शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

‘ती’ खाती सोडून बोला !

By admin | Updated: December 1, 2014 03:14 IST

हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेशी युती होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे सांगत असले, तरी पाच विशिष्ट खाती आणि दोन वैधानिक पदे सोडून काय ते बोला, असा प्रस्ताव भाजपाने ठेवला आहे.

संदीप प्रधान, मुंबई हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेशी युती होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे सांगत असले, तरी पाच विशिष्ट खाती आणि दोन वैधानिक पदे सोडून काय ते बोला, असा प्रस्ताव भाजपाने ठेवला आहे. त्यामुळे सत्तेतील शिवसेनेच्या सहभागाचे गाडे पुन्हा अडले आहे.गृह, नगरविकास, गृहनिर्माण, महसूल, ग्रामविकास ही पाच खाती तसेच विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद ही दोन पदे सोडून बाकीचे काहीही मागा, असा प्रस्ताव भाजपाने शिवसेनेसमोर ठेवला आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या सत्तेतील सहभागात अडथळा निर्माण झाला आहे. शिवसेनेने हा प्रस्ताव मान्य केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक होऊन मंत्रिपदे व खाती यांचा निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात आले.विस्तारानंतर १० मंत्री शिवसेनेचे... पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, तेव्हा ही पाच खाती व दोन पदे सोडून उर्वरित खात्यांची मागणी करण्यास सांगितले. भाजपाच्या सरकारमधील मंत्र्यांची संख्या विस्तारानंतर ३२ असेल व त्यापैकी २२ मंत्री भाजपाचे तर १० मंत्री शिवसेनेचे असतील, असेही प्रधान-पाटील यांनी ठाकरे यांना सांगितले.सेनेची धार बोथट करण्याची खेळीहिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या विरोधाची धार बोथट करण्याकरिता चर्चेची नौटंकी भाजपाकडून सुरू करण्यात आलेली आहे. भाजपाच्या नेत्यांनी ‘मातोश्री’वर येऊन कोणती चर्चा केली ते स्वत:हून जाहीर करावे, असे मत शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केले.>शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता स्वीकारली आहे. मंत्रिमंडळ सहभागाबाबत भाजपा सेनेची फसवणूक करीत आहे. १९९५च्या फॉर्म्युलानुसार सत्तेचे वाटप झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.>शिवसेनेतून मात्र प्रखर विरोधभाजपाने काय देतो यापेक्षा काय देणार नाही, असा प्रस्ताव सेनेसमोर ठेवल्याने भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असे शिवसेनेचे नेते सतत सांगत आहेत. भाजपाचा हा नकारात्मक प्रस्ताव मान्य करून उर्वरित खाती स्वीकारण्याची तयारी असेल तरच शिवसेनेचा सत्तेत सहभाग शक्य आहे. तथापि, हा प्रस्ताव स्वीकारण्यास सेनेतून प्रखर विरोध असल्याने शिवसेनेचा सत्ता सहभाग रखडला आहे.अधिवेशनापूर्वी युती - मुख्यमंत्रीसत्तेतील सहभागासंदर्भात शिवसेनेशी बोलणी सुरू आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही धोरणात्मक चर्चा सुरू आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच सेनेशी युती होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जळगाव येथे स्पष्ट केले. > महत्त्वाची सर्व पदे आधीच भरलीविधानसभा अध्यक्षपद यापूर्वीच भरलेले आहे. त्यामुळे ते पद देण्याचा प्रश्न येत नाही. शिवाय उपमुख्यमंत्रिपद निर्माण न करण्याचे पक्षाचे धोरण असल्याने ते पदही देता येणार नाही, असे भाजपाने स्पष्ट केले आहे. राज्यांत गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे असावे हा पक्षाचा आग्रह असल्याने हे खाते देता येणार नाही. नगरविकास-गृहनिर्माण ही खाती मुख्यमंत्र्यांकडेच असणार, ती देणे शक्य नाही. महसूल खाते एकनाथ खडसे यांच्याकडे असल्याने त्याचाही विचार सोडून द्या. ग्रामविकास खाते भाजपाकडेच राहणार आहे, असे भाजपाने सेनेला बजावले.