शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

‘गुन्ह्यां’चा लोकलच्या वेळापत्रकाला फटका

By admin | Updated: July 8, 2016 01:38 IST

मुंबई उपनगरीय लोकलचे वेळापत्रक तांत्रिक बिघाडांनी जरी विस्कळीत होत असले तरी त्याला काही वेळा रेल्वे हद्दीतील ‘गुन्हे’देखील कारणीभूत ठरतात. रेल्वे हद्दीत होणाऱ्या अनेक

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलचे वेळापत्रक तांत्रिक बिघाडांनी जरी विस्कळीत होत असले तरी त्याला काही वेळा रेल्वे हद्दीतील ‘गुन्हे’देखील कारणीभूत ठरतात. रेल्वे हद्दीत होणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गुन्ह्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रकच तीन महिन्यांत बिघडले असल्याची बाब समोर आली आहे. विविध गुन्ह्यांमुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यांत १00 लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. मागील वर्षाशी तुलना केल्यास त्याचे प्रमाण कमी झाले असून, रेल्वे सुरक्षा दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळेच ही किमया साधण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा पसारा हा चर्चगेट ते डहाणूपर्यंत आहे. या मार्गावरून दररोज १,३00पेक्षा जास्त लोकल फेऱ्या होतात आणि ४0 लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र या प्रवाशांना सातत्याने लोकल विस्कळीत होण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विस्कळीत होण्याला रेल्वे हद्दीतील गुन्हे हे प्रमुख कारण ठरत आहे. रेल्वे हद्दीत अनेक गुन्हे घडत असून, त्यातील काही गुन्ह्यांमुळे तर लोकलचे वेळापत्रक पुरते बिघडत आहे. प्रवाशांकडून लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसमधील चेन ओढणे, ट्रेनमध्ये प्रवाशांमधील वाद, सिग्नल यंत्रणेशी निगडित असलेली बॅटरी किंवा केबल चोरी इत्यादी गुन्ह्यांचा समावेश वेळापत्रक विस्कळीत होण्यास कारणीभूत ठरत आहे. २0१६मधील एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ५४ केसेसची नोंद झाली आहे. यामुळे १00 फेऱ्या रद्द करतानाच जवळपास ४७८ लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला आहे. वर्ष २0१५च्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांशी तुलना केल्यास आता रेल्वे हद्दीतील गुन्ह्यांचे आणि लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होण्याचे प्रमाण बरेचसे कमी झाले आहे. २0१५मध्ये ८१ घटनांची नोंद झाली असून, त्यामुळे ११६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर तब्बल ८२३ फेऱ्यांना उशीर झाला होता. त्यामुळे आता ४२ टक्के वक्तशीरपणात सुधारणा झाली आहे. (प्रतिनिधी)मागील वर्षातील एकट्या जून महिन्यात २४ केसेस दाखल झाल्या होत्या. तर त्यामुळे ५६ फेऱ्या रद्द करतानाच ३१९ फेऱ्यांना लेटमार्क लागला होता. 2016च्या जून महिन्यात फक्त १६ घटनांची नोंद झाली आहे. त्यामुळे ७७ फेऱ्या रद्द होतानाच २११ फेऱ्यांना लेटमार्क लागला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असून, लोकलच्या वक्तशीरपणातही सुधारणा झाली आहे. यापेक्षाही जास्त सुधारणा वेळापत्रकात होईल, याची खबरदारी आम्ही घेऊ. - आनंद झा (प.रे. सुरक्षा दल-वरिष्ठ सुरक्षा आयुक्त)