शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गेल्यावर्षीची थकीत नुकसानभरपाई तीन दिवसांत थेट खात्यात, आर्थिक अडचणीत सापडूनही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 09:20 IST

खरीप पीकविमा योजना; १,९२७ कोटी कंपनीकडे जमा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारने अखेर पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे १,९२७ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन दिवसांत ही रक्कम नुकसानभरपाईसाठी दावा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.. यामुळे नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

या सहाही जिल्ह्यांमध्ये नुकसानभरपाईचे दावे ११० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने बीड पॅटर्ननुसार अतिरिक्त रक्कम राज्य सरकारने देणे आवश्यक होते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून तसेच कृषी विभागाकडूनही राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. पीकविमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानभरपाई असल्यास त्या ठिकाणी ११० टक्क्यांपर्यंत नुकसानभरपाई विमा कंपनी भरते व त्यापुढील नुकसानभरपाई राज्य सरकार देते. या तत्त्वानुसार गेल्या खरीप हंगामातील मंजूर ७ हजार ६२१ कोटी रुपयांपैकी विमा कंपन्यांमार्फत ५ हजार ४६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होते. उर्वरित शिल्लक नुकसानभरपाईपैकी १ हजार ९२७ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचे वाटप प्रलंबित होते.

जिल्हा आणि विम्याची रक्कम (कोटीमध्ये)    नाशिक     ६५६    जळगाव     ४७०     नगर     ७१३    सातारा     २७.७३    चंद्रपूर     ५८.९०    सोलापूर     २.६६

ही रक्कम येत्या तीन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येत आहे.- विनयकुमार आवटे, संचालक, कृषी, पुणे

टॅग्स :Farmerशेतकरी