शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'प्रहार'कडून शेतकरी कुटुंबातील वैशाली येडेंना लोकसभेची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 14:48 IST

वैशाली येडे यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुले असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. तसेच एका वर्षापासून त्या नाटक क्षेत्राशी निगडीत आहेत.

मुंबई - सरकारविरुद्ध अनोख्या पद्धतीने आंदोलने करून आपल्या मागण्या मान्य करून घेणारे अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे यांना यवतमाळमधून लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

यवतमाळमध्ये झालेल्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकरी विधवा महिलांचे आणि सारस्वतांच्या समस्या निर्धास्तपणे मांडणाऱ्या वैशाली येडे यांचे नाव चर्चेत आहे. यासाठी संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. परंतु वैशाली येडे यांच्याकडून या संदर्भात अद्याप होकार कळविण्यात आलेला नाही.

महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. याच जिल्ह्यात ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले होते. त्यावेळी शेतकरी महिला वैशाली येडे यांनी उद्घाटक म्हणून शेतकरी समस्या आणि शेतकरी विधवा महिलांच्या समस्या मांडल्या होत्या.

वैशाली येडे यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुले असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. तसेच एका वर्षापासून त्या नाटक क्षेत्राशी निगडीत आहेत. दरम्यान यवतमाळ-वाशीम मतदार संघातून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांनी संधी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBacchu Kaduबच्चू कडू