शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
3
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
4
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
5
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
6
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
8
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
9
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
10
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
11
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
12
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
13
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
14
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
15
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
16
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
17
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
18
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
19
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
20
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचीच सगळीकडे चर्चा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 14:34 IST

भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. अशा स्थितीत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता असून भाजपमध्ये पक्षांतर करणारे नेते पुन्हा एकदा विरोधकांच्या भूमिकेत दिसतील अशी स्थिती आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचं वाढत वर्चस्व आणि लोकसभा निवडणुकीत मोठ्या यशानंतर विरोधीपक्षातील काठावर असलेल्या नेत्यांना भाजपची भुरळ पडली. भाजपने देखील काठावर असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी मोठी मेगाभरती घेतली होती. मात्र राज्यातील बदललेली राजकीय स्थिती पाहता विकासाचा मुद्दा सांगून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.  

काँग्रेस-राष्ट्रवादीतील 30 हून अधिक नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये गेले आहे. यामध्ये विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, जयदत्त क्षीरसागर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील, राणा जगजीतसिंह पाटील, गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील, आदी नेत्यांचा समावेश आहे. 

आधीच पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अनेक नेत्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, वैभव पिचड, जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश आहे. या नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यापैकी बहुतांशी नेत्यांनी विकासाच्या मुद्दावरच आपण सत्ताधारी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. 

दरम्यान भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. अशा स्थितीत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता असून भाजपमध्ये पक्षांतर करणारे नेते पुन्हा एकदा विरोधकांच्या भूमिकेत दिसतील अशी स्थिती आहे. यामुळे विकासाचं कारण सांगणाऱ्या नेत्यांचीच जोरात चर्चा सुरू आहे.