शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

Lok Sabha Election 2019: प्राप्तिकर विभागाची ४२ मतदारसंघांवर नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 07:05 IST

अर्ध्या तासात कारवाई; निवडणुकीतील काळ्या पैशांवर ठेवणार लक्ष

पुणे : लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या काळ्या पैशांच्या वापराला आळा बसावा यासाठी प्राप्तिकर विभागाने प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दलाची (क्विक रिस्पॉन्स टीम) स्थापना केली आहे. प्राप्तिकरच्या पुण्यातील कार्यालयातून मुंबई वगळता राज्यातील ४८ पैकी ४२ लोकसभा मतदारसंघावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाचे (तपास) महासंचालक दीपक कपूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.प्राप्तिकर विभागाचे (तपास) अतिरिक्त संचालक तथा तपास यंत्रणेचे राज्याचे समन्वयक अजय मोदी, अतिरिक्त संचालक रवी प्रकाश या वेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाचा वापर होऊ नये यासाठी प्राप्तिकर विभागाने सतर्क राहावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्राप्तिकर विभागाने तपास यंत्रणा आणि गुप्तचर विभागाला दक्षतेचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. सहायक आयुक्त अथवा उपायुक्तांच्या देखरेखीखाली पाच अधिकाऱ्यांचे पथक यात असेल. त्या माध्यमातून मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे अथवा मौल्यवान वस्तूंच्या वापरावर नजर ठेवली जाणार आहे.याबाबत माहिती देताना प्राप्तिकर विभागाचे (तपास) महासंचालक कपूर म्हणाले, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ वगळता उर्वरित राज्यातील ४२ मतदारसंघांमधील काळ्या पैशाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पुणे कार्यालयावर असेल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सोमवारी (दि. ११) नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. पाठोपाठ प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दल स्थापण्यात आले. राज्यातील ४२ मतदारसंघांचे नाशिक, नागपूर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर असे पाच विभाग करण्यात आले असून, त्याच्या नियंत्रणाची जबाबदारी अतिरिक्त संचालक आणि चार सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मतदाराला प्रभावित करण्यासाठी पैसे, सोने, चांदी अथवा मौल्यवान वस्तूंचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. निवडणूककाळात काळ्या पैशांचा वापर करताना आढळल्यास, नागरिकांनी प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी चोवीस तास निरीक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तक्रार करण्यासाठी अथवा माहिती देण्यासाठी १८००२३३०७०० अथवा १८००२३३०७०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय ७४९८९७७८९८ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अवघ्या अर्ध्या तासात कारवाई करण्यात येईल.काळा पैसा बाळगणाºयांना मिळणार ‘दंड’निवडणुकीदरम्यान काळा पैसा आढळणाºयांवर प्राप्तिकर विभागाकडून ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी कारवाई होईल. दंडासह ती रक्कम भरावी लागेल.अनेकदा नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून अशा रकमेचा निवडणुकीत वापर केला जातो. त्यामुळे रकमेचा स्रोत देखील तपासण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त पोलीसह संबंधितांवर वेगळी कारवाई करतील.निवडणुकात होणारा काळा पैशांचा वापर रोखण्याची जबाबदारी प्राप्तिकर विभागावर आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती प्राप्तिकर विभागाला टोल-फ्री क्रमांकाद्वारे कळवावी. याशिवाय बँक खात्यातून होणाºया उलाढालीवर देखील नजर ठेवण्यात येणार आहे. संबंधित बँकांनी संशयित व्यवहार, अचानक मोठ्या प्रमाणात झालेली पैशांची उलाढाल याची माहिती कळविल्यास, त्याचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.- दीपक कपूर, महासंचालक(तपास), प्राप्तिकर विभाग

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय