शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

पंतप्रधान पॅकेज वाटून खाणारे कोडगे नेते - मुख्यमंत्री

By admin | Updated: April 27, 2017 19:37 IST

विरोधी पक्षातील आमदार व खासदारांनी सत्तेत असताना पंतप्रधान पॅकेजचे पैसे वाटून खाल्ले. त्यामुळे शेतक-यांच्या आजच्या अवस्थेला तेच जबाबदार असतानाही निर्लजासारखे

ऑनलाइन लोकमत
पिंपरी -चिंचवड, दि. 27 - विरोधी पक्षातील आमदार व खासदारांनी सत्तेत असताना पंतप्रधान पॅकेजचे पैसे वाटून खाल्ले. त्यामुळे शेतक-यांच्या आजच्या अवस्थेला तेच जबाबदार असतानाही निर्लजासारखे संघर्ष यात्रा काढत आहेत. ऐवढे कोडगे नेते कसे काय असू शकतात, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, या संघर्ष यात्रेला उत्तर म्हणून भाजप सरकारकडून राबविण्यात येणा-या उपायोजनांची माहिती थेट शेतक-यांर्पयत पोहचविण्यासाठी संवाद यात्रा काढण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.  
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीचा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात गुरुवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू आदी व्यासपीठांवर उपस्थित होते. 
मुख्यमंत्री यांनी संघर्ष यात्रा काढणा-या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.  संघर्ष यात्रेला नाव दिल्यानं संघर्ष होत नाही. मनापासून संघर्ष करावा लागतो. शेतक-यांच्या आजच्या स्थितीला तेच जबाबदार आहेत. हे जनतेला माहिती असल्याने त्यांच्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे केवळ मोजके कार्यकर्ते घेऊन संघर्ष सुरू आहे. केवळ एअर कंडीशनर गाडीतून फिरून संघर्षयात्रा होत नाही, गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षयात्रेने परिवर्तन घडवलं होतं. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला आमच्या संवाद यात्रेतून उत्तर देण्यात येईल. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेली कामे, शासनाकडून करण्यात येणा-या उपायोजनांची माहिती थेट शेतक-यांच्या शेतीच्या बांधावर व शिवारात जाऊन संवाद साधण्यात येणार आहे. कोणीही एसी बसने प्रवास करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आमदारांना आवाहन केले.  
भाजपा सरकारने जीएसटीसारखा एकच कर पध्दती देशभर सुरू केली आहे. हा कर जास्तीत जास्त 28 टक्के असणार आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यास कोणताही वाव नाही. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम आधार अॅप सुरू केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना केवळ अंगठय़ाच्या आधारे बँकेचे व विविध व्यवहार पारदर्शकपण करता येणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.  
 
तर व्यापा-यांवर फौजदारी गुन्हा...
सद्या तुरीवरून आंदोलन सुरू आहे. मात्र, भाजपा सरकारने देशातील 11 लाख टन खरेदी, एकट्या महाराष्ट्रात 4 लाख टन तुरीची खरेदी केली आहे. आमच्यावर टीका करणारांनी सत्तेत असताना 13 लाख टन तुरीचे उत्पादन असताना केवळ 20 हजार टन तूर खरेदी करून शेतक-यांना रस्त्यावर सोडलं होते. परंतु, आम्ही 22 एप्रिलर्पयत दोनवेळा मुदतवाढ देऊन शेतक-यांच्या तुरीचा शेवटचा दाणाही खरेदी केला आहे. मात्र, शेतक-यांच्या नावानं व्यापारीकरण खपवून घेतलं जाणार नाही. शेतक-यांच्या तुरीचा बोनस व्यापा-यांनी लाटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला. 
 
जनतेपासून तुटल्याने बुरुज ढासळले...
भाजपा सरकारने विकास व विश्वासाचे राजकारण केले. त्यामुळे भाजपाला नागपूरमध्ये सत्तेतून सत्ता आणि लातूरमध्ये शून्यातून सत्ता मिळाली. त्यामुळे भाजपा आता महाराष्ट्रव्यापी पक्ष झाला असून, विरोधी पक्ष हे प्रदेशापुरते उरले आहेत. सत्तेत आल्यानंतर मालक समजू लागल्याने विरोधी पक्षाचे नेते जनतेपासून तुटले. त्यामुळे अनेक नेत्यांचे बुरूज ढासळले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये पवारांचा, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा, सोलापूरात विजयसिंह मोहिते-पाटील, इस्लामपूरला जयंत पाटील आणि सांगलीत पंतगराव कदम यांचे बुरूज ढासळले, तर काहींचे उद्धवस्त झाले. जे अहंकारी झाले, त्यांचा अहंकार जनतेने संपविला आहे. विरोधकांच्या मोगलाईला कंटाळून आपल्याला जनतेने सत्ता दिली आहे. त्यामुळे विजयांचा उन्माद व अहंकार करू नका, असा सल्ला मुख्यमंत्री यांनी दिला. तसेच, भाजपाचे सर्व आमदार, खासदार व जिल्हा परिषद अध्यक्षांनी पारदर्शक कारभार करण्याचे आवाहन केले.