शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

विदर्भातील आमदारांनी राजीनामे द्यावेत - विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 04:22 IST

वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भातील आमदारांनी राजीनामे द्यावेत व याच मुद्यावर पुन्हा निवडणूक लढवावी

शिर्डी : वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भातील आमदारांनी राजीनामे द्यावेत व याच मुद्यावर पुन्हा निवडणूक लढवावी, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य राहील, असे आव्हान राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विदर्भवाद्यांना दिले़साईदर्शनासाठी आलेल्या विखे यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला़ वेगळा विदर्भ हा संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या भावनेचा अनादर असल्याचे मत व्यक्त करतानाच विदर्भाच्या मुद्यावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विखे यांनी केला़ विधीमंडळात राज्य सरकारमधील मंत्र्यांविरूध्द भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणावर आरोप झाले़ सरकारची जनमानसातील प्रतिमा मलिन होवू लागल्याने लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठीच सरकारने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा समोर आणला असल्याचा आरोपही विखे यांनी केला़नागपूरला अनेक मोठे प्रकल्प येत आहेत, तेथे विकासाचा अनुशेष आहे, हे खरे आहे़ मात्र अनेक योजनांचा निधी राज्यपालांचे निकष डावलून तिकडे वळवला जात आहे़ तोही राज्याचाच भाग आहे़ त्यामुळे त्यात गैर काही नसले तरी मुख्यमंत्र्यांनी समतोल विकास करण्याबाबतही विचार करावा, अशी आपली भावना असल्याचे विखे यांनी सांगितले़साईसंस्थान विश्वस्त मंडळावरून वाद निर्माण झाला असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता विखे पाटील म्हणाले, मागील सरकारच्या काळात नियमावली तयार करण्यात आली आहे़ त्यानुसार सरकारने विश्वस्त नियुक्त केले असावेत, कुणाला विश्वस्त नेमायचे हा सरकारचा अधिकार आहे़ साईबाबांची महती खूप मोठी आहे़ येथे नियुक्तीवरून किंवा पदावरून वाद होणे हे योग्य नाही़ (प्रतिनिधी)