शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

लग्नातल्या उपस्थितीने आचारसंहितेचा भंग?

By प्रगती पाटील | Updated: April 2, 2024 09:27 IST

Code Of Conduct: अशावेळी निवडणुका लागल्या तर या नेत्यांना बोलवायचे का? त्यांच्या येण्याने आपल्यावर एखादा गुन्हा तर दाखल होणार नाही, ही भीती सर्वसामान्यांना निश्चित असते. नेत्यांना नाही बोलावलं तर ते दुखावणार आणि बोलावलं तर गुन्हा दाखल होणार, असे भन्नाट द्वंद्व लगीनघरात सुरू असते. 

- प्रगती जाधव-पाटील (वार्ताहर/ उपसंपादक, लोकमत, सातारा)आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवार लग्नाला आले तर तो आचारसंहितेचा भंग होतो का?- राजेश शिखरे, बुलढाणानिवडणुकांचे पडघम वाजू लागले की, सर्वत्र त्याची लगबग अनुभवायला मिळते. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नेते आणि त्यांचे कार्यकर्ते वाट्टेल ते करायला तयार असतात. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत आपल्याला कसे पाेहोचता येईल, त्यांच्या संपर्कात कसे राहाता येईल, त्यांना आपलेसे कसे करता येईल आणि त्या माध्यमातून मतांची बेगमी कशी करता येईल, याकडे त्यांचा कटाक्ष असतो.

वर्षभर कोणाच्या दृष्टीस न पडलेले कार्यकर्तही नेत्यांचे प्रतिनिधी म्हणून अनेक कार्यक्रमांमध्ये आघाडी घेऊन पुढे जात असल्याचे पाहायला मिळते. निवडणूक कालावधीत एखाद्याच्या घरी कोणाचा मृत्यू झाला, तरीही त्याच्याकडे जाऊन सांत्वन भेटीचा अलीकडे नवा प्रघात आहे. लोकांच्या दु:खद क्षणात त्यांचे सांत्वन करण्यासाठी जाणारे नेते लग्न, बारसे, मुंज अशा कार्यक्रमालाही हजेरी लावण्यासाठी सज्ज असतात. काही लग्नांच्या तारखा  अगदी दोन - चार महिने आधीच ठरलेल्या असतात. स्थानिक संपर्काचा भाग म्हणून काहींनी तर नेत्यांच्या उपलब्धतेवरही लग्नाचा मुहूर्त ठरविलेला असतो. 

अशावेळी निवडणुका लागल्या तर या नेत्यांना बोलवायचे का? त्यांच्या येण्याने आपल्यावर एखादा गुन्हा तर दाखल होणार नाही, ही भीती सर्वसामान्यांना निश्चित असते. नेत्यांना नाही बोलावलं तर ते दुखावणार आणि बोलावलं तर गुन्हा दाखल होणार, असे भन्नाट द्वंद्व लगीनघरात सुरू असते. 

यासंदर्भात कायदा आणि नियम नेमके काय सांगतात? - निवडणुकीच्या कालावधीत नेत्यांचे असे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्यामुळे आचारसंहितेचा भंग होत नाही. पण, अशा कार्यक्रमांमध्ये जाऊन नेत्यांनी भाषण केले आणि त्यातून मतदारांना काही आमिष दाखवले तर तो मात्र आचारसंहितेचा भंग होतो. घरगुती मंगल कार्यात सहभागी होणाऱ्या उमेदवाराने आपल्या पक्षाचा किंवा निवडणूक चिन्हाचा प्रचार करणे, उपस्थितांना आमिष दाखवणे किंवा राजकीय वक्तव्य करणे, हा आचारसंहितेचा भंग असतो. पण, उमेदवाराने अशा कार्यक्रमात येऊन शुभेच्छा देणे, हा आचारसंहिता भंगाचा प्रकार होत नाही. (सरकारी कार्यालयांशी संबंधित अडचणी / प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता : asezaletar@gmail.com)

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग