शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लक्ष्मण मानेंनी सुचवला ईव्हीएम यंत्रणेला अडचणीत आणण्याचा अजब पर्याय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:36 IST

लक्ष्मण माने यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आघाडीसोबत आल्यास आपण आपला पक्ष वंचितमध्ये विलीन करू असं माने यांनी म्हटले. त्याचवेळी त्यांनी आपल्याला शिवसेनेचे वावडे नसून प्रबोधनकार ठाकरे आपले गुरू असल्याचे सांगितले.

मुंबई - वंचित बहुजन आघाडीला सोडून स्वत:ची महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी स्थापन करणारे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी भाजप म्हणजे ईव्हीएमचं सरकार असल्याची टीका केली. तसेच ईव्हीएमला अडचणीत आणण्याचा अजब पर्याय माने यांनी सुचवला आहे.

भारतीय जनता पक्षाला ईव्हीएमच्या जोरावर सत्ता मिळाली आहे. ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असून आपला ईव्हीएमला विरोध आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घेतल्यास, निकाल वेगळा राहिल, असा दावाही माने यांनी केला. सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माने यांनी आरएसएसवर देखील टीका केली.

देशाचा कारभार आरएसएसच्या माध्यमातूनच सुरू आहे. आरएसएसकडे आता मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे. त्यामुळे भाजपला पराभूत करणे आता शक्य नाही. त्यामुळे ईव्हीएम हटविणे एकमेव पर्याय आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी ईव्हीएम मतदान प्रक्रियेला अडचणीत आणणे एक पर्याय होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक मतदार संघात १५० ते २०० हून अधिक उमेदवार उभे करावे, असा सल्ला माने यांनी दिला.

दरम्यान माने यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आघाडीसोबत आल्यास आपण आपला पक्ष वंचितमध्ये विलीन करू असं माने यांनी म्हटले. त्याचवेळी त्यांनी आपल्याला शिवसेनेचे वावडे नसून प्रबोधनकार ठाकरे आपले गुरू असल्याचे सांगितले.