शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

लोकसभेला कोणाला किती जागा? महायुतीत फॉर्म्युला ठरला; फडणवीसांनी आकडा सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 11:12 IST

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला चांगलं यश मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई - आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीने महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदललं आहे. दोन्हीही पक्षात बंड केलेल्या नेत्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जाणं पसंत केलं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघांचं गणितही बदलणार असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोणती जागा कोणाला मिळणार, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. अशातच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबद्दल महत्त्वाचं विधान केलं असून आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं आहे.

"आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप २६ जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून २२ जागांवर लढतील. जागावाटपाचा हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल," असं देवेंद्र फडणवीस यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबरपणे उभा राहील आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

शिंदे- पवार २२ जागांवर समाधान मानणार?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना तर राष्ट्रवादीत अजित पवार यांनी शरद पवार यांना आव्हान देत वेगळी चूल मांडली. शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रुपाने त्यांची पहिलीच मोठी परीक्षा असणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून दोघांना मिळून २२ जागा दिल्या जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांकडून सांगण्यात आल्यानंतर आता हे दोन्ही नेते जागावाटपावर समाधानी होणार की आणखी जागांची मागणी करणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

आरक्षणाबद्दल काय म्हणाले फडणवीस?

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून तणाव निर्माण झाल्याचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काळजी व्यक्त करत म्हटलं आहे की, "आरक्षण प्रश्नाने केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसून याचा राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो," असं फडणवीस म्हणाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार