शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

बाबांचे जीवन ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण

By admin | Updated: July 1, 2014 00:13 IST

बाबा आमटे हे ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण आयुष्य जगले, असे त्यांचे पुत्र आणि ज्येष्ठ समाज कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे सांगितले.

पुणो : घरची जमीनदारी असतानाही कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभारणारे आणि योग्य वेळ येताच कामातून निवृत्त होऊन नव्या पिढीला संधी द्यायचा मोठेपणा दाखवणारे बाबा आमटे हे ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण आयुष्य जगले, असे त्यांचे पुत्र आणि ज्येष्ठ समाज कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे सांगितले.
माहेर-महिला प्रतिष्ठानतर्फे आनंदवन महारोगी सेवा समिती आणि हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प यांना सोमवारी पुरस्कार देण्यात आला. या दोन्ही संस्थांच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांनी हा पुरस्कार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते स्वीकारला. त्या वेळी आमटे बोलत होते. के. आर. पाटील आणि सुनंदा पाटील यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.  सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. बी. सावंत, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे उपस्थित होते. 
डॉ. आमटे म्हणाले, ‘‘रस्त्याच्या कडेला दिसलेला कुष्ठरोगी बघून बाबांनी त्यांच्यासाठी काम करायचा निर्णय घेतला. त्यासाठी जमीनदारी, सगळे ऐशोराम सोडले. आनंदवनात रुग्णांबरोबर निरोगी लोकांनाही शिकता यावे, यासाठी त्यांनी महाविद्यालय सुरू केले. अशा प्रकारचे हे पहिले उदाहरण असावे. या आजाराबद्दलच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी बाबांनी हा उपाय योजला होता. सुरुवातीला तिथे निरोगी मुले यायला बिचकायची. आम्हा दोघांचे शिक्षण तिथेच झाले. नंतर मात्र इथे शिकायला गर्दी होऊ लागली. कुठे थांबायचे, हेही बाबांना नेमके कळले होत. मी भामरागडची आणि विकासने आनंदवनाची जबाबादारी घेतल्यावर त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही. उलट ते नर्मदा परिक्रमेसाठी जाऊन राहिले होते. आम्हीही सध्या मुलांकडे जबाबदारी सोपवून हाच कित्ता गिरवायचा प्रयत्न करत आहोत. 
आनंदवन आणि हेमलकसा प्रकल्प हे बाबांच्या तपश्चर्येला आलेले फळ आहे, असे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. यासाठी आपल्याला जे देता येते ते देऊन चांगल्या कामाला हातभार लावावा, असेही ते म्हणाले. 
पटवर्धन दांपत्याने 1 लाख, 11 हजार, 1क्1 रुपयांची देणगी डॉ. आमटे यांना दिली. जिजाबाई मोडक, विजय मेटे, तसेच कलाकार पार्थ भालेराव आणि गौरी गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्या विद्या म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. निकिता म्हात्रे यांनी आभार मानले.  
(प्रतिनिधी)
 
अनिष्ठ प्रथांविरोधात समाजकार्यच हवे
4वारसाहक्काने राजकारण, व्यवसाय करणारी माणसे असतात. मात्र, समाजकार्याचा वारसा चालवणो हे आमटे परिवाराचे उदाहरण दुर्मिळ असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पी. बी. सावंत यांनी केला. अनिष्ट प्रथा सत्तेच्या जोरावर नष्ट करता येत नाहीत, त्यासाठी समाजकार्यच करावे लागते. त्यामुळे सामाजिक संस्थांना जगवणो हे आपले काम असल्याचे त्यांनी सांगितले. समाजकारणाचे गुण राजकारणात आले, तर देशाची उन्नती होईल, असेही  आमटे म्हणाले. 
 
अजून मने जोडली गेली नाहीत
4सिक्कीम भारताला भौगोलिकदृष्टय़ा जोडले गेले असले, तरी या दोन्ही ठिकाणची मने एकत्र आलेली नाहीत. त्यासाठी सिक्कीम आणि इतर भारतीयांनी एकमेकांकडे जायला हवे, अशी टिप्पणी श्रीनिवास पाटील यांनी केली.