शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

अशी होती, भारतातील पहिली लोकसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 16:07 IST

मतदान केंद्र दूर असल्याने त्यावेळी लोकांना सायकल,पायी किंवा बैलगाडीचा वापर करावा लागला होता. त्यावेळी मतदारांना स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा देण्यात आली होती. बॅलेट पेपर बॉक्स बनवण्यासाठी अंदाजे ८ हजार २०० टन स्टीलचा वापर करण्यात आला होता.

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. सोशल मिडिया बरोबर वेगवेगळ्या मार्गाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्षांकडून केला जात आहे. प्रत्येक वेळी होणाऱ्या निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी आठवणीत राहत असतात. त्याचप्रमाणे, भारतात झालेली पहिली लोकसभा निवडणूक रंजकच ठरली होती. २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेबुवारी १९५२ मध्ये पार पडलेली ही निवडणूक पाच महिने चालली होती.

भारतात १९५० मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.  त्यावेळी सुकुमार जैन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त ठरले. त्यानंतर प्रथमच मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये १७ कोटी ६० लाख मतदारांची नोंदणी झाली होती. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २१ वर्षे वयाची अट होती. पाच महिने चाललेल्या या निवडणुकीत १ हजार ८७४ उमेदवार रिंगणात होते.

मतदान केंद्र दूर असल्याने त्यावेळी लोकांना सायकल,पायी किंवा बैलगाडीचा वापर करावा लागला होता. त्यावेळी मतदारांना स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा देण्यात आली होती. बॅलेट पेपर बॉक्स बनवण्यासाठी अंदाजे ८ हजार २०० टन स्टीलचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यावेळच्या मतपेट्या बुलेटप्रुफ होत्या.  

मतदारांना उमेदवाराची ओळख व्हावी म्हणून नावासमोर चिन्ह दिली गेली होती. चिन्ह देण्याची त्यावेळची पद्धत आज कायम आहे. त्या निवडणुकीत सुमारे २८ लाख महिला मतदारांचा समावेश होता. त्यावेळचा देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे निवडणुकीतील चिन्ह बैलं होते. जगात सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असललेल्या भारतातील आजपर्यंतच्या निवडणुकांपैकी देशाची पहिली निवडणुक ऐतिहासिक मानली जाते. त्याचे मुख्य कारण म्हणजे पहिल्या निवडणुकीचा कार्यक्रम तब्बल पाच महिने चालला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस