शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नवी मनोधैर्य योजना जुन्या प्रकरणांनाही लागू करण्याबाबत विचार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 04:55 IST

डिसेंबर २००९ नंतर महिलांसंबंधित नोंदविण्यात आलेले गुन्हे ‘मनोधैर्य योजना २०१३’ की ‘मनोधैर्य योजना २०१७’च्या अखत्यारित येतात? याबाबत धोरणात्मक निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.

मुंबई : डिसेंबर २००९ नंतर महिलांसंबंधित नोंदविण्यात आलेले गुन्हे ‘मनोधैर्य योजना २०१३’ की ‘मनोधैर्य योजना २०१७’च्या अखत्यारित येतात? याबाबत धोरणात्मक निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.आॅक्टोबर २०१३च्या मनोधैर्य योजनेंतर्गत बलात्कार व अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील पीडितांना ३ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या योजनेवर उच्च न्यायालयाने प्रखर टीका केल्यानंतर, सरकारने गेल्या वर्षी या योजनेत सुधारणा केली. पीडितांना १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला.३१ डिसेंबर २००९ नंतर नोंदविण्यात आलेले महिलासंबंधी गुन्हे, मनोधैर्य योजना २०१३ की मनोधैर्य योजना २०१७ अंतर्गत येतील? याबाबत सरकार लवकर धोरणात्मक निर्णय घेईल, अशी माहिती सरकारी वकील नेहा भिडे यांनी उच्च न्यायालयाला दिली.सरकारच्या मनोधैर्य योजनेविरुद्ध अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीच्या वेळी सरकारने वरील माहिती न्यायालयाला दिली. या याचिकेवरील पुढील सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCourtन्यायालय