शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

बाबांचे जीवन ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण

By admin | Updated: July 1, 2014 00:13 IST

बाबा आमटे हे ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण आयुष्य जगले, असे त्यांचे पुत्र आणि ज्येष्ठ समाज कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे सांगितले.

पुणो : घरची जमीनदारी असतानाही कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभारणारे आणि योग्य वेळ येताच कामातून निवृत्त होऊन नव्या पिढीला संधी द्यायचा मोठेपणा दाखवणारे बाबा आमटे हे ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण आयुष्य जगले, असे त्यांचे पुत्र आणि ज्येष्ठ समाज कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे सांगितले.
माहेर-महिला प्रतिष्ठानतर्फे आनंदवन महारोगी सेवा समिती आणि हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प यांना सोमवारी पुरस्कार देण्यात आला. या दोन्ही संस्थांच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांनी हा पुरस्कार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते स्वीकारला. त्या वेळी आमटे बोलत होते. के. आर. पाटील आणि सुनंदा पाटील यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.  सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. बी. सावंत, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे उपस्थित होते. 
डॉ. आमटे म्हणाले, ‘‘रस्त्याच्या कडेला दिसलेला कुष्ठरोगी बघून बाबांनी त्यांच्यासाठी काम करायचा निर्णय घेतला. त्यासाठी जमीनदारी, सगळे ऐशोराम सोडले. आनंदवनात रुग्णांबरोबर निरोगी लोकांनाही शिकता यावे, यासाठी त्यांनी महाविद्यालय सुरू केले. अशा प्रकारचे हे पहिले उदाहरण असावे. या आजाराबद्दलच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी बाबांनी हा उपाय योजला होता. सुरुवातीला तिथे निरोगी मुले यायला बिचकायची. आम्हा दोघांचे शिक्षण तिथेच झाले. नंतर मात्र इथे शिकायला गर्दी होऊ लागली. कुठे थांबायचे, हेही बाबांना नेमके कळले होत. मी भामरागडची आणि विकासने आनंदवनाची जबाबादारी घेतल्यावर त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही. उलट ते नर्मदा परिक्रमेसाठी जाऊन राहिले होते. आम्हीही सध्या मुलांकडे जबाबदारी सोपवून हाच कित्ता गिरवायचा प्रयत्न करत आहोत. 
आनंदवन आणि हेमलकसा प्रकल्प हे बाबांच्या तपश्चर्येला आलेले फळ आहे, असे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. यासाठी आपल्याला जे देता येते ते देऊन चांगल्या कामाला हातभार लावावा, असेही ते म्हणाले. 
पटवर्धन दांपत्याने 1 लाख, 11 हजार, 1क्1 रुपयांची देणगी डॉ. आमटे यांना दिली. जिजाबाई मोडक, विजय मेटे, तसेच कलाकार पार्थ भालेराव आणि गौरी गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्या विद्या म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. निकिता म्हात्रे यांनी आभार मानले.  
(प्रतिनिधी)
 
अनिष्ठ प्रथांविरोधात समाजकार्यच हवे
4वारसाहक्काने राजकारण, व्यवसाय करणारी माणसे असतात. मात्र, समाजकार्याचा वारसा चालवणो हे आमटे परिवाराचे उदाहरण दुर्मिळ असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पी. बी. सावंत यांनी केला. अनिष्ट प्रथा सत्तेच्या जोरावर नष्ट करता येत नाहीत, त्यासाठी समाजकार्यच करावे लागते. त्यामुळे सामाजिक संस्थांना जगवणो हे आपले काम असल्याचे त्यांनी सांगितले. समाजकारणाचे गुण राजकारणात आले, तर देशाची उन्नती होईल, असेही  आमटे म्हणाले. 
 
अजून मने जोडली गेली नाहीत
4सिक्कीम भारताला भौगोलिकदृष्टय़ा जोडले गेले असले, तरी या दोन्ही ठिकाणची मने एकत्र आलेली नाहीत. त्यासाठी सिक्कीम आणि इतर भारतीयांनी एकमेकांकडे जायला हवे, अशी टिप्पणी श्रीनिवास पाटील यांनी केली.