शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागेल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 03:49 IST

सारथी संस्थेबाबत काही जण गैरसमज पसरवून त्याचे राजकारण करत आहेत. सारथी कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नाही.

पुणे : कोरोनामुळे राज्याच्या महसूलात मोठी घट झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीसुध्दा राज्य शासनाला आता कर्ज काढावे लागणार आहे. काही निवडक खाती वगळता अनेक खात्यांच्या निधीला ६० ते ७० टक्क्यापर्यंत कात्री लावावी लागणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागासह सारथी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. ते म्हणाले, निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्यांना मदतीसाठी निधी खर्च होत आहे. त्यामुळे अनेक विभागांच्या निधीला कात्री लावली जाणार आहे. तसेच डॉक्टर, नर्स यांच्यासारख्या कोरोना योद्ध्यांचे वेतन दिले जाईल, मात्र इतर शासकीय कर्मचाºयांच्या वेतनात पुढे मागे होऊ शकते.

सारथी संस्थेबाबत काही जण गैरसमज पसरवून त्याचे राजकारण करत आहेत. सारथी कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नाही. दरवर्षी पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले जाणार आहे. एकाही कर्मचाºयाला काढले नाही. काही कर्मचारी स्वत:हून काम सोडून गेले आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शिष्यवृत्ती व कर्मचाºयांच्या वेतनाची रक्कम देण्यासाठी आवश्यक असलेले ३६ कोटी रूपये मंत्रिमंडळासमोर विषय मांडून मंजूर करून घेतले जातील, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारState Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारी