शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन्ही जागांवर विजय मिळणार : राजु शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 16:40 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. २३ रोजी काय निकाल लागणार याची धाकधुक उमेदवारांना लागली आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवले आहे. दोन दिवसात निकाल हाती येणार असून, दोन्ही ठिकाणी आमचाच विजय होणार असल्याचा दावा खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात जमिनीवर जाऊन काम केले आहे. त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. गतवेळच्या मताधिक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून येईल, असेही शेट्टी म्हणाले. ते एका, वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. २३ रोजी काय निकाल लागणार याची धाकधुक उमेदवारांना लागली आहे. दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन्ही उमेदवार मताधिक्क्याने विजय होणार असल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे. मतदारांच्या मनात काय आहे, हे चांगले माहीत आहे. निकालाची वाट पाहत असून मनामध्ये कसल्याही प्रकारची धाकधुक असण्याची गरज नाही. असे राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर सांगली मतदारसंघातून विशाल पाटील तर हातकणंगलेमधून राजू शेट्टी स्वतः रिंगणात होते.

खासदार शेट्टी एक्झिट पोल बाबत बोलताना म्हणाले की, सगळीकडे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. पण काही माध्यमांमध्ये असे वृत्त जाणीवपूर्वक पसरविले जातात, जेणेकरून सट्टेबाजांना सट्टा खेळायला सोपे जावे. सट्टा घेणारे मालामाल होतील, पण सट्टा खेळणारे बरबाद होतील. याशिवाय दुसरे काही होणार नसून जो निकाल आहे, तो तसाच लागेल असा विश्वास सुद्धा यावेळी शेट्टी यांनी व्यक्त केला

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालRaju Shettyराजू शेट्टीSangliसांगलीhatkanangle-pcहातकणंगले