शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
3
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
4
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
5
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
6
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
7
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
8
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
9
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
10
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
11
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
12
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
13
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
14
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
15
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
16
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
17
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
18
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
19
"सर, ब्रेकअप झालंय" Gen Z कर्मचाऱ्यानं बॉसला पाठवला ईमेल; लगेच १० दिवसांची सुट्टी मंजूर, कारण..
20
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?

'गद्दार' शब्दावरून एकाच वाक्यात मुख्यमंत्री शिंदेंनी आदित्य ठाकरेंना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 14:15 IST

आम्ही आमचं काम करतोय. आमच्यासोबत विधानसभेचे ५० आमदार आणि लोकसभेचे १२ खासदार यांनी आमच्या भूमिकेचं समर्थन केले आहे. बाळासाहेबांचे जे विचार होते तेच आत्मसात केले आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई - जी युती अडीच वर्षापूर्वी घडायला हवी होती ती आम्ही घडवली, हे सरकार कायदेशीर आणि घटनेनुसारच बनवलं आहे. अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल त्याचसोबत २०२४ च्या निवडणुकीत आम्ही पुन्हा निवडून येऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच आदित्य ठाकरेंना जे बोलायचं ते बोलू द्या असा खोचक टोलाही शिंदे यांनी आदित्य यांना लगावला आहे. 

शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गोरेगावच्या निवासस्थानी पोहचले होते. मुख्यमंत्र्यांनी किर्तीकर यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर माध्यमांना शिंदे म्हणाले की, किर्तीकर यांचे अलीकडेच ऑपरेशन झाले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जातोय. राज्यातील जनतेला आमची भूमिका पटली आहे. जी भूमिका बाळासाहेबांची होती. ते आम्ही आत्मसात केलंय, जे अडीच वर्षापूर्वी घडायला हवं होतं ते आम्ही आता केले असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही आमचं काम करतोय. आमच्यासोबत विधानसभेचे ५० आमदार आणि लोकसभेचे १२ खासदार यांनी आमच्या भूमिकेचं समर्थन केले आहे. बाळासाहेबांचे जे विचार होते तेच आत्मसात केले आहे. बाळासाहेबांची परखड भूमिका आम्ही पुढे घेऊन जातोय. सरकार लोकांनी निवडून दिलेले असते. विधानसभा, विधान परिषदेत आमच्याकडे बहुमत आहे. हा वाद न्यायालयात आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड झाली आहे. कोर्टाने त्यांची एकही मागणी मान्य केली नाही. ज्यांना स्वत:चं समाधान करून घ्यायचं ते त्यांना घेऊ द्या. घटनेच्या तरतुदीनुसार जे जे फॉलो करायचं ते पूर्ण केले आहे. अडीच वर्ष कालावधी पूर्ण करेल त्याचसोबत २०२४ मध्येही आम्हीच निवडून येणार आहोत असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?"मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखं यांना आजवर शिवसेनेनं सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं दिलं त्याच पक्षाशी गद्दारी केली. या आमदारांनी केलेलं बंड तुम्हाला पटलंय का? खरंतर आपलं एक चुकलं की आपण राजकारण कमी केलं आणि समाजकारणावर जास्त भर दिला. आपल्याशी गद्दारी यासाठीच होते की आपण विरोधी पक्षाच्या आमदारांवर कधी लक्ष देत नाही. त्यांच्यावर दबाव आणत नाही किंवा त्यांना त्रास देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

त्याचसोबत मला गद्दारी केलेल्यांना एकच गोष्ट सांगायची आहे. जरा लोकांमध्ये फिरा आणि त्यांच्या भावना समजून घ्या. जे गेलेत त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. बंड किंवा उठाव करायला ताकद लागते. तुम्ही केलेला उठाव नाही. गद्दारीच आहे. हिंमत असती तर राज्यात थांबून बंड केलं असतं. हिंमत असती तर इथून सूरतेला पळाले नसते. तिथं गुवाहाटीला जाऊन ४० आमदार मजा मारुन आले. तुमच्यात थोडीशीही लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा", असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना