शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

अब्दुल सत्तार यांच्या 'ऑफर'चा खोतकर यांच्याकडून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 17:38 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला युतीधर्म समजावून सांगितल्याचे अर्जुन खोतकर यांचे म्हणाले.

औरंगाबाद - जालना लोकसभा मतदार संघातील तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटला आहे. हा तिढा सुटल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या ऑफर विषयी खुलासा केला.

एक वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खोतकर म्हणाले, आपण याआधी अनेकदा लोकसभा निवडणुकीत दानवे यांच्यासाठी काम केले आहे. यापुढेही काम करणार आहे. मी कडवट शिवसैनिक, दगाफटका करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला युतीधर्म समजावून सांगितला. माझ्यावर जी जबाबदारी पक्षाने टाकली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे खोतकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी खोतकर यांना सत्तार यांच्या भेटीविषयी विचारण्यात आले. त्यावेळी खोतकर म्हणाले, सत्तार माझे चांगले मित्र असून माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांच्याशी माझी मैत्री कायम राहिल. मी दुखावलेलो होतो. त्यांनी मैत्रीच्या नात्याने मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यामुळेच सत्तार यांनी आपण 'गुड न्यूज' देणार असल्याचे म्हटले होते, असा खुलासा देखील खोतकर यांनी केला आहे.

मागील अनेक दिवसांपासून खोतकर-दानवे यांच्या शीतयुद्धामुळे जालना लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याची चर्चा सुरू होती. अर्जुन खोतकर यांनी काँग्रेस नेत्यांच्याही भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवणार अशा चर्चा मतदारसंघात सुरू होत्या. मात्र खोतकर यांनी माघार घेतल्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस