शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता विधान परिषदेतील ‘मदती’वरून संशयकल्लोळ; राज्यसभेच्या ‘बिघाडी’नंतर मविआचा सावध पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 05:58 IST

राज्यसभा निवडणुकीतील फटक्यानंतर अपक्ष व छोट्या पक्षांना सोबत ठेवण्याची मोठी कसरत महाविकास आघाडीला करावी लागेल. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान आहे.

गौरीशंकर घाळेमुंबई :

राज्यसभा निवडणुकीतील फटक्यानंतर अपक्ष व छोट्या पक्षांना सोबत ठेवण्याची मोठी कसरत महाविकास आघाडीला करावी लागेल. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान आहे. दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी आवश्यक मतांची बेगमी झालेली असली तरी गाफील राहायचे नाही, कोणताही धोका पत्करायचा नाही, असा अत्यंत सावध पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. तर, राज्यसभेतील अपघातामुळे निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणाने काँग्रेसची काळजी वाढवली आहे.

या निवडणुकीत विजयासाठी २७ मतांचा कोटा निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५५ आमदारांचे संख्याबळ असलेल्या शिवसेनेला दोन्ही उमेदवार निवडून आणण्यात अडचण राहणार नाही. तर, राष्ट्रवादीकडे ५३ मते आहेत. त्यातील अनिल देशमुख व नवाब मलिकांच्या मतांबाबत अद्याप साशंकता आहे. मात्र, अपक्ष समर्थकांच्या जोरावर आपले दोन उमेदवार निवडून आणण्यात राष्ट्रवादीला फारशी अडचण येणार नाही. 

शिवसेनेची शोधाशोध0 राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेत चिंतेचे वातावरण आहे. 0 आकड्यांचा खेळ कुठे फिरला, याचा शोध सध्या शिवसेनेच्या गोटात सुरू आहे. 0 शिवसेना समर्थक अपक्षांनी आपली कामगिरी चोख बजावली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे झुकलेल्या अपक्षांबाबत संशयाचे वातावरण आहे.

ताकही फुंकून पिण्याची आवश्यकता : खडसे0 राज्यसभा निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला. मात्र, विधान परिषदेला ताकही फुंकून प्यावे लागण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. 0 परिषदेची तयारी करताना प्रत्येक गोष्ट तपासून आणि विश्वासाने करण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी मागच्या पराभवाचा धडा घेऊन रणनीती ठरविण्याचे ठरवले आहे. अपक्षांवर अविश्वास दाखविणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

राऊत यांच्या निशाण्यावर अजित पवार समर्थक0 शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आमदार देवेंद्र भुयार, आमदार संजय शिंदे, आमदार श्यामसुंदर शिंदे, कोल्हे या अपक्ष आमदारांची मते मिळाली नसल्याचा आरोप केला. हे तीनही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. 0 त्यामुळे अपक्षांच्या आडून अजित पवारांना तर लक्ष्य करण्याचा प्रयत्न नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. बविआच्या तीन आमदारांचीही मते मिळाले नसल्याचे राऊत म्हणाले होते.

काँग्रेसला चिंताराज्यसभा निवडणुकीत फटका बसल्याने महाविकास आघाडीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपली अतिरिक्त मते विशेषत: समर्थक अपक्षांची किती मते काँग्रेसकडे वळवतील, याबाबत शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दुचाकी-तिचाकीचे काय ?काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक असलेल्या छोट्या पक्षांनी दिलेला शब्द पाळला नाही. एमआयएम, समाजवादी पार्टी अशा पक्षांकडून अपेक्षित असलेले एकही मते आले नसल्याचा शिवसेना नेत्यांचा समज आहे.

काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यास काँग्रेसला आणखी १२ ते १५ मतांची बेगमी करावी लागेल. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी