शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

'नेत्यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट, मग शेतकरी आत्महत्येनंतर का नाही' ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 12:56 IST

नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस केवळ सहानुभूतींवर निवडून येतात. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला कायम वाऱ्यावर का सोडलं जातं, असा सवाल करत वैशाली येडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.

मुंबई - देशाच्या इतिहासात अनेक अशा घटना आहेत, ज्यामध्ये राजकीय नेत्याचे निधन झाल्यानंतर सहानुभूतीची लाट येते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर देशात सहानुभूतीची अशीच लाट आली होती. राज्यातही केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये त्यांची कन्या प्रितम मुंडे सहानुभूतीच्या लाटेमुळे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्या होत्या. मात्र अशी लाट शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी का येत नाही, असा सवाल प्रहारच्या यवतमाळ मतदार संघातील लोकसभेच्या उमेदवार वैशाली येडे यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.

नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस केवळ सहानुभूतींवर निवडून येतात. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला कायम वाऱ्यावर का सोडलं जातं, असा सवाल करत वैशाली येडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. राजकारणाचे शुद्धीकरण करायला हवं, सर्वसामान्यांना ही लोक प्रतिनिधीत्व करायला मिळावं, अशी टॅग लाईन वैशाली येडे यांच्या प्रचारात देण्यात आली आहे.

वैशाली येडे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असून त्यांच्या पतीने कर्जबाजारीपणाला आणि सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांना प्रहार संघटनेने लोकसभेचे तिकीट दिले आहे. याआधी त्यांनी एसटी बसमधून आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे वैशाली सांगतात.

वैशाली यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने ७ वर्षांपूर्वी आपली जीवनयात्रा संपवली होती. परंतु, दुःखावर मात करत दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या वैशाली यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या व्यथा मांडण्याचे काम केले आहे. यवतमाळ येथे झालेल्या आणि गाजलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन वैशाली यांच्या हस्ते झाले होते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBachhu Kaduबच्चू कडू