शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात आत्महत्या रोखण्याचा अजब फंडा, गेटवरच लावली धमकी देणा-यांची यादी

By admin | Updated: January 3, 2017 16:29 IST

आत्महत्या तसंच आत्मदहन रोखण्यासाठी मंत्रालयाने अजब कल्पना राबवत मंत्रालयाच्या गेटवरच अशा लोकांची यादी लावून टाकली आहे जे आत्महत्या करण्याची शंका आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - आत्महत्या तसंच आत्मदहन रोखण्यासाठी मंत्रालयाने अजब कल्पना राबवत मंत्रालयाच्या गेटवरच अशा लोकांची यादी लावून टाकली आहे जे आत्महत्या करण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात माधव कदम नावाच्या एका शेतक-याने मंत्रालयाबाहेर आत्महत्या केली होती. यानंतर मंत्रालयातील पोलीस सतर्क झाले आणि आत्महत्या करु शकतात अशा लोकांची माहिती काढण्यास सुरुवात केली. 
 
मंत्रालयातील पोलिसांनी मुख्य गेटवर अशा लोकांची यादी आणि फोटो लावले आहेत ज्यांनी भुतकाळात काही समस्या निर्माण केली होती किंवा आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. मंत्रालय सुरक्षेचे प्रमुख पोलीस उपायुक्त शांतिलाल भामरे यांनी, 'आत्महत्या किंवा आत्मदहन करण्याची धमकी देणा-यांची यादी आम्ही तयार करतो. त्याशिवाय आझाद मैदानात निदर्शन करणारेही मंत्रालयासमोर येऊन गोंधळ घालत असतात. हे लोक सरकारी कामकाजात अडथळा आणतात. आम्ही ही यादी गेटवर असणा-या सुरक्षारक्षकाकडे देतो. यामधील कोणी जर मंत्रालयात येताना दिसलं तर त्यांना येण्याचं कारण विचारलं जातं. काही शंका असल्यास त्यांना स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केलं जात,' असं सांगितलं आहे. 
 
'अनेकदा आत्महत्या करण्याच्या हेतूनं मंत्रालयात आलेले लोक आम्ही असं काही करणार नाही हे लिखित स्वरुपात देतात तेव्हाच त्यांना जाऊ दिल जातं,' असंही भामरे यांनी सांगितलं आहे. या यादीमध्ये एकूण 37 नावे होती ज्यामधील तिघांनी लिखित स्वरुपात आश्वासन दिल्याने त्यांची नावे हटवण्यात आली आहेत. लोकांना याची माहिती मिळावी यासाठी मुख्य गेटवर संगीता शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाव्या माळ्यावरील कार्यालयाबाहेर साध्या कपड्यांमध्ये पोलीस नेहमी तैनात असतात. जर कोणावरही हलका संशय जरी आला तर त्या व्यक्तीला तिथेच रोखले जाते. 
 
मार्च 2016 रोजी माधव कदम या शेतक-याने दुष्काळाला कंटाळून मंत्रालयासमोर विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. यानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका झाली होती. यानंतर पोलिसांना पुन्हा अशा घटना होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याचा आदेश देण्यात आला होता.