शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लॉकडाऊनमध्ये 33 लाख कृषी ग्राहकांनी बिल भरले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 03:12 IST

महावितरणचे तब्बल ३६ हजार कोटींचे बिल थकले

- विशाल शिर्केपिंपरी-चिंचवड :  टाळेबंदी (लॉकडाऊन) काळामध्ये राज्यातील ३३ लाख ५३ हजार कृषी ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरले नाही. त्यांच्याकडे तब्बल ३५ हजार ७२६ कोटी रुपये थकीत आहेत. इतक्या रकमेची वसुली कशी करायची, असा प्रश्न महावितरणसमोर आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली. जून महिन्यानंतर टाळेबंदी हळूहळू शिथिल करण्यात आली. मात्र, या काळात महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली. एप्रिल ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत कृषीसह घरगुती, औद्योगिक, वाणिज्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा अशा ९८ लाख ५ हजार ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरले नाही. ही रक्कम तब्बल ४७ हजार ४ कोटी इतकी आहे. त्यातील ३५ हजार ७२६ कोटी रुपये ३३ लाख ५३ हजार ४३४ ग्राहकांकडे आहेत, तर उर्वरित ११ हजार २७७ कोटी रुपये कृषी वगळून इतर ग्राहकांकडे आहेत.कृषी विभागातील सर्वाधिक १० लाख थकबाकीदार पुणे प्रादेशिक विभागातील आहेत. मात्र, सर्वाधिक थकबाकी औरंगाबाद आणि कोकण विभागात आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच पुणे प्रादेशिक विभागातील वीज वितरण हानी कमी करण्यासाठी कृषी पंपांसह संबंधित रोहित्रांचे सर्वेक्षण करून अनधिकृत वीज जोडण्या काढण्याचे आदेश प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. तसेच वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीतील वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने मोहीम सुरू केली आहे.वीज ग्राहकांना आवाहन ग्राहकांनी वीजबिल भरावे यासाठी महावितरणने मोहीम सुरू केली आहे. महावितरणने लॉकडाऊन काळात दरम्यान अखंडित वीजपुरवठ्यासाठी केलेले प्रयत्न लक्षात घेऊन ग्राहकांनी बिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.