शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लोकसभेला कोणाला किती जागा? महायुतीत फॉर्म्युला ठरला; फडणवीसांनी आकडा सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 11:12 IST

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला चांगलं यश मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई - आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीने महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदललं आहे. दोन्हीही पक्षात बंड केलेल्या नेत्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जाणं पसंत केलं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघांचं गणितही बदलणार असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोणती जागा कोणाला मिळणार, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. अशातच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबद्दल महत्त्वाचं विधान केलं असून आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं आहे.

"आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप २६ जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून २२ जागांवर लढतील. जागावाटपाचा हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल," असं देवेंद्र फडणवीस यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबरपणे उभा राहील आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

शिंदे- पवार २२ जागांवर समाधान मानणार?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना तर राष्ट्रवादीत अजित पवार यांनी शरद पवार यांना आव्हान देत वेगळी चूल मांडली. शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रुपाने त्यांची पहिलीच मोठी परीक्षा असणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून दोघांना मिळून २२ जागा दिल्या जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांकडून सांगण्यात आल्यानंतर आता हे दोन्ही नेते जागावाटपावर समाधानी होणार की आणखी जागांची मागणी करणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

आरक्षणाबद्दल काय म्हणाले फडणवीस?

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून तणाव निर्माण झाल्याचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काळजी व्यक्त करत म्हटलं आहे की, "आरक्षण प्रश्नाने केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसून याचा राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो," असं फडणवीस म्हणाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार