शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
3
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
4
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
5
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
7
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
8
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
9
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
10
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
11
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
12
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
13
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
14
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
15
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
16
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
17
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
18
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
19
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
20
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!

मशालींच्या प्रकाशात उजळला किल्ले रायगड, पहिला दिवा महाराजांच्या चरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 07:34 IST

आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमामुळे दिवाळी साजरी होते. महाराज आणि मावळे यांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांनी तब्बल ३४५ मशाली प्रज्वलित करून

मुंबई : आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमामुळे दिवाळी साजरी होते. महाराज आणि मावळे यांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांनी तब्बल ३४५ मशाली प्रज्वलित करून हिंदवी स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायगड’ उजाळला. ‘पहिला दिवा महाराजांच्या चरणी त्यानंतर आपल्या घरी’ या निर्धाराने शिवभक्तांनी दिवाळीची पहिली पणती राजदरबारामध्ये प्रज्वलित करून रविवारी शिवचैतन्य सोहळा साजरा केला.दरवर्षी ऐन दिवाळीत किल्ले रायगड अंधारात राहतो. यासाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज रायगड या संस्थेच्या वतीने सलग सहाव्या वर्षी किल्ले रायगड मशालींच्या प्रकाशात उजाळण्यात आला. या देदीप्यमान सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित झाले होते.पारंपरिक वेशभूषेमध्ये उपस्थित असलेल्या शिवभक्तांमध्ये तरुणांचा वर्ग मोठ्या प्रमाणात होता. मशालींच्या उजेडात सर्वप्रथम गडदेवता शिर्काई देवीची पूजा झाल्यानंतर महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ‘एक व्यक्ती, एक मशाल’ याप्रमाणे ३४५ मशाली प्रज्वलित करून महाराजांना मानवंदना देण्यात आली.याआधी राजसदर, शिर्काई मंदिर, जगदिश्वर मंदिर, महाराजांची समाधीस्थळ, वाडेश्वर मंदिर, बाजारपेठ, भवानी कडा यांसारख्या प्रमुख स्थळांवर साफसफाई करून रांगोळ्यांसह फुलांची सजावट करण्यात आली.तसेच, शिवचैतन्य सोहळा पार पडल्यानंतर दुसºया दिवशी सकाळी गडावर फराळ वाटप करण्यात आले. शिवाय, कांदिवली येथील युवा मंचच्या सहकार्याने समितीने गडावरील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंची मदत करण्यात आली.गाजले ‘आम्ही मावळे’शिवचैतन्य सोहळा बोरीवली येथील ‘आम्ही मावळे’ ढोलताशा पथकाने अप्रतिम वादन करून गाजवला. ढोलताशांच्या गजरात पालखी मिरवणूक राजसदरेजवळ येताच नगारखानामध्ये आम्ही मावळे पथकाने आपल्या वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.आमची राज्य सरकारकडे विनंती आहे की, आज शिवरायांच्या नावाने राज्यकारभार होतो. राज्यातील प्रमुख किल्ले दिवाळीत अंधारात असतात. त्यामुळे सरकारने हा दीपोत्सव सरकारी इतमामात करावा, अशी आमची इच्छा आहे. महाराज त्यांचे कोणीच नाहीत का? आमचे कार्य त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते, पण सरकारनेही पुढाकार घ्यायला पाहिजे.- सुनील पवार, अध्यक्ष - श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती

टॅग्स :diwaliदिवाळी