शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'गद्दार' शब्दावरून एकाच वाक्यात मुख्यमंत्री शिंदेंनी आदित्य ठाकरेंना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 14:15 IST

आम्ही आमचं काम करतोय. आमच्यासोबत विधानसभेचे ५० आमदार आणि लोकसभेचे १२ खासदार यांनी आमच्या भूमिकेचं समर्थन केले आहे. बाळासाहेबांचे जे विचार होते तेच आत्मसात केले आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई - जी युती अडीच वर्षापूर्वी घडायला हवी होती ती आम्ही घडवली, हे सरकार कायदेशीर आणि घटनेनुसारच बनवलं आहे. अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल त्याचसोबत २०२४ च्या निवडणुकीत आम्ही पुन्हा निवडून येऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच आदित्य ठाकरेंना जे बोलायचं ते बोलू द्या असा खोचक टोलाही शिंदे यांनी आदित्य यांना लगावला आहे. 

शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गोरेगावच्या निवासस्थानी पोहचले होते. मुख्यमंत्र्यांनी किर्तीकर यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर माध्यमांना शिंदे म्हणाले की, किर्तीकर यांचे अलीकडेच ऑपरेशन झाले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जातोय. राज्यातील जनतेला आमची भूमिका पटली आहे. जी भूमिका बाळासाहेबांची होती. ते आम्ही आत्मसात केलंय, जे अडीच वर्षापूर्वी घडायला हवं होतं ते आम्ही आता केले असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही आमचं काम करतोय. आमच्यासोबत विधानसभेचे ५० आमदार आणि लोकसभेचे १२ खासदार यांनी आमच्या भूमिकेचं समर्थन केले आहे. बाळासाहेबांचे जे विचार होते तेच आत्मसात केले आहे. बाळासाहेबांची परखड भूमिका आम्ही पुढे घेऊन जातोय. सरकार लोकांनी निवडून दिलेले असते. विधानसभा, विधान परिषदेत आमच्याकडे बहुमत आहे. हा वाद न्यायालयात आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड झाली आहे. कोर्टाने त्यांची एकही मागणी मान्य केली नाही. ज्यांना स्वत:चं समाधान करून घ्यायचं ते त्यांना घेऊ द्या. घटनेच्या तरतुदीनुसार जे जे फॉलो करायचं ते पूर्ण केले आहे. अडीच वर्ष कालावधी पूर्ण करेल त्याचसोबत २०२४ मध्येही आम्हीच निवडून येणार आहोत असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?"मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखं यांना आजवर शिवसेनेनं सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं दिलं त्याच पक्षाशी गद्दारी केली. या आमदारांनी केलेलं बंड तुम्हाला पटलंय का? खरंतर आपलं एक चुकलं की आपण राजकारण कमी केलं आणि समाजकारणावर जास्त भर दिला. आपल्याशी गद्दारी यासाठीच होते की आपण विरोधी पक्षाच्या आमदारांवर कधी लक्ष देत नाही. त्यांच्यावर दबाव आणत नाही किंवा त्यांना त्रास देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

त्याचसोबत मला गद्दारी केलेल्यांना एकच गोष्ट सांगायची आहे. जरा लोकांमध्ये फिरा आणि त्यांच्या भावना समजून घ्या. जे गेलेत त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. बंड किंवा उठाव करायला ताकद लागते. तुम्ही केलेला उठाव नाही. गद्दारीच आहे. हिंमत असती तर राज्यात थांबून बंड केलं असतं. हिंमत असती तर इथून सूरतेला पळाले नसते. तिथं गुवाहाटीला जाऊन ४० आमदार मजा मारुन आले. तुमच्यात थोडीशीही लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा", असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना