शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘गुन्ह्यां’चा लोकलच्या वेळापत्रकाला फटका

By admin | Updated: July 8, 2016 01:38 IST

मुंबई उपनगरीय लोकलचे वेळापत्रक तांत्रिक बिघाडांनी जरी विस्कळीत होत असले तरी त्याला काही वेळा रेल्वे हद्दीतील ‘गुन्हे’देखील कारणीभूत ठरतात. रेल्वे हद्दीत होणाऱ्या अनेक

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलचे वेळापत्रक तांत्रिक बिघाडांनी जरी विस्कळीत होत असले तरी त्याला काही वेळा रेल्वे हद्दीतील ‘गुन्हे’देखील कारणीभूत ठरतात. रेल्वे हद्दीत होणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गुन्ह्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रकच तीन महिन्यांत बिघडले असल्याची बाब समोर आली आहे. विविध गुन्ह्यांमुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यांत १00 लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. मागील वर्षाशी तुलना केल्यास त्याचे प्रमाण कमी झाले असून, रेल्वे सुरक्षा दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळेच ही किमया साधण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा पसारा हा चर्चगेट ते डहाणूपर्यंत आहे. या मार्गावरून दररोज १,३00पेक्षा जास्त लोकल फेऱ्या होतात आणि ४0 लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र या प्रवाशांना सातत्याने लोकल विस्कळीत होण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विस्कळीत होण्याला रेल्वे हद्दीतील गुन्हे हे प्रमुख कारण ठरत आहे. रेल्वे हद्दीत अनेक गुन्हे घडत असून, त्यातील काही गुन्ह्यांमुळे तर लोकलचे वेळापत्रक पुरते बिघडत आहे. प्रवाशांकडून लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसमधील चेन ओढणे, ट्रेनमध्ये प्रवाशांमधील वाद, सिग्नल यंत्रणेशी निगडित असलेली बॅटरी किंवा केबल चोरी इत्यादी गुन्ह्यांचा समावेश वेळापत्रक विस्कळीत होण्यास कारणीभूत ठरत आहे. २0१६मधील एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ५४ केसेसची नोंद झाली आहे. यामुळे १00 फेऱ्या रद्द करतानाच जवळपास ४७८ लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला आहे. वर्ष २0१५च्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांशी तुलना केल्यास आता रेल्वे हद्दीतील गुन्ह्यांचे आणि लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होण्याचे प्रमाण बरेचसे कमी झाले आहे. २0१५मध्ये ८१ घटनांची नोंद झाली असून, त्यामुळे ११६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर तब्बल ८२३ फेऱ्यांना उशीर झाला होता. त्यामुळे आता ४२ टक्के वक्तशीरपणात सुधारणा झाली आहे. (प्रतिनिधी)मागील वर्षातील एकट्या जून महिन्यात २४ केसेस दाखल झाल्या होत्या. तर त्यामुळे ५६ फेऱ्या रद्द करतानाच ३१९ फेऱ्यांना लेटमार्क लागला होता. 2016च्या जून महिन्यात फक्त १६ घटनांची नोंद झाली आहे. त्यामुळे ७७ फेऱ्या रद्द होतानाच २११ फेऱ्यांना लेटमार्क लागला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असून, लोकलच्या वक्तशीरपणातही सुधारणा झाली आहे. यापेक्षाही जास्त सुधारणा वेळापत्रकात होईल, याची खबरदारी आम्ही घेऊ. - आनंद झा (प.रे. सुरक्षा दल-वरिष्ठ सुरक्षा आयुक्त)