शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विधान परिषद नामनियुक्त सदस्य : आठ महिने उलटूनही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही - राज्य सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 07:16 IST

Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यपदांसाठी राज्य सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ जणांच्या नावांची शिफारस केली होती.

ठळक मुद्देविधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यपदांसाठी राज्य सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ जणांच्या नावांची शिफारस केली होती.राज्यपालांकडून अद्याप याबाबत काहीही कळवण्यात आलेले नाही, सरकारचं प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणणं.

विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यपदांसाठी राज्य सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ जणांच्या नावांची शिफारस केली होती. आठ महिने उलटूनही राज्यपालांनी याबाबत निर्णय घेतला नाही, असे राज्य सरकारनेउच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करून विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यपदांसाठी १२ जणांच्या नावांची यादी राज्यपालांकडे सादर केली, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

राज्यपालांनी अद्याप याबाबत निर्णय न घेऊन त्यांच्या घटनात्मक कर्तव्याचा भंग केला आहे, असे नाशिकच्या रतन लूथ यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारने मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सादर केले.

नामनियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करावी, याबाबत याचिकाकर्त्यांचे काहीही म्हणणे नाही. याचिकाकर्ते केवळ निर्णय घेण्यास सांगत आहेत. राज्यपाल जरी कायदेशीर कारवाईच्या कक्षेत येत नसले तरी त्यांचे निर्णय कायदेशीर कारवाईच्या कक्षेत यायला हवेत, असा युक्तिवाद लुथ यांच्यावतीने ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांनी न्यायालयात केला.

६ नोव्हेंबर २०२० रोजी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाशी विचारविनिमय करून १२ जणांची नावे संपूर्ण माहितीसह राज्यपालांपुढे सादर केली. जनहितासाठी आणि लोकशाहीसाठी राज्यपालांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचा आदर केला नाही. राज्यपालांकडून अद्याप याबाबत काहीही कळवण्यात आलेले नाही, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १६ जुलै रोजी ठेवली आहे.

स्वेच्छाधिकार नाहीनामनियुक्त सदस्य नेमण्याचे राज्यपालांना स्वेच्छाधिकार नाही. मंत्रिमंडळाच्या सल्लामसलतीने त्यांना या सदस्यांची नियुक्ती करावी लागते, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रHigh Courtउच्च न्यायालय