकही दिशा अशी नाहीकी तेथे कांदा दिसत नाही. आॅगस्टमध्ये गावातील काही शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर कांदा लागवड केली तर काहींना शिरापूर उपसा सिंचनाच्या पाण्याचा आधार मिळाला. आॅक्टोबरमधील थंडीमुळे कांदा मोठा होतो व दिवाळीनंतर काढणीची लगबग सुरू होते. मात्र, यावर्षी संपूर्ण आॅक्टोबरमध्ये पाऊस पडत राहिल्याने कांदा पाण्यातच नासू लागला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीRainपाऊस