शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

ऐतिहासिक मराठा मोर्चांची पार्श्वभूमी असलेल्या औरंगाबादेत मराठा फॅक्टरच 'गेमचेंजर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 15:30 IST

मराठा आरक्षणावरून सरकारकडून होणारी चालढकलपणामुळे मराठा समाजाचा प्रचंड रोष सरकारबद्दल होता. औरंगाबादमध्ये हा रोष प्रत्यक्षात निवडणुकीतून दिसून आला.

मुंबई - देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीत मोदी लाट पुन्हा पाहायला मिळाली. राज्यात युतीला यश मिळाले असताना, शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकात खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मराठा क्रांती मोर्चात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आमदार हर्षवर्धन जाधव यांची मराठा समाजात वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती. त्यातच, लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्याचा घेतलेल्या निर्णयाला मराठा समाजाने त्यांना मोठा पाठींबा दिला.

ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चांची सुरुवात झालेल्या औरंगाबादमध्ये मराठा मतदारांनी सत्तेत असलेल्या युतीच्या उमेदवाराला यावेळी घराचा रस्ता दाखवला. चंद्रकात खैरेंच्या विरोधात मैदानात उतरलेले हर्षवर्धन जाधवांनी स्वत:च्या शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला आणि लोकसभा लढणार असे जाहीर केले. त्यानुसार ते लढले. त्यांना मिळालेली मते ही लक्षणीय आहेत. जाधव यांना मराठा समाजाने भरभरून मते दिली. एखाद्या अपक्ष उमेदवाराला इतकी मते मिळाल्याचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पाहायला मिळाले.

चंद्रकात खैरे यांना ३ लाख ८४ हजार ५५० मते मिळाली तर विजयी उमेदवार ठरलेले इम्तियाज जलील यांना ३ लाख ८९ हजार ४२ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेले आणि औरंगाबादच्या लोकसभा निवडणुकीचे 'गेमचेंजर' ठरलेले हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८३ हजार ७९८ मते मिळाली आहे. प्रत्येक निवडणुकीत खैरे यांच्या हक्काचे असलेले मराठा मते यावेळी जाधव यांच्या पारड्यात पडली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जाधव यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना मराठा समाजाचा मोठा पाठींबा मिळताना पहायला मिळाले. निवडणूक काळात मराठा समाजातील विविध पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी उघडपणे जाधव यांचा प्रचार केला. तिकडे दलित- मुस्लीम मतदार मतांच्या एकत्रीकरणाचा प्रयोग करण्यात जलील यांना यश मिळाले. त्यामुळे या दोन्हीचा फटका खैरे यांना बसला.

मराठा आरक्षणावरून सरकारकडून होणाऱ्या चालढकलपणामुळे मराठा समाजाचा प्रचंड रोष सरकारबद्दल होता. औरंगाबादमध्ये हा रोष प्रत्यक्षात निवडणुकीतून दिसून आला. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना मराठा समाजाने मतदान करू नये, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. औरंगाबाद मधील मराठा मतदारांनी मात्र ते करून दाखवले.

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात जातीय समीकरणांचे अवलोकन केले, तर मराठा- पाटील समाजाचे मते मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते. मराठा क्रांती मोर्चानंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार म्हणून जाधव निवडणुकीत असल्याने मतविभाजन अटळ होते. मतदारसंघात मराठा- पाटील समाजाच्या बैठकींचा जाधव यांनी धडका लावला होता. मराठा मतदारांनी जाधव यांना दिलेल्या पाठिंब्यामुळेच खैरंचा पराभव झाला असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवChandrakant Khaireचंद्रकांत खैरेImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद