शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

ऐतिहासिक मराठा मोर्चांची पार्श्वभूमी असलेल्या औरंगाबादेत मराठा फॅक्टरच 'गेमचेंजर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 15:30 IST

मराठा आरक्षणावरून सरकारकडून होणारी चालढकलपणामुळे मराठा समाजाचा प्रचंड रोष सरकारबद्दल होता. औरंगाबादमध्ये हा रोष प्रत्यक्षात निवडणुकीतून दिसून आला.

मुंबई - देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीत मोदी लाट पुन्हा पाहायला मिळाली. राज्यात युतीला यश मिळाले असताना, शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकात खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मराठा क्रांती मोर्चात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आमदार हर्षवर्धन जाधव यांची मराठा समाजात वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती. त्यातच, लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्याचा घेतलेल्या निर्णयाला मराठा समाजाने त्यांना मोठा पाठींबा दिला.

ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चांची सुरुवात झालेल्या औरंगाबादमध्ये मराठा मतदारांनी सत्तेत असलेल्या युतीच्या उमेदवाराला यावेळी घराचा रस्ता दाखवला. चंद्रकात खैरेंच्या विरोधात मैदानात उतरलेले हर्षवर्धन जाधवांनी स्वत:च्या शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला आणि लोकसभा लढणार असे जाहीर केले. त्यानुसार ते लढले. त्यांना मिळालेली मते ही लक्षणीय आहेत. जाधव यांना मराठा समाजाने भरभरून मते दिली. एखाद्या अपक्ष उमेदवाराला इतकी मते मिळाल्याचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पाहायला मिळाले.

चंद्रकात खैरे यांना ३ लाख ८४ हजार ५५० मते मिळाली तर विजयी उमेदवार ठरलेले इम्तियाज जलील यांना ३ लाख ८९ हजार ४२ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेले आणि औरंगाबादच्या लोकसभा निवडणुकीचे 'गेमचेंजर' ठरलेले हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८३ हजार ७९८ मते मिळाली आहे. प्रत्येक निवडणुकीत खैरे यांच्या हक्काचे असलेले मराठा मते यावेळी जाधव यांच्या पारड्यात पडली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जाधव यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना मराठा समाजाचा मोठा पाठींबा मिळताना पहायला मिळाले. निवडणूक काळात मराठा समाजातील विविध पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी उघडपणे जाधव यांचा प्रचार केला. तिकडे दलित- मुस्लीम मतदार मतांच्या एकत्रीकरणाचा प्रयोग करण्यात जलील यांना यश मिळाले. त्यामुळे या दोन्हीचा फटका खैरे यांना बसला.

मराठा आरक्षणावरून सरकारकडून होणाऱ्या चालढकलपणामुळे मराठा समाजाचा प्रचंड रोष सरकारबद्दल होता. औरंगाबादमध्ये हा रोष प्रत्यक्षात निवडणुकीतून दिसून आला. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना मराठा समाजाने मतदान करू नये, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. औरंगाबाद मधील मराठा मतदारांनी मात्र ते करून दाखवले.

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात जातीय समीकरणांचे अवलोकन केले, तर मराठा- पाटील समाजाचे मते मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते. मराठा क्रांती मोर्चानंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार म्हणून जाधव निवडणुकीत असल्याने मतविभाजन अटळ होते. मतदारसंघात मराठा- पाटील समाजाच्या बैठकींचा जाधव यांनी धडका लावला होता. मराठा मतदारांनी जाधव यांना दिलेल्या पाठिंब्यामुळेच खैरंचा पराभव झाला असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवChandrakant Khaireचंद्रकांत खैरेImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद