शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कोरोनाच्या काळातही ‘आरोग्य’वर कमी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 05:56 IST

विभागाचा खर्च तिसऱ्या क्रमांकावर. कोरोनाकाळात सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण हे विभाग प्राधान्याचे असतील असे सांगण्यात आले.

- अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ४६ हजारपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. मात्र आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी जो निधी मिळायला हवा होता तो मिळाला नाही आणि जो मिळाला तो देखील पूर्ण खर्च झालेला नाही. राज्याच्या एकूण बजेटच्या ३२.३१ टक्के निधी खर्च झाला असला तरी त्यातील फक्त २० टक्के रक्कम विकासकामांवर खर्च झाली आहे. यातही सार्वजनिक आरोग्य विभाग तिसऱ्या नंबरवर आणि वैद्यकीय शिक्षण, एफडीए हे विभाग नाममात्र खर्च करणारे ठरले आहेत. 

कोरोनाकाळात सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण हे विभाग प्राधान्याचे असतील असे सांगण्यात आले. पण हे दोन विभाग अजूनही प्राधान्यक्रमावर नाहीत, हेच ताजी आकडेवारी सांगते. महिला व बालकल्याण विभाग ६२ टक्के खर्च करुन पहिल्या स्थानी आहे. सहकार खाते दुसऱ्या तर आरोग्य खाते तिसऱ्या स्थानी आहे. लॉकडाऊन काळात विकासकामे बंद होती. त्याचा फायदा घेत आरोग्याची व्यवस्था मजबूत करण्याची संधी सरकारला आहे. पण त्या दृष्टीने खर्च होताना दिसत नाही.

३२,६२९.३०८कोटी रुपयेच खर्च२०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ४,८०,८६०.४४९ कोटींचा होता. प्रत्यक्षात १,७१,८२३.६७० कोटी रुपये आजपर्यंत वितरित केले गेले. यापैकी विकासकामांंसाठी फक्त ४६,६०७.६१४ कोटी रुपयांचा निधी मिळाला. बाकी सगळे पैसे पगार, व्याज, निवृत्तीवेतन व नॉन प्लॅनच्या कामांसाठी खर्च झाले. जे ४६ हजार कोटी मिळाले त्यापैकी देखील फक्त ३२,६२९.३०८ कोटीच खर्च झाले. हे प्रमाण एकूण बजेटच्या २०.४१ टक्के आहे.     - आणखी वृत्त/स्टेट पोस्ट

सरकारने कोरोनावर खर्च करण्याचे धोरण ठेवले आहे. त्यामुळे बांधकामे, किंवा तत्सम कामांवर निधी दिला गेला नाही. त्यामुळे खर्च कमी दिसत आहे. आरोग्य व वैद्यकीय शिक्षण यावर किमान ४ टक्के खर्च व्हावा हे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने विभाग काम करत आहे.अमित देशमुख, वैद्यकीयशिक्षणमंत्री

टॅग्स :Healthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस