शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भाजप नेत्यांना सैनिक अन् अतिरेक्यांमधील फरकच कळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 15:30 IST

याआधी आपल्याकडून अनावधानाने असं झाल्याची सारवासारव त्यांनी केली होती. परंतु, आता औरंगाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत पुन्हा एकदा दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४२ अतिरेकी मारल्याचे म्हटले.

मुंबई - काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून भारतावर अतिरेकी हल्ला करण्यात आला होता. या अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहिद झाले होता. या हल्ल्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देताना पाकिस्तानातील अतिरेकी स्थळांवर हल्ले चढवले. त्यात अनेक अतिरेकांना ठार करण्यास यश आल्याचे सांगण्यात येत आहे.

याच मुद्दावर आता सत्ताधारी पक्षाकडून जोरदार राजकारण करण्यात येत आहे. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत सैन्याच्या शौर्याचे श्रेय घेताना दिसत आहे. वास्तविक पाहता प्रचार सभांमध्ये सैन्याच्या कार्यवाहीचा उल्लेख करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मात्र भाजपकडून सैन्य कारवाईचा वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. असं असले तरी स्थानिक पातळीवर या मुद्यांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सैनिक आणि अतिरेकी यांतील फरकच समजेना झाला. त्यामुळे अनेकदा आमच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानचे जवान शहिद केल्याचे वक्तव्य नेतेमंडळी करताना दिसत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणांमध्ये पाकिस्तानने भारताचे ४० अतिरेकी मारल्याचे म्हटले होते. त्यावेळी आपल्याकडून अनावधानाने असं झाल्याची सारवासारव त्यांनी केली होती. परंतु, आता औरंगाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत पुन्हा एकदा दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४२ अतिरेकी मारल्याचे म्हटले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान औरंगाबादचे उपमहापौर आणि भाजप नेेते विजय औताडे यांनी देखील पाकिस्तानच्या अतिरेक्यांना भारताच्या सैनिकांनी शहिद केल्याचे म्हटले. याचा व्हिडिओ रावसाहेब दानवे यांच्या पेजवर उपलब्ध आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय सैन्याचे शौर्य देशभारतील प्रचार सभांमध्ये सांगत आहे. त्याचवेळी राज्यपातळीवर आणि जिल्हा पातळीवर त्याचा कित्ता गिरवण्यात येत आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह स्थानिक नेत्यांना सैन्यांची कारवाई आणि त्यांनी केलेले शौर्य सांगणे जिकीरीचे ठरत असल्याचे सध्याचे चित्र आहे. सैनिक शहिद होत असतात आणि शत्रुला ठार मारले जाते, यातलाच फरकच अनेकदा भाजप नेत्यांना समजत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा