शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

विधान परिषद नामनियुक्त सदस्य : आठ महिने उलटूनही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही - राज्य सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 07:16 IST

Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यपदांसाठी राज्य सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ जणांच्या नावांची शिफारस केली होती.

ठळक मुद्देविधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यपदांसाठी राज्य सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ जणांच्या नावांची शिफारस केली होती.राज्यपालांकडून अद्याप याबाबत काहीही कळवण्यात आलेले नाही, सरकारचं प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणणं.

विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यपदांसाठी राज्य सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ जणांच्या नावांची शिफारस केली होती. आठ महिने उलटूनही राज्यपालांनी याबाबत निर्णय घेतला नाही, असे राज्य सरकारनेउच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करून विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यपदांसाठी १२ जणांच्या नावांची यादी राज्यपालांकडे सादर केली, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

राज्यपालांनी अद्याप याबाबत निर्णय न घेऊन त्यांच्या घटनात्मक कर्तव्याचा भंग केला आहे, असे नाशिकच्या रतन लूथ यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारने मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सादर केले.

नामनियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करावी, याबाबत याचिकाकर्त्यांचे काहीही म्हणणे नाही. याचिकाकर्ते केवळ निर्णय घेण्यास सांगत आहेत. राज्यपाल जरी कायदेशीर कारवाईच्या कक्षेत येत नसले तरी त्यांचे निर्णय कायदेशीर कारवाईच्या कक्षेत यायला हवेत, असा युक्तिवाद लुथ यांच्यावतीने ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांनी न्यायालयात केला.

६ नोव्हेंबर २०२० रोजी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाशी विचारविनिमय करून १२ जणांची नावे संपूर्ण माहितीसह राज्यपालांपुढे सादर केली. जनहितासाठी आणि लोकशाहीसाठी राज्यपालांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचा आदर केला नाही. राज्यपालांकडून अद्याप याबाबत काहीही कळवण्यात आलेले नाही, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १६ जुलै रोजी ठेवली आहे.

स्वेच्छाधिकार नाहीनामनियुक्त सदस्य नेमण्याचे राज्यपालांना स्वेच्छाधिकार नाही. मंत्रिमंडळाच्या सल्लामसलतीने त्यांना या सदस्यांची नियुक्ती करावी लागते, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रHigh Courtउच्च न्यायालय