शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

'आजी, वडिलांच्या बलिदानाचे नाव घेऊन राहुल मतं मागत नाहीत अन् मोदी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:01 IST

देशाच्या सैन्याला मोदींची सेना म्हणून संबोधले जाते. मत मागण्यासाठी तुम्हाला सैन्याची गरज का पडते, असा सवाल उर्मिला मातोंडकर हिने उपस्थित केला. त्याचवेळी काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांचे आणि काँग्रेसच्या विचारधारेचे कौतुक केले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी भाजपकडून सैन्याच्या बलिदानाचा वापर करण्यात येत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी बालाकोट एअरस्ट्राईकच्या नावावर जाहिर सभांमधून मत मागत आहेत. हे अत्यंत चुकीचे वाटते. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अतिरेकी हल्ल्यात आजी आणि वडिलांना गमावले तरी देखील त्यांच्या नावे कधी मतं मागितली नाही, त्यामुळे त्यांचे कौतुक वाटते, असं अभिनेत्री आणि काँग्रेसची लोकसभेची उमेदवार उर्मिला मातोंडकरने म्हटले आहे.

देशाच्या सैन्याला मोदींची सेना म्हणून संबोधले जाते. मत मागण्यासाठी तुम्हाला सैन्याची गरज का पडते, असा सवाल उर्मिला मातोंडकर हिने उपस्थित केला. त्याचवेळी काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांचे आणि काँग्रेसच्या विचारधारेचे कौतुक केले. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला बोलत होती.

मागील पाच वर्षांत राहुल गांधी यांना सतत टार्गेट करण्यात आले आहे. प्रत्येक पातळीवर राहुल यांना हिणवण्यात आले आहे. राहुल यांनी अतिरेकी हल्ल्यात स्वत:च्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडिल राजीव गांधी यांना गमावले. वडिलांचा देह ज्या व्यक्तीला पाहता आला नसल्याचे उर्मिलाने सांगितले. मात्र तरी देखील मागील पाच वर्षांपासून ती व्यक्त जनमाणसात जात आहे. त्यांच्या अडचणी समजूत घेत आहे. विशेष म्हणजे आजी आणि वडिलांच्या बलिदानाचे राजकारण करताना दिसत नाही, असं सांगताना मोदी आणि भाजपकडून सैन्याच्या पराक्रमाचे करण्यात येत असलेले भांडवल यावर उर्मिलाने कडाडून टीका केली.

पाच वर्षांपूर्वी खोटे आश्वासने देऊन भाजपने सत्ता मिळवली. मात्र जनतेने दिलेल्या बहुमताचा भाजपकडून अपमान करण्यात आला आहे. भारतीय सेनेला निवडणुकीच्या प्रचारात मोदींची सेना म्हणणे चुकीचे आहे. सैन्याच्या शौर्यावर मत मागण्यामुळे प्रचंड तिडीक येत असल्याचे उर्मिलाने म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथे झालेल्या जाहिर सभेत उपस्थितांना सैन्याच्या शौर्यासाठी भाजपला मत देण्याचे आवाहन केले होते. तसेच भाजपला मत देऊन शहिद जवानांना श्रद्धांजली देण्याचे आवाहन केले होते. त्यावर विरोधकांनी कडाडून टीका केली. त्यावर उर्मिलाने देखील जोरदार हल्ला चढवला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUrmila Matondkarउर्मिला मातोंडकरNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी