शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

'गर्व से कहो हम निजाम है' म्हणणाऱ्यांचा औरंगाबादमध्ये विजय : नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 10:59 IST

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकमेव उमेदवार औरंगाबाद मतदार संघातून विजयी झाला आहे. शिवसेनच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी यावर प्रतिक्रिया देतांना वंचित बहुजन आघाडीचा समाचार घेतला आहे. औरंगाबादचा निकाल म्हणजे 'हम निजाम है' म्हणणाऱ्यांचा विजय आहे. वंचित आघाडीचा सर्वाधिक फायदा फक्त एमआयएमला झाला असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीबाबत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. प्रकाश आंबेडकर यांचा सुद्धा पराभव झाला. एमआयएमचे इम्तियाज जलिल यांना वंचित आघाडीचे सांगण्यात येत असले तरी ते एमआयएम पक्षाकडून उमेदवार होते. त्यामुळे, त्यांना वंचित बहुजन आघाडीचे खासदार म्हणता येणार नाही. औरंगाबादमध्ये 'गर्व से कहो हम निजाम है' म्हणणाऱ्यांचा विजय झाला आहे. मराठवाड्यात रजाकारांच्या विरोधात मुक्तिसंग्रामात अनेक पिढ्या उतरल्या होत्या, या पिढ्यांना लोकशाहीच्या मार्गाने नेस्तनाभूत करण्याचा काम औरंगाबादच्या जनतेकडून घडवून आणले गेले आहे. अशी खोचक टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ४८ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यात, औरंगाबादमध्ये एमआयएमकडून इम्तियाज जलील यांना रिंगणात उतरवले होते. सलग चार वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनचे नेते चंद्रकात खैरे यांचा जलील यांनी पराभव केला आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Neelam gorheनीलम गो-हेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेImtiaz Jalilइम्तियाज जलील