शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अशी होती, भारतातील पहिली लोकसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 16:07 IST

मतदान केंद्र दूर असल्याने त्यावेळी लोकांना सायकल,पायी किंवा बैलगाडीचा वापर करावा लागला होता. त्यावेळी मतदारांना स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा देण्यात आली होती. बॅलेट पेपर बॉक्स बनवण्यासाठी अंदाजे ८ हजार २०० टन स्टीलचा वापर करण्यात आला होता.

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. सोशल मिडिया बरोबर वेगवेगळ्या मार्गाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्षांकडून केला जात आहे. प्रत्येक वेळी होणाऱ्या निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी आठवणीत राहत असतात. त्याचप्रमाणे, भारतात झालेली पहिली लोकसभा निवडणूक रंजकच ठरली होती. २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेबुवारी १९५२ मध्ये पार पडलेली ही निवडणूक पाच महिने चालली होती.

भारतात १९५० मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.  त्यावेळी सुकुमार जैन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त ठरले. त्यानंतर प्रथमच मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये १७ कोटी ६० लाख मतदारांची नोंदणी झाली होती. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २१ वर्षे वयाची अट होती. पाच महिने चाललेल्या या निवडणुकीत १ हजार ८७४ उमेदवार रिंगणात होते.

मतदान केंद्र दूर असल्याने त्यावेळी लोकांना सायकल,पायी किंवा बैलगाडीचा वापर करावा लागला होता. त्यावेळी मतदारांना स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा देण्यात आली होती. बॅलेट पेपर बॉक्स बनवण्यासाठी अंदाजे ८ हजार २०० टन स्टीलचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यावेळच्या मतपेट्या बुलेटप्रुफ होत्या.  

मतदारांना उमेदवाराची ओळख व्हावी म्हणून नावासमोर चिन्ह दिली गेली होती. चिन्ह देण्याची त्यावेळची पद्धत आज कायम आहे. त्या निवडणुकीत सुमारे २८ लाख महिला मतदारांचा समावेश होता. त्यावेळचा देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे निवडणुकीतील चिन्ह बैलं होते. जगात सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असललेल्या भारतातील आजपर्यंतच्या निवडणुकांपैकी देशाची पहिली निवडणुक ऐतिहासिक मानली जाते. त्याचे मुख्य कारण म्हणजे पहिल्या निवडणुकीचा कार्यक्रम तब्बल पाच महिने चालला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस