शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

'आजी, वडिलांच्या बलिदानाचे नाव घेऊन राहुल मतं मागत नाहीत अन् मोदी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:01 IST

देशाच्या सैन्याला मोदींची सेना म्हणून संबोधले जाते. मत मागण्यासाठी तुम्हाला सैन्याची गरज का पडते, असा सवाल उर्मिला मातोंडकर हिने उपस्थित केला. त्याचवेळी काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांचे आणि काँग्रेसच्या विचारधारेचे कौतुक केले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी भाजपकडून सैन्याच्या बलिदानाचा वापर करण्यात येत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी बालाकोट एअरस्ट्राईकच्या नावावर जाहिर सभांमधून मत मागत आहेत. हे अत्यंत चुकीचे वाटते. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अतिरेकी हल्ल्यात आजी आणि वडिलांना गमावले तरी देखील त्यांच्या नावे कधी मतं मागितली नाही, त्यामुळे त्यांचे कौतुक वाटते, असं अभिनेत्री आणि काँग्रेसची लोकसभेची उमेदवार उर्मिला मातोंडकरने म्हटले आहे.

देशाच्या सैन्याला मोदींची सेना म्हणून संबोधले जाते. मत मागण्यासाठी तुम्हाला सैन्याची गरज का पडते, असा सवाल उर्मिला मातोंडकर हिने उपस्थित केला. त्याचवेळी काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांचे आणि काँग्रेसच्या विचारधारेचे कौतुक केले. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला बोलत होती.

मागील पाच वर्षांत राहुल गांधी यांना सतत टार्गेट करण्यात आले आहे. प्रत्येक पातळीवर राहुल यांना हिणवण्यात आले आहे. राहुल यांनी अतिरेकी हल्ल्यात स्वत:च्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडिल राजीव गांधी यांना गमावले. वडिलांचा देह ज्या व्यक्तीला पाहता आला नसल्याचे उर्मिलाने सांगितले. मात्र तरी देखील मागील पाच वर्षांपासून ती व्यक्त जनमाणसात जात आहे. त्यांच्या अडचणी समजूत घेत आहे. विशेष म्हणजे आजी आणि वडिलांच्या बलिदानाचे राजकारण करताना दिसत नाही, असं सांगताना मोदी आणि भाजपकडून सैन्याच्या पराक्रमाचे करण्यात येत असलेले भांडवल यावर उर्मिलाने कडाडून टीका केली.

पाच वर्षांपूर्वी खोटे आश्वासने देऊन भाजपने सत्ता मिळवली. मात्र जनतेने दिलेल्या बहुमताचा भाजपकडून अपमान करण्यात आला आहे. भारतीय सेनेला निवडणुकीच्या प्रचारात मोदींची सेना म्हणणे चुकीचे आहे. सैन्याच्या शौर्यावर मत मागण्यामुळे प्रचंड तिडीक येत असल्याचे उर्मिलाने म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथे झालेल्या जाहिर सभेत उपस्थितांना सैन्याच्या शौर्यासाठी भाजपला मत देण्याचे आवाहन केले होते. तसेच भाजपला मत देऊन शहिद जवानांना श्रद्धांजली देण्याचे आवाहन केले होते. त्यावर विरोधकांनी कडाडून टीका केली. त्यावर उर्मिलाने देखील जोरदार हल्ला चढवला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUrmila Matondkarउर्मिला मातोंडकरNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी