शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागेल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 03:49 IST

सारथी संस्थेबाबत काही जण गैरसमज पसरवून त्याचे राजकारण करत आहेत. सारथी कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नाही.

पुणे : कोरोनामुळे राज्याच्या महसूलात मोठी घट झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीसुध्दा राज्य शासनाला आता कर्ज काढावे लागणार आहे. काही निवडक खाती वगळता अनेक खात्यांच्या निधीला ६० ते ७० टक्क्यापर्यंत कात्री लावावी लागणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागासह सारथी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. ते म्हणाले, निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्यांना मदतीसाठी निधी खर्च होत आहे. त्यामुळे अनेक विभागांच्या निधीला कात्री लावली जाणार आहे. तसेच डॉक्टर, नर्स यांच्यासारख्या कोरोना योद्ध्यांचे वेतन दिले जाईल, मात्र इतर शासकीय कर्मचाºयांच्या वेतनात पुढे मागे होऊ शकते.

सारथी संस्थेबाबत काही जण गैरसमज पसरवून त्याचे राजकारण करत आहेत. सारथी कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नाही. दरवर्षी पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले जाणार आहे. एकाही कर्मचाºयाला काढले नाही. काही कर्मचारी स्वत:हून काम सोडून गेले आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शिष्यवृत्ती व कर्मचाºयांच्या वेतनाची रक्कम देण्यासाठी आवश्यक असलेले ३६ कोटी रूपये मंत्रिमंडळासमोर विषय मांडून मंजूर करून घेतले जातील, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारState Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारी