शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

ऐतिहासिक मराठा मोर्चांची पार्श्वभूमी असलेल्या औरंगाबादेत मराठा फॅक्टरच 'गेमचेंजर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 15:30 IST

मराठा आरक्षणावरून सरकारकडून होणारी चालढकलपणामुळे मराठा समाजाचा प्रचंड रोष सरकारबद्दल होता. औरंगाबादमध्ये हा रोष प्रत्यक्षात निवडणुकीतून दिसून आला.

मुंबई - देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीत मोदी लाट पुन्हा पाहायला मिळाली. राज्यात युतीला यश मिळाले असताना, शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकात खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मराठा क्रांती मोर्चात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आमदार हर्षवर्धन जाधव यांची मराठा समाजात वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती. त्यातच, लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्याचा घेतलेल्या निर्णयाला मराठा समाजाने त्यांना मोठा पाठींबा दिला.

ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चांची सुरुवात झालेल्या औरंगाबादमध्ये मराठा मतदारांनी सत्तेत असलेल्या युतीच्या उमेदवाराला यावेळी घराचा रस्ता दाखवला. चंद्रकात खैरेंच्या विरोधात मैदानात उतरलेले हर्षवर्धन जाधवांनी स्वत:च्या शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला आणि लोकसभा लढणार असे जाहीर केले. त्यानुसार ते लढले. त्यांना मिळालेली मते ही लक्षणीय आहेत. जाधव यांना मराठा समाजाने भरभरून मते दिली. एखाद्या अपक्ष उमेदवाराला इतकी मते मिळाल्याचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पाहायला मिळाले.

चंद्रकात खैरे यांना ३ लाख ८४ हजार ५५० मते मिळाली तर विजयी उमेदवार ठरलेले इम्तियाज जलील यांना ३ लाख ८९ हजार ४२ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेले आणि औरंगाबादच्या लोकसभा निवडणुकीचे 'गेमचेंजर' ठरलेले हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८३ हजार ७९८ मते मिळाली आहे. प्रत्येक निवडणुकीत खैरे यांच्या हक्काचे असलेले मराठा मते यावेळी जाधव यांच्या पारड्यात पडली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जाधव यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना मराठा समाजाचा मोठा पाठींबा मिळताना पहायला मिळाले. निवडणूक काळात मराठा समाजातील विविध पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी उघडपणे जाधव यांचा प्रचार केला. तिकडे दलित- मुस्लीम मतदार मतांच्या एकत्रीकरणाचा प्रयोग करण्यात जलील यांना यश मिळाले. त्यामुळे या दोन्हीचा फटका खैरे यांना बसला.

मराठा आरक्षणावरून सरकारकडून होणाऱ्या चालढकलपणामुळे मराठा समाजाचा प्रचंड रोष सरकारबद्दल होता. औरंगाबादमध्ये हा रोष प्रत्यक्षात निवडणुकीतून दिसून आला. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना मराठा समाजाने मतदान करू नये, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. औरंगाबाद मधील मराठा मतदारांनी मात्र ते करून दाखवले.

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात जातीय समीकरणांचे अवलोकन केले, तर मराठा- पाटील समाजाचे मते मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते. मराठा क्रांती मोर्चानंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार म्हणून जाधव निवडणुकीत असल्याने मतविभाजन अटळ होते. मतदारसंघात मराठा- पाटील समाजाच्या बैठकींचा जाधव यांनी धडका लावला होता. मराठा मतदारांनी जाधव यांना दिलेल्या पाठिंब्यामुळेच खैरंचा पराभव झाला असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवChandrakant Khaireचंद्रकांत खैरेImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद