शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 11:02 IST

भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार बुधवारी, एकाच विमानाने मुंबईकडे रवाना झाले होते. अब्दुल सत्तार यांनी याआधी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. त्यातच आता फोडा-फोडीचे आणि बंडखोरी राजकरण पाहायला मिळत आहे. औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार उमेदवारी दिली नसल्यामुळे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. नाराज असलेल्या सत्तार यांनी बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार बुधवारी, एकाच विमानाने मुंबईकडे रवाना झाले होते. अब्दुल सत्तार यांनी याआधी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर सत्तार यांनी खुलासा केला होता की, मी अपक्ष निवडणुक लढवणार असल्याने मदतीसाठी सर्वच नेत्यांची भेट घेत आहोत.औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी सत्तार इच्छुक होते. परंतु, पक्षाने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या सत्तार यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तसेच लोकसभा निवडणूक लढवायची की, नाही यासाठी सत्तार यांनी औरंगाबाद येथील आमखास मैदानावर कार्यकर्ता मेळावा देखील घेतला होता. परंतु, या मेळाव्यात काहीही निर्णय झाला नव्हता.बुधवारी मध्यरात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सत्तार हे एकाच विमामाने मुंबईकडे रवाना झाले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच सत्तार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊन सिल्लोड विधानसभा भाजपकडून लढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९