शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

'आजी, वडिलांच्या बलिदानाचे नाव घेऊन राहुल मतं मागत नाहीत अन् मोदी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:01 IST

देशाच्या सैन्याला मोदींची सेना म्हणून संबोधले जाते. मत मागण्यासाठी तुम्हाला सैन्याची गरज का पडते, असा सवाल उर्मिला मातोंडकर हिने उपस्थित केला. त्याचवेळी काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांचे आणि काँग्रेसच्या विचारधारेचे कौतुक केले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी भाजपकडून सैन्याच्या बलिदानाचा वापर करण्यात येत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी बालाकोट एअरस्ट्राईकच्या नावावर जाहिर सभांमधून मत मागत आहेत. हे अत्यंत चुकीचे वाटते. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अतिरेकी हल्ल्यात आजी आणि वडिलांना गमावले तरी देखील त्यांच्या नावे कधी मतं मागितली नाही, त्यामुळे त्यांचे कौतुक वाटते, असं अभिनेत्री आणि काँग्रेसची लोकसभेची उमेदवार उर्मिला मातोंडकरने म्हटले आहे.

देशाच्या सैन्याला मोदींची सेना म्हणून संबोधले जाते. मत मागण्यासाठी तुम्हाला सैन्याची गरज का पडते, असा सवाल उर्मिला मातोंडकर हिने उपस्थित केला. त्याचवेळी काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांचे आणि काँग्रेसच्या विचारधारेचे कौतुक केले. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला बोलत होती.

मागील पाच वर्षांत राहुल गांधी यांना सतत टार्गेट करण्यात आले आहे. प्रत्येक पातळीवर राहुल यांना हिणवण्यात आले आहे. राहुल यांनी अतिरेकी हल्ल्यात स्वत:च्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडिल राजीव गांधी यांना गमावले. वडिलांचा देह ज्या व्यक्तीला पाहता आला नसल्याचे उर्मिलाने सांगितले. मात्र तरी देखील मागील पाच वर्षांपासून ती व्यक्त जनमाणसात जात आहे. त्यांच्या अडचणी समजूत घेत आहे. विशेष म्हणजे आजी आणि वडिलांच्या बलिदानाचे राजकारण करताना दिसत नाही, असं सांगताना मोदी आणि भाजपकडून सैन्याच्या पराक्रमाचे करण्यात येत असलेले भांडवल यावर उर्मिलाने कडाडून टीका केली.

पाच वर्षांपूर्वी खोटे आश्वासने देऊन भाजपने सत्ता मिळवली. मात्र जनतेने दिलेल्या बहुमताचा भाजपकडून अपमान करण्यात आला आहे. भारतीय सेनेला निवडणुकीच्या प्रचारात मोदींची सेना म्हणणे चुकीचे आहे. सैन्याच्या शौर्यावर मत मागण्यामुळे प्रचंड तिडीक येत असल्याचे उर्मिलाने म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथे झालेल्या जाहिर सभेत उपस्थितांना सैन्याच्या शौर्यासाठी भाजपला मत देण्याचे आवाहन केले होते. तसेच भाजपला मत देऊन शहिद जवानांना श्रद्धांजली देण्याचे आवाहन केले होते. त्यावर विरोधकांनी कडाडून टीका केली. त्यावर उर्मिलाने देखील जोरदार हल्ला चढवला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUrmila Matondkarउर्मिला मातोंडकरNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी