शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

भाजप नेत्यांना सैनिक अन् अतिरेक्यांमधील फरकच कळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 15:30 IST

याआधी आपल्याकडून अनावधानाने असं झाल्याची सारवासारव त्यांनी केली होती. परंतु, आता औरंगाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत पुन्हा एकदा दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४२ अतिरेकी मारल्याचे म्हटले.

मुंबई - काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून भारतावर अतिरेकी हल्ला करण्यात आला होता. या अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहिद झाले होता. या हल्ल्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देताना पाकिस्तानातील अतिरेकी स्थळांवर हल्ले चढवले. त्यात अनेक अतिरेकांना ठार करण्यास यश आल्याचे सांगण्यात येत आहे.

याच मुद्दावर आता सत्ताधारी पक्षाकडून जोरदार राजकारण करण्यात येत आहे. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत सैन्याच्या शौर्याचे श्रेय घेताना दिसत आहे. वास्तविक पाहता प्रचार सभांमध्ये सैन्याच्या कार्यवाहीचा उल्लेख करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मात्र भाजपकडून सैन्य कारवाईचा वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. असं असले तरी स्थानिक पातळीवर या मुद्यांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सैनिक आणि अतिरेकी यांतील फरकच समजेना झाला. त्यामुळे अनेकदा आमच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानचे जवान शहिद केल्याचे वक्तव्य नेतेमंडळी करताना दिसत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणांमध्ये पाकिस्तानने भारताचे ४० अतिरेकी मारल्याचे म्हटले होते. त्यावेळी आपल्याकडून अनावधानाने असं झाल्याची सारवासारव त्यांनी केली होती. परंतु, आता औरंगाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत पुन्हा एकदा दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४२ अतिरेकी मारल्याचे म्हटले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान औरंगाबादचे उपमहापौर आणि भाजप नेेते विजय औताडे यांनी देखील पाकिस्तानच्या अतिरेक्यांना भारताच्या सैनिकांनी शहिद केल्याचे म्हटले. याचा व्हिडिओ रावसाहेब दानवे यांच्या पेजवर उपलब्ध आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय सैन्याचे शौर्य देशभारतील प्रचार सभांमध्ये सांगत आहे. त्याचवेळी राज्यपातळीवर आणि जिल्हा पातळीवर त्याचा कित्ता गिरवण्यात येत आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह स्थानिक नेत्यांना सैन्यांची कारवाई आणि त्यांनी केलेले शौर्य सांगणे जिकीरीचे ठरत असल्याचे सध्याचे चित्र आहे. सैनिक शहिद होत असतात आणि शत्रुला ठार मारले जाते, यातलाच फरकच अनेकदा भाजप नेत्यांना समजत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा