शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

'गद्दार' शब्दावरून एकाच वाक्यात मुख्यमंत्री शिंदेंनी आदित्य ठाकरेंना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 14:15 IST

आम्ही आमचं काम करतोय. आमच्यासोबत विधानसभेचे ५० आमदार आणि लोकसभेचे १२ खासदार यांनी आमच्या भूमिकेचं समर्थन केले आहे. बाळासाहेबांचे जे विचार होते तेच आत्मसात केले आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई - जी युती अडीच वर्षापूर्वी घडायला हवी होती ती आम्ही घडवली, हे सरकार कायदेशीर आणि घटनेनुसारच बनवलं आहे. अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल त्याचसोबत २०२४ च्या निवडणुकीत आम्ही पुन्हा निवडून येऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच आदित्य ठाकरेंना जे बोलायचं ते बोलू द्या असा खोचक टोलाही शिंदे यांनी आदित्य यांना लगावला आहे. 

शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गोरेगावच्या निवासस्थानी पोहचले होते. मुख्यमंत्र्यांनी किर्तीकर यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर माध्यमांना शिंदे म्हणाले की, किर्तीकर यांचे अलीकडेच ऑपरेशन झाले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जातोय. राज्यातील जनतेला आमची भूमिका पटली आहे. जी भूमिका बाळासाहेबांची होती. ते आम्ही आत्मसात केलंय, जे अडीच वर्षापूर्वी घडायला हवं होतं ते आम्ही आता केले असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही आमचं काम करतोय. आमच्यासोबत विधानसभेचे ५० आमदार आणि लोकसभेचे १२ खासदार यांनी आमच्या भूमिकेचं समर्थन केले आहे. बाळासाहेबांचे जे विचार होते तेच आत्मसात केले आहे. बाळासाहेबांची परखड भूमिका आम्ही पुढे घेऊन जातोय. सरकार लोकांनी निवडून दिलेले असते. विधानसभा, विधान परिषदेत आमच्याकडे बहुमत आहे. हा वाद न्यायालयात आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड झाली आहे. कोर्टाने त्यांची एकही मागणी मान्य केली नाही. ज्यांना स्वत:चं समाधान करून घ्यायचं ते त्यांना घेऊ द्या. घटनेच्या तरतुदीनुसार जे जे फॉलो करायचं ते पूर्ण केले आहे. अडीच वर्ष कालावधी पूर्ण करेल त्याचसोबत २०२४ मध्येही आम्हीच निवडून येणार आहोत असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?"मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखं यांना आजवर शिवसेनेनं सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं दिलं त्याच पक्षाशी गद्दारी केली. या आमदारांनी केलेलं बंड तुम्हाला पटलंय का? खरंतर आपलं एक चुकलं की आपण राजकारण कमी केलं आणि समाजकारणावर जास्त भर दिला. आपल्याशी गद्दारी यासाठीच होते की आपण विरोधी पक्षाच्या आमदारांवर कधी लक्ष देत नाही. त्यांच्यावर दबाव आणत नाही किंवा त्यांना त्रास देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

त्याचसोबत मला गद्दारी केलेल्यांना एकच गोष्ट सांगायची आहे. जरा लोकांमध्ये फिरा आणि त्यांच्या भावना समजून घ्या. जे गेलेत त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. बंड किंवा उठाव करायला ताकद लागते. तुम्ही केलेला उठाव नाही. गद्दारीच आहे. हिंमत असती तर राज्यात थांबून बंड केलं असतं. हिंमत असती तर इथून सूरतेला पळाले नसते. तिथं गुवाहाटीला जाऊन ४० आमदार मजा मारुन आले. तुमच्यात थोडीशीही लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा", असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना