शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

जीवन प्राधिकरणातही बाजोरियांचे घोटाळे

By admin | Updated: July 31, 2016 04:19 IST

सार्वजनिक बांधकाम आणि सिंचन विभागातील कंत्राट गैरप्रकारांमुळे गाजत असताना आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील गोंधळही पुढे आला

नागपूर : यवतमाळच्या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीचे सार्वजनिक बांधकाम आणि सिंचन विभागातील कंत्राट गैरप्रकारांमुळे गाजत असताना आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील गोंधळही पुढे आला आहे. बाजोरिया कन्स्ट्रक्शनच्या जीवन प्राधिकरणातील कंत्राटांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका(क्रमांक३४़/२०१५) यवतमाळच्या जागरुक युवकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.ओम पंजाबराव ठाकरे (उमरसरा यवतमाळ) असे या युवकाचे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया आणि त्यांचे बंधू यवतमाळ नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक सुमित बाजोरिया यांच्याशी संबंधित ही बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. या कंपनीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नियमबाह्य कामे करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांना प्राधिकरणाच्या अभियंत्यांचे पाठबळ लाभल्याचे याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, करजगाव, धुळापूर, सांगली (रेल्वे) प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचा कालावधी १८ महिने होता. कामाचे मूल्य ३ कोटी २७ लाख ७ हजार ८१७ रुपये होते. बाजोरिया कंपनीने हे काम १० वर्षे ६ महिने चालू ठेवले. करारनाम्याच्या अट क्रमांक २ आणि ३ अंतर्गत आवश्यक कार्यवाही करून कंत्राटदारावर उत्तरदायित्व निश्चित करण्याऐवजी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता अंतिम देयक तयार केले गेले. बाजोरिया कंपनीने अपूर्णावस्थेत सोडलेले हे काम पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या निविदा काढण्यात आल्या. पुन्हा निविदा काढण्याचे कृत्य करण्यामागे बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला उपकृत करुन त्या कंपनीचे उत्तरदायित्व समाप्त करण्याचा घाट आहे. ते कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. या उलट संबंधित कार्यकारी अभियंत्याने अपूर्ण अवस्थेत असलेले काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले असून त्याचा जावक पुस्तिका क्रमांक १२६४ असा दाखविण्यात आला आहे. परंतु जावक पुस्तिकेत या क्रमांकावर असे प्रमाणपत्र निर्गमित केल्याची नोंदच नाही. याच प्रमाणपत्रात काम पूर्ण झालेले असून, संबंधित विभागाला हस्तांतरित करण्यात आल्याची नोंद आहे. परंतु याच विभागाने जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजना यांना पाठविलेल्या अहवालात काम हस्तांतरित झालेले नसल्याचे कळविले आहे.बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीचे सार्वजनिक बांधकाम आणि सिंचन विभागातही अनेक घोळ आहे. त्यासंबंधीही याचिका दाखल आहे.न्यायालयाने याप्रकरणी जीवन प्राधिकरणाला नोटीस बजावली असून शपथपत्र मागितले आहे. त्यावर गुरूवार ४ आॅगष्ट रोजी पुढील सुनावणी होत आहे. (प्रतिनिधी)