शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘मराठी सक्ती’ कायद्यासाठी साहित्यिक सरसावले; विधिमंडळासमोर धरणे आंदोलन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 06:38 IST

विधिमंडळ अधिवेशन सुरू झाल्यानंतर १७ किंवा १८ जून रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत ५ जून रोजी मराठीशी संबंधित विविध संस्थांची बैठक होणार आहे.

नाशिक: मराठी भाषा वाचविण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घेतला असून, सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची करावी यासाठी येत्या राज्य विधिमंडळ अधिवेशनावेळी मराठी साहित्यिक तसेच अन्य मराठी संस्था धरणे धरणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी यासंदर्भात नाशिकमध्ये सार्वजनिक वाचनालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

विधिमंडळ अधिवेशन सुरू झाल्यानंतर १७ किंवा १८ जून रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत ५ जून रोजी मराठीशी संबंधित विविध संस्थांची बैठक होणार आहे. त्यात रूपरेषा ठरणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले. 

मराठी भाषेची अवस्था केवळ बिकट होत चालली आहे असे म्हणून चालणार नाही. मराठी भाषा टिकवण्यसाठी प्रयत्न झाले पाहिजे. केरळ, तेलंगण यांसारख्या राज्यात तेथील मातृभाषा शिकवण्यासाठी कायदा केला आहे. त्या धर्तीवरच महाराष्ट्रात कायदा करावा यासाठी मराठी संघटना आग्रही आहेत. त्याचबरोबर मराठीचा वापर होतो आहे किंवा नाही याचे नियमन करण्यासाठीदेखील मराठी भाषा प्राधिकरण केले पाहिजे, अशी प्रामुख्याने मागणी आहे. तथापि, त्यासाठी ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे सांगून देशमुख म्हणाले की, मराठी भाषा शाळांमध्ये सक्तीने शिकवली गेली पाहिजे यासाठी राज्य सरकारने सर्वप्रथम कायदा केला पाहिजे. अमराठी शाळांमध्ये अशाप्रकारचा कायदा झाला तर मराठीचा वापर वाढणार आहे.

गेल्यावर्षी यासंदर्भात राज्य शासनाला कायद्याचे प्रारूपदेखील दिले आहे, परंतु अद्याप कायदा झालेला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारची मुदत संपत असताना या विषयावर मराठी साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, ग्रंथालय संघटना आणि राजकीय पक्षांबरोबरच मराठीप्रेमींनी दबाव आणण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण यांसारख्या दक्षिणेतील राज्यात तेथील मातृभाषा सक्तीने शिकवली जाते. तेलंगणातही असा कायदा होऊन दहा वर्षे झाली, परंतु महाराष्ट्रात केवळ कायदा करू, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात कायदा केला जात नाही. मराठी साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद, मी मराठी संघटना, ग्रंथालय परिषद अशा विविध संस्थांनी एकत्रित येऊन प्रयत्न सुरू केले आहेत. अधिवेशन सुरू असताना आझाद मैदानावर धरणे केल्यानंतर सरकारला दखल घ्यावी लागेल, असेही देशमुख म्हणाले.

...तर मराठी फक्त गरिबांचीच भाषासध्या मराठी शाळामंध्ये मुले पाठविण्याऐवजी इंग्रजी शाळेत पाठविण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे मराठी ही गरिबांची तर इंग्रजी ही श्रीमंतांची आणि ओपिनियन लीडर्सची भाषा ठरेल. त्यामुळे मराठी वाचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. त्यातच केवळ कायदाच नको तर त्याच्या नियमनासाठी मराठी प्राधिकरणदेखील केले पाहिजे. - लक्ष्मीकांत देशमुख, माजी अध्यक्ष, अ. भा. साहित्य संमेलन

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनmarathiमराठी