शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

लोकसभेचा रणसंग्राम: सर्वच पक्षांत आयारामांना संधी, निष्ठावंतांना ठेंगा!

By यदू जोशी | Updated: March 26, 2019 06:46 IST

निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयत्यावेळी बाहेरुन आलेल्या आयारामांना उमेदवारी देण्याचे पेव सध्या सर्वच राजकीय पक्षात फुटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले तर उमेदवारी मिळू शकते, असा संदेश यातून गेला आहे.

मुंबई : निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयत्यावेळी बाहेरुन आलेल्या आयारामांना उमेदवारी देण्याचे पेव सध्या सर्वच राजकीय पक्षात फुटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले तर उमेदवारी मिळू शकते, असा संदेश यातून गेला आहे.भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस अशा प्रमुख राजकीय पक्षांनी अशा आयारमांना गोंजारले आहे. याची सुरुवात अहमदनगरमधून झाली. भाजपाचे निष्ठावंत खासदार दिलीप गांधी यांना घरी बसवून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ.सुजय यांच्या हाती कमळ देण्यात आले आहे. सुजय यांनी भाजपावर गेल्या महिन्यांमध्ये टोकाची टीका केली होती.चंद्रपूरमध्ये लोकसभेची उमेदवारी मिळालेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे वषार्नुवर्षे कट्टर शिवसैनिक होते. गेल्या आठवड्यात त्यांनी आमदारकीचा आणि शिवसेनेचा राजीनामा दिला. काँग्रेसने विनायक बांगडे यांना दिलेली उमेदवारी बदलून ती धानोरकर यांना दिली. दिंडोरीतील भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती पवार या परवापर्यंत राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष होत्या. भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना बाहेरचा रस्ता दाखवून भारती यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. भारती यांचे सासरे माजी मंत्री ए.टी.पवार हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा अशा तिन्ही पक्षांमध्ये होते.रामटेकमध्ये काँग्रेसची उमेदवारी मिळालेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक उत्तर नागपूरमधून बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर लढली. ते दुसऱ्या क्रमांकावर होते.माढामधून भाजपाची उमेदवारी मिळालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर परवापर्यंत सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नरेंद्र पाटील सातारा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर लढणार आहेत. हातकणंगलेतील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. बारामतीमध्ये भाजपाने उमेदवारी दिलेल्या कांचन कुल कोणत्याही पक्षात नव्हत्या पण त्यांचे पती राहुल कुल राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आहेत. नंदुरबारमधील भाजपाच्या खासदार डॉ.हीना गावित यांचे वडील डॉ.विजयकुमार गावित यांचा प्रवास काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा असा आहे. कोल्हापुरातील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीचे खासदार होते.अनेकांची पार्श्वभूमी पक्षांतराचीचराज्यातील काही महत्त्वाच्या उमेदवारांची या निवडणुकीपूर्वी पक्षांतर केले नसले तरी त्यांची पार्श्वभूमी पक्षांतराची आहे. खासदार रामदास तडस - वर्धा (काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा), नाना पटोेले - नागपूर (काँग्रेस-भाजपा-काँग्रेस), सांगलीचे खासदार संजयकाका पाटील (राष्ट्रवादी-भाजपा), धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे (शिवसेना-भाजपा), भिवंडीचे खासदार कपिल पाटील (राष्ट्रवादी-भाजपा), शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे (भाजपा-शिवसेना), नांदेडमधील भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर (काँग्रेस-शिवसेना-भाजपा), नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (शिवसेना-मनसे-शिवसेना), रामटेकचे खासदार कृपाल तुमाने (काँग्रेस-शिवसेना) यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक