शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

भाजप नेत्यांना सैनिक अन् अतिरेक्यांमधील फरकच कळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 15:30 IST

याआधी आपल्याकडून अनावधानाने असं झाल्याची सारवासारव त्यांनी केली होती. परंतु, आता औरंगाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत पुन्हा एकदा दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४२ अतिरेकी मारल्याचे म्हटले.

मुंबई - काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून भारतावर अतिरेकी हल्ला करण्यात आला होता. या अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहिद झाले होता. या हल्ल्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देताना पाकिस्तानातील अतिरेकी स्थळांवर हल्ले चढवले. त्यात अनेक अतिरेकांना ठार करण्यास यश आल्याचे सांगण्यात येत आहे.

याच मुद्दावर आता सत्ताधारी पक्षाकडून जोरदार राजकारण करण्यात येत आहे. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत सैन्याच्या शौर्याचे श्रेय घेताना दिसत आहे. वास्तविक पाहता प्रचार सभांमध्ये सैन्याच्या कार्यवाहीचा उल्लेख करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मात्र भाजपकडून सैन्य कारवाईचा वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. असं असले तरी स्थानिक पातळीवर या मुद्यांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सैनिक आणि अतिरेकी यांतील फरकच समजेना झाला. त्यामुळे अनेकदा आमच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानचे जवान शहिद केल्याचे वक्तव्य नेतेमंडळी करताना दिसत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणांमध्ये पाकिस्तानने भारताचे ४० अतिरेकी मारल्याचे म्हटले होते. त्यावेळी आपल्याकडून अनावधानाने असं झाल्याची सारवासारव त्यांनी केली होती. परंतु, आता औरंगाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत पुन्हा एकदा दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४२ अतिरेकी मारल्याचे म्हटले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान औरंगाबादचे उपमहापौर आणि भाजप नेेते विजय औताडे यांनी देखील पाकिस्तानच्या अतिरेक्यांना भारताच्या सैनिकांनी शहिद केल्याचे म्हटले. याचा व्हिडिओ रावसाहेब दानवे यांच्या पेजवर उपलब्ध आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय सैन्याचे शौर्य देशभारतील प्रचार सभांमध्ये सांगत आहे. त्याचवेळी राज्यपातळीवर आणि जिल्हा पातळीवर त्याचा कित्ता गिरवण्यात येत आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह स्थानिक नेत्यांना सैन्यांची कारवाई आणि त्यांनी केलेले शौर्य सांगणे जिकीरीचे ठरत असल्याचे सध्याचे चित्र आहे. सैनिक शहिद होत असतात आणि शत्रुला ठार मारले जाते, यातलाच फरकच अनेकदा भाजप नेत्यांना समजत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा