शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

अशी होती, भारतातील पहिली लोकसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 16:07 IST

मतदान केंद्र दूर असल्याने त्यावेळी लोकांना सायकल,पायी किंवा बैलगाडीचा वापर करावा लागला होता. त्यावेळी मतदारांना स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा देण्यात आली होती. बॅलेट पेपर बॉक्स बनवण्यासाठी अंदाजे ८ हजार २०० टन स्टीलचा वापर करण्यात आला होता.

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. सोशल मिडिया बरोबर वेगवेगळ्या मार्गाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्षांकडून केला जात आहे. प्रत्येक वेळी होणाऱ्या निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी आठवणीत राहत असतात. त्याचप्रमाणे, भारतात झालेली पहिली लोकसभा निवडणूक रंजकच ठरली होती. २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेबुवारी १९५२ मध्ये पार पडलेली ही निवडणूक पाच महिने चालली होती.

भारतात १९५० मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.  त्यावेळी सुकुमार जैन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त ठरले. त्यानंतर प्रथमच मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये १७ कोटी ६० लाख मतदारांची नोंदणी झाली होती. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २१ वर्षे वयाची अट होती. पाच महिने चाललेल्या या निवडणुकीत १ हजार ८७४ उमेदवार रिंगणात होते.

मतदान केंद्र दूर असल्याने त्यावेळी लोकांना सायकल,पायी किंवा बैलगाडीचा वापर करावा लागला होता. त्यावेळी मतदारांना स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा देण्यात आली होती. बॅलेट पेपर बॉक्स बनवण्यासाठी अंदाजे ८ हजार २०० टन स्टीलचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यावेळच्या मतपेट्या बुलेटप्रुफ होत्या.  

मतदारांना उमेदवाराची ओळख व्हावी म्हणून नावासमोर चिन्ह दिली गेली होती. चिन्ह देण्याची त्यावेळची पद्धत आज कायम आहे. त्या निवडणुकीत सुमारे २८ लाख महिला मतदारांचा समावेश होता. त्यावेळचा देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे निवडणुकीतील चिन्ह बैलं होते. जगात सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असललेल्या भारतातील आजपर्यंतच्या निवडणुकांपैकी देशाची पहिली निवडणुक ऐतिहासिक मानली जाते. त्याचे मुख्य कारण म्हणजे पहिल्या निवडणुकीचा कार्यक्रम तब्बल पाच महिने चालला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस