शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

म्हशीच्या गळ्यातला लोडना तुमच्या पाठीत घालू : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 18:03 IST

'गाईच्या दूध खरेदीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची अक्षरश: पिळवणूक सुरू आहे. उत्पादन खर्चाच्या निम्मा दर त्याच्या हातात पडतोय, त्यासाठी आम्ही राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. ते सरकारने बेदखल केले तर आम्ही म्हशीच्या गळ्यातला लोडना त्यांच्या पाठीत घालू,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देम्हशीच्या गळ्यातला लोडना तुमच्या पाठीत घालू : राजू शेट्टीसाताऱ्यात बैलगाडीचा मोर्चा; केंद्र-राज्य सरकारला जोरदार इशारा

सातारा : 'गाईच्या दूध खरेदीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची अक्षरश: पिळवणूक सुरू आहे. उत्पादन खर्चाच्या निम्मा दर त्याच्या हातात पडतोय, त्यासाठी आम्ही राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. ते सरकारने बेदखल केले तर आम्ही म्हशीच्या गळ्यातला लोडना त्यांच्या पाठीत घालू,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीचा मोर्चा काढला. केंद्र सरकारने दूध भुकटी व इतर दुग्धजन्य पदार्थांची आवक थांबवावी, दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी कर रद्द करावा तसेच राज्य शासनाने गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, या मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या आहेत.सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोठ्या घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी खासदार राजू शेट्टी यांनी मोर्चातील सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.आमदार शेट्टी म्हणाले, 'राज्यात ५० हजार तर दूध भुकटी शिल्लक आहे. बटरचा स्टॉक देखील मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. यामध्ये अब्जावधीचा पैसा गुंतलेला आहे. दुधाचे दर कोसळलेले आहेत. लॉकडाऊनमध्ये गाईच्या दुधाचे दर घसरले.

या परिस्थितीत राज्य सरकारने सहकारी दूध संघांना पंचवीस रुपये लिटर दराने गाईचे दूध खरेदी करण्याचा आदेश काढले, त्यामध्ये दोन रुपये वाहतूक खर्च देखील सरकारनेच दिला. मात्र खासगी दूध संघ तसेच खासगी दूध व्यवसाय करणाऱ्यानीच सरकारच्या या योजनेचा फायदा उठवला.

राज्य सरकारचे दीडशे कोटी रुपये पाण्यात गेले. सध्याच्या घडीला गाईच्या दुधाला प्रति लिटर १७ रुपये भाव आहे. याच परिस्थितीत केंद्र सरकारने जर दूध भुकटी आणखी आयात करण्याचा निर्णय घेतला तर हे आदर देखील आणखी खाली येणार आहेत. गाईच्या दुधासाठी उत्पादन खर्च ३२ रुपये आणि विक्री खर्च १७ रुपये अशी परिस्थिती असून गोरगरीब शेतकरी अल्पभूधारक शेतमजूर जोडव्यवसाय करून दूध विक्री करतो आणि त्यावर आपली उपजीविका चालवतो, त्याच्या गळ्याला फास लागला आहे.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजहंस या डेअरीने शेतकऱ्यांकडून दूध घेतले; परंतु अद्याप देखील त्यांना त्यांचे पैसे दिले नाहीत. पावडर निर्माण करणाऱ्या चोरांनी तर सरकारच्या योजनेचा पुरेपूर लाभ घेतला. ज्या ठिकाणी ३५ रूपयांना ते दूध खरेदी करत होते तेच आता अवघ्या १७ रुप ये दर देऊन दूध खरेदी करत आहेत. याठिकाणी कुंपणच शेत खाते अशी परिस्थिती आहे.शेतकऱ्यांना आणखी किती तोट्यात जाणार आहात. त्याला किती खड्ड्यात घालणार आहात. ५० एकराचा मालक गुरे पाळत नाही तर अल्पभूधारक शेतकरी हा व्यवसाय करतो. त्याच्यात लढायची ताकद नाही, असं समजू नका आमच्या आंदोलन शांततेत चालले आहेत, त्याची चेष्टा करू नका किंवा त्यात ते बेदखल केले आहे, असेही ही वागू नका अन्यथा सरकारला आम्ही गुडघे टेकायला लावू.

आमच्या या घोषणा पोकळ नाही, आम्ही २००७, २०१९ मध्ये दूध आंदोलनाच्या माध्यमातून हे करून दाखवलं. आम्ही शेतकरी रागानं रस्त्यावर उतरलो तर सगळेच अडचणीत येतील. कुणाच्या दूध संघांना किती दुध घेतलं आणि किती दराने घेतलं आणि किती दराने ते विकलं, याचा सर्व काही लेखाजोखा माझ्याजवळ आहे. आमचं कुणाशी वाकड नाही पण शेतकऱ्यांना दर दिला नाही, तर आम्ही सोडणार नाही, असा इशारा देखील आमदार शेट्टी यांनी यावेळी दिला.विद्वान कधी निर्णय घेणार आहेतराज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गाईच्या दुधाला कशा पद्धतीने दर देता येईल, यासाठी तज्ञ मंत्रिगटाची समिती नेमली. या समितीमध्ये ज्या राजहंस दूध संघाने शेतकऱ्याच्या दुधाला रुपया दिला नाही, त्या संघाचे प्रमुख महसूल मंत्री, बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समिती नेमली मात्र या विद्वान लोकांनी दोन महिने झाले तरी कुठलाही निर्णय घेतलेला नाही.  बारामतीमध्ये मोर्चा काढून दूध संघांच्या व्यवहारांचा लेखाजोखा मांडणार असल्याचा इशारा आ. राजू शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSatara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूर