शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

'नेत्यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट, मग शेतकरी आत्महत्येनंतर का नाही' ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 12:56 IST

नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस केवळ सहानुभूतींवर निवडून येतात. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला कायम वाऱ्यावर का सोडलं जातं, असा सवाल करत वैशाली येडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.

मुंबई - देशाच्या इतिहासात अनेक अशा घटना आहेत, ज्यामध्ये राजकीय नेत्याचे निधन झाल्यानंतर सहानुभूतीची लाट येते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर देशात सहानुभूतीची अशीच लाट आली होती. राज्यातही केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये त्यांची कन्या प्रितम मुंडे सहानुभूतीच्या लाटेमुळे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्या होत्या. मात्र अशी लाट शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी का येत नाही, असा सवाल प्रहारच्या यवतमाळ मतदार संघातील लोकसभेच्या उमेदवार वैशाली येडे यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.

नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस केवळ सहानुभूतींवर निवडून येतात. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला कायम वाऱ्यावर का सोडलं जातं, असा सवाल करत वैशाली येडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. राजकारणाचे शुद्धीकरण करायला हवं, सर्वसामान्यांना ही लोक प्रतिनिधीत्व करायला मिळावं, अशी टॅग लाईन वैशाली येडे यांच्या प्रचारात देण्यात आली आहे.

वैशाली येडे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असून त्यांच्या पतीने कर्जबाजारीपणाला आणि सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांना प्रहार संघटनेने लोकसभेचे तिकीट दिले आहे. याआधी त्यांनी एसटी बसमधून आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे वैशाली सांगतात.

वैशाली यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने ७ वर्षांपूर्वी आपली जीवनयात्रा संपवली होती. परंतु, दुःखावर मात करत दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या वैशाली यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या व्यथा मांडण्याचे काम केले आहे. यवतमाळ येथे झालेल्या आणि गाजलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन वैशाली यांच्या हस्ते झाले होते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBachhu Kaduबच्चू कडू