शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

भाजप नेत्यांना सैनिक अन् अतिरेक्यांमधील फरकच कळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 15:30 IST

याआधी आपल्याकडून अनावधानाने असं झाल्याची सारवासारव त्यांनी केली होती. परंतु, आता औरंगाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत पुन्हा एकदा दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४२ अतिरेकी मारल्याचे म्हटले.

मुंबई - काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून भारतावर अतिरेकी हल्ला करण्यात आला होता. या अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहिद झाले होता. या हल्ल्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देताना पाकिस्तानातील अतिरेकी स्थळांवर हल्ले चढवले. त्यात अनेक अतिरेकांना ठार करण्यास यश आल्याचे सांगण्यात येत आहे.

याच मुद्दावर आता सत्ताधारी पक्षाकडून जोरदार राजकारण करण्यात येत आहे. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत सैन्याच्या शौर्याचे श्रेय घेताना दिसत आहे. वास्तविक पाहता प्रचार सभांमध्ये सैन्याच्या कार्यवाहीचा उल्लेख करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मात्र भाजपकडून सैन्य कारवाईचा वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. असं असले तरी स्थानिक पातळीवर या मुद्यांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सैनिक आणि अतिरेकी यांतील फरकच समजेना झाला. त्यामुळे अनेकदा आमच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानचे जवान शहिद केल्याचे वक्तव्य नेतेमंडळी करताना दिसत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणांमध्ये पाकिस्तानने भारताचे ४० अतिरेकी मारल्याचे म्हटले होते. त्यावेळी आपल्याकडून अनावधानाने असं झाल्याची सारवासारव त्यांनी केली होती. परंतु, आता औरंगाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत पुन्हा एकदा दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४२ अतिरेकी मारल्याचे म्हटले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान औरंगाबादचे उपमहापौर आणि भाजप नेेते विजय औताडे यांनी देखील पाकिस्तानच्या अतिरेक्यांना भारताच्या सैनिकांनी शहिद केल्याचे म्हटले. याचा व्हिडिओ रावसाहेब दानवे यांच्या पेजवर उपलब्ध आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय सैन्याचे शौर्य देशभारतील प्रचार सभांमध्ये सांगत आहे. त्याचवेळी राज्यपातळीवर आणि जिल्हा पातळीवर त्याचा कित्ता गिरवण्यात येत आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह स्थानिक नेत्यांना सैन्यांची कारवाई आणि त्यांनी केलेले शौर्य सांगणे जिकीरीचे ठरत असल्याचे सध्याचे चित्र आहे. सैनिक शहिद होत असतात आणि शत्रुला ठार मारले जाते, यातलाच फरकच अनेकदा भाजप नेत्यांना समजत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा