शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

लवासा निघाला दिवाळखोरीत; फ्लॅटधारकांना पैसे मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 02:16 IST

बहुचर्चित लवासा प्रकल्प विविध कारणांनी ठप्प पडल्याने दिवाळखोरीत निघाला आहे. त्यामुळे दिवाळखोरी व नादारी संहितेच्या (आयबीसी) नवीन नियमांनुसार फ्लॅटधारकांना त्यांचे पैसे परत मिळू शकतील.

- चिन्मय काळेमुंबई : बहुचर्चित लवासा प्रकल्प विविध कारणांनी ठप्प पडल्याने दिवाळखोरीत निघाला आहे. त्यामुळे दिवाळखोरी व नादारी संहितेच्या (आयबीसी) नवीन नियमांनुसार फ्लॅटधारकांना त्यांचे पैसे परत मिळू शकतील. या नवीन नियमातील हे पहिलेच मोठे प्रकरण आहे.हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीची (एचसीसी) सर्वाधिक (६८.७ टक्के) हिस्सेदारी असलेल्या लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडने पुण्याजवळ निसर्गाच्या सान्निधन्यात सुमारे दिड लाख कोटी रुपयांचा ‘लवासा सिटी’ हा अत्याधुनिक प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली होती. २२०० रहिवासी इमारती, हॉटेल्स, व्हिला आदींचा त्यात समावेश होता. पण पर्यावरण विभागाने परवानगी नाकारल्याने त्यामध्ये बराच अवधी वाया गेला. यादरम्यान प्रकल्पासाठी आर्थिक साहाय्य मिळणेही बंद झाले. रिझर्व्ह बँकेने १२ फेब्रुवारी २०१८ ला कर्जे थकित असलेल्या कंपन्यांच्या पुनर्बांधणीसंबंधी नवीन नियम तयार केला. या नियमांतर्गतही कंपनीने पुनर्बांधणीचा आराखडा बांधला. तो कंपनीला वित्त साहाय्य करणाऱ्यांना देण्यात आला. पण त्यांच्याकडून आराखडा फेटाळण्यात आला. त्यामुळेच आता आयबीसीच्या नवीन नियमांनुसार हे प्रकरण तडीस नेण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.आयबीसीअंतर्गत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडनेच राष्टÑीय कंपनी लवादाकडे याचिका दाखल केली होती. ती याचिका लवादाने स्वीकारली असून आता प्रवर्तकांच्या समितीने कंपनीचा ताबा घेतला आहे. पुढील २७० दिवसात दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण होईल. प्रक्रियेअंती कंपनीच्या मूळ गुंतवणूदारांची हिस्सेदारी कमी होईल. पण हा निर्णय प्रकल्पातनिवासासाठी अथवा अन्य कारणाने गुंतवणूक केलेल्या किरकोळ ग्राहकांच्यादृष्टीने अत्यंत सकारात्मक असेल, असे एचसीसी लिमिटेडचे संचालक व समूह सीईओ अर्जून धवन यांनी मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या नोटीशीत नमूद केले आहे.फ्लॅटधारकांचा असा होईल फायदा‘लवासा सिटी’ साठी लवासा कॉर्पोरेशनने विविध बँकांकडून कर्जे व अन्य संस्थांकडून वित्त साहाय्य घेतले होते. आता कंपनी कायदा लवादामार्फत या कंपनीची अन्य कंपनीकडून खरेदी होईल. त्यामध्ये नवीन कंपनी सर्व कर्जदारांचा पैसा परत करेलच. पण आयबीसीच्या नवीन नियमांतर्गत लवासा रिअल कंपनी असल्याने देणींमध्ये ग्राहकांचा हिस्सासुद्धा असेल.यामुळे या प्रक्रियेनंतर ग्राहकाने फ्लॅटपोटी लवासा कॉर्पोरेशनकडे भरलेली रक्कम त्याला परत मिळू शकेल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र