शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरू जातो जीवानिशी...

By admin | Updated: August 22, 2016 03:45 IST

पावसाळा जवळ आला की नालेसफाई, धोकादायक इमारतींच्या बातम्या प्रसिद्ध होतात.

- दीपक देशमुख, भिवंडीपावसाळा जवळ आला की नालेसफाई, धोकादायक इमारतींच्या बातम्या प्रसिद्ध होतात. हल्ली आपल्या अंगावर जबाबदारी नको म्हणून नजरेने अंदाज घेत इमारतींची यादी जाहीर करायची, मालक-भाडेकरूंना नोटिसा बजावायच्या आणि मोकळे व्हायचे, असा पायंडा पडला आहे. पावसाळा सरला की, हे विषय पुढच्या पावसाळ्यापर्यंत तसेच राहतात. ज्या वेळी एखादी धोकादायक इमारत कोसळते, तेव्हा झोपी गेलेले प्रशासन जागे होते आणि सुरू होतो दिखाऊ कारवाईचा सिलसिला. रीतसर धोरण ठरवून, पुनर्वसनाची आखणी करून हा विषय मार्गी का लावला जात नाही, हाच भाडेकरूंचा प्रश्न आहे. पावसाळ्यात कुठल्या ना कुठल्या शहरात धोकादायक इमारती हमखास कोसळतात. अनेक निष्पापांचा जीव जातो. तर काहींना कायमचे अपंगत्व येते. इमारत कोसळली की, रहिवाशांचे अश्रू पुसण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जणू चढाओढच लागते. प्रशासन, अधिकाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जातात. पण, मुळात अशा इमारतींमधील नागरिक ती धोकादायक झाली तरी जीव मुठीत धरून का राहतात, ते घर रिकामे का करत नाही, अशा प्रश्नांची उत्तरे ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी शोधतात. आज बहुतांश पालिकांचे पुनर्वसन धोरणच नसल्याने अशा इमारतींमधील रहिवाशांना प्रसंगी बळजबरीने बाहेर काढले जाते. पण, निवाऱ्याची सोय व्यवस्थित नसल्याने अशा रहिवाशांना त्यांच्या नातेवाइकांकडे किंवा रस्त्यावरच संसार मांडावा लागतो. सामान्य किंवा गरीब कुटुंबांतील रहिवासी या इमारतींमध्ये राहतात. त्यांना दुसरे घर घेणे परवडत नसल्याने ही मंडळी आपल्या कुटुंबासमवेत जीव मुठीत घेऊन राहत असतात. मृत्यूची टांगती तलवार कायम त्यांच्या डोक्यावर असते. पण, परिस्थितीपुढे या मंडळींचा नाइलाज असतो. वास्तविक, अशा इमारतींच्या विकासाबाबत सरकारने निश्चित धोरण आखले पाहिजे किंवा पालिकेकडे पर्यायी राहण्याची व्यवस्था हवी. पण, तसे आज दिसत नाही. महापालिकांकडे आज पुरेशी संक्रमण शिबिरे नाही किंवा जी आहेत येथील दुरवस्था पाहून धोकादायक इमारतींतील नागरिक मृत्यूच्या जबड्यात राहणे पसंत करतात. भिवंडीत गेल्या काही दिवसांत दोन धोकादायक इमारती कोसळून १६ जण ठार झाले. यानंतर प्रशासन जागे झाले. मात्र, नोटीशीव्यतिरिक्त पालिकेने कुठलीही कारवाई करत नसल्याने धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पालिका हद्दीत सुमारे ५०० धोकादायक, १७९ अतिधोकादायक इमारती आहेत. >कुटुंबे रस्त्यावरधोकादायक इमारतींवर कारवाई करण्यास पालिकेने प्रारंभ केला आहे. परंतु, सर्व नियम धाब्यावर बसवून रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरु वात केली. प्रभाग क्र मांक-२ मधील चौधरी इमारतीतील रहिवाशांना पालिकेने नोटीस बजावली आहे. त्यावर, इमारतींमधील रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. पंचनाम्याबाबत विचारणा केली. परंतु, पालिका अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात इमारत रिकामी केली. यामध्ये रामप्पा पुजारी पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. ते तुटपुंज्या पगारावर नोकरी करतात. मुलगा दहावीला, तर मुलगी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला आहे. आता खोली रिकामी केल्यावर हे कुटुंब रस्त्यावर आले आहे. >नियम धाब्यावर : भिवंडी शहरामध्ये सुमारे ३५ ते ४० वर्षे जुन्या इमारती आहेत. यातील काही इमारतींच्या तळ मजल्यावर पॉवरलूम कारखाने आहेत. वरच्या मजल्यावर रहिवासी राहतात. जुन्या झालेल्या इमारतींना रात्रंदिवस चालणाऱ्या पॉवरलूमच्या स्पंदनांमुळे धोका निर्माण होतो. पण, पालिकेने या महत्त्वाच्या बाबीकडे आतापर्यंत दुर्लक्षच केले आहे. औद्योगिक सुरक्षेचे नियमही धाब्यावर बसवले असल्याचे दिसून येते. आर्थिक देवाणघेवाणीशिवाय असे प्रकार होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. >जीव मुठीत धरून शिक्षण : इमारतींमध्ये जसे रहिवासी जीव मुठीत धरून राहतात, त्याचप्रमाणे या अनेक इमारतींमध्ये महापालिकेच्या शाळा भरतात. भविष्यात एखादी दुर्घटना घडली, तर मोठा अनर्थ होईल. अशा परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधींना वाटत नसल्याबद्दल पालकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा इमारतींबाबत पालिकेकडे ठोस उपाययोजना नाही, ही सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा मुंबईप्रमाणे इमारत दुरु स्ती पुनर्रचना मंडळही नाही.