शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

गळती, चोरी, पाइपफुटीचा फटका

By admin | Updated: April 5, 2017 03:27 IST

वारंवार फुटणारी पाईपलाईन, मोठ्या प्रमाणावर होत असलेली गळती आणि चोरीमुळे वसई विरार परिसरात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

शशी करपे,वसई- वारंवार फुटणारी पाईपलाईन, मोठ्या प्रमाणावर होत असलेली गळती आणि चोरीमुळे वसई विरार परिसरात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या पाणी टंचाईचा फायदा टँकर लॉबीने उचलला असून टँकरचे दर वधारल्याने लोकांचे हाल होऊ लागले आहेत.सध्या वसई विरार शहराला सूर्या, उसगाव, पेल्हार आणि पापडखिंड धरणातून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा होतो. वसईची लोकसंख्या पाहता दररोज आणखी ९० एमएलडीची पाण्याची गरज आहे. हा तुटवडा लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षापासून महापालिका एक दिवस आड पाणी पुरवठा करून शहराची गरज भागवण्याचा प्रयत्न करीत आहे. सूर्याची वाढीव १०० एमएलडी पाणी पुरवठा योजना अंतिम टप्यात आहे. मात्र, त्यातून प्रत्यक्षात पाणी पुरवठा होण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. पण, सध्या पाणी टंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे. विरार येथील पापडखिंड धरण आटल्याने तेथून होणारा १ एमएलडी पाणी पुरवठा बंद झाला आहे. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून सूर्या पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन वारंवार फुटू लागली आहे. त्यातच लोडशेडींगमुळे पंपहाऊसचा वीज पुरवठा खंडीत होणे, दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद करणे असे प्रकार होत आहेत. १५ मार्चला तीन दिवस दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पण, पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी पाच दिवस लागले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी सूर्याची पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा तीन दिवस ठप्प झाला होता. महत्वाची बाब म्हणजे सूर्या पाणी पुरवठा लाईनवर अनेक ठिकाणी लिकेज असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्य पाईपलाईनवरून ज्या गावांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत तेथून टँकरचालक पाणी चोरी करीत आहेत. सध्या वसई विरार परिसरात पाणी टंचाईचे जोरदार चटके जाणवू लागले आहेत. त्याचा फायदा उचलून टँकर लॉबीने आपले दर वाढवून लोकांची अडवणूक सुरु केली आहे. संपूर्ण शहरात सध्या साडे सहाशेहून अधिक टँकर धावू लागले आहेत. त्यापैकी एकट्या नालासोपारा परिसरात साडेतीनशेच्या आसपास टँकर आहेत. पाणी टंचाईचे निमित्त पुढे करीत टँकरचे दर दीड हजार रुपयांपर्यंत जाऊन पोचले आहेत. >जुनाट, गळके, अनफिट टँकरमुळे अपघात वाढले : विरारच्या आरटीओ कार्यालयात फक्त २२५ टँकरची नोंद आहे. काही टँकरची नोंद ठाणे आरटीओ कार्यालयात आहे. ्त्यामुळे शहरात किमान तीनशे टँकर बेकायदेशीरपणे धंदा करीत आहेत. मुंबईत आठ वर्षांपेक्षा जुन्या ट्रकवर बंदी आहे. याच ट्रकवर फेरबदल करून टँकरमध्ये बेकायदेशीर रुपांतर करून वापर केला जात आहे. अनेक टँकर जुनाट, गळके, फिटनेस नसलेले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अधिक फेऱ्यांच्या नादापायी चालक सुसाट टँकर चालवून महिन्याला किमान एकाच बळी घेत आहेत. >पाईपलाईन फुटी गुन्हे दाखल कराकाही वर्षांपूर्वीच नव्याने टाकण्यात आलेली पाईपलाईन फुटत असल्याने पाईपलाईनची गुणवत्ता तपासून अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांनी केली आहे. फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याच्या कालावधीत तात्पुरता पाणी पुरवठा करण्याची कोणतीच योजना महापालिकेकडे नाही. त्यामुळे संपूर्ण वर्षाची एकरकमी पाणी पट्टी भरूनही लोकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या संधीचा फायदा घेऊन टँकर लॉबी जादा दर आकारीत असल्याची तक्रार नाईक यांनी केली आहे.