शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

Lockdown: नगरकरांना इतर जिल्ह्यांत ‘नो एण्ट्री’; आणखी आठ गावांत लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 08:10 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे दहा दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे

अहमदनगर : कोरोना रुग्णांची संख्या दहापेक्षा जास्त झाल्याने जिल्ह्यातील आणखी आठ गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे. त्यानुसार निघोजसह पारनेर तालुक्यातील चार गावे, नेवासा तालुक्यातील एक, संगमनेर तालुक्यातील तीन आणि शेवगाव तालुक्यातील एक अशा आठ गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात बंद झालेल्या गावांची संख्या आता ६८ झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे दहा दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. शाळा, धार्मिक स्थळांसह, दुकाने, वस्तू विक्री, सेवा बंद राहणार आहेत. नागरिकांनाही गावात येण्यास व बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत. याबाबत विभागीय आयुक्त आज येथे येत असून बैठक होणार आहे.

नगरकरांना इतर जिल्ह्यांत ‘नो एण्ट्री’कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ६८ गावे लॉकडाऊन केल्याची बातमी राज्यभर पसरली आहे. इतर जिल्ह्यांतील नागरिकही त्यांच्या नगर येथील नातेवाइकांना फोन करून माहिती घेत आहेत. नगर जिल्ह्यात आम्ही यावे की नाही, अशी विचारणाही केली जात आहे. नगर जिल्ह्यातील नागरिकांची नाशिकला येताना अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. असाच निर्णय औरंगाबाद महापालिका प्रशासनही घेणार आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस