शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

१० जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस; कोकण विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 04:44 IST

कोकण, गोवा, विदर्भात जोरदार पावसामुळे यापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र त्याचवेळी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे.

पुणे : कोकण, गोवा, विदर्भात जोरदार पावसामुळे यापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र त्याचवेळी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे़ पर्जन्यछायेतील प्रदेशात अजूनही जोरदार पावसाची आवश्यकता आहे़ मध्य महाराष्ट्रातील ५ जिल्हे, मराठवाड्यातील ४जिल्हे आणि विदर्भातील एका जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला आहे़राज्यातील हवामान विभागापैकी कोकण विभागात २९ जुलैअखेर सरासरीच्या १८ टक्के पाऊस जास्त झाला असून, मध्य महाराष्ट्रात १५ टक्के अधिक पाऊस झाला आहे; पण मराठवाड्यात सरासरीच्या ४ टक्के पाऊस कमी आहे़ विदर्भात तो १६ टक्के अधिक झाला आहे़पालघरमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथे सरासरीपेक्षा ५० टक्के अधिक पावसाची नोंद झाली़ ठाणे जिल्ह्यात ४९ टक्के, मुंबई उपनगर भाग आणि पुणे जिल्ह्यात सरासरीच्या ४८ टक्के अधिक पाऊस झाला आहे़सध्या पावसाने ओढ दिल्याने या जिल्ह्यांमधील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ पावसाच्या असमतोल वितरणाचा मराठवाडा व मध्य महाराष्ट्राला फटका बसत असल्याचे दिसत आहे़- मध्य महाराष्ट्रातील धुळे(-१६ टक्के), जळगाव(-५ टक्के), नंदुरबार (-२३ टक्के), सांगली (- २२ टक्के), सोलापूर (-१२ टक्के) कमी पाऊस झाला आहे़ मराठवाड्यातील औरंगाबाद (-२८ टक्के), बीड(-१४ टक्के), जालना (-२६ टक्के) आणि परभणी (- ५ टक्के) कमी पावसाची नोंद झाली आहे़ विदर्भातील बुलढाणा येथे आतापर्यंत सरासरीच्या (- १९ टक्के) पाऊस कमी झाला आहे़३० जुलै रोजी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचीशक्यता आहे़३१ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़

टॅग्स :Rainपाऊस