शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

अडीच वर्षांत राज्यावरील कर्ज फेडू

By admin | Updated: December 2, 2014 00:14 IST

विनोद तावडे : चर्चा करून शैक्षणिक धोरण ठरविणार

कणकवली : शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेईन आणि मग राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवेन, असे सांगून राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. भ्रष्टाचारामुळे यातील बरेचसे कर्ज झाले आहे. आम्ही आहोत तर भ्रष्टाचार होणार नाही आणि विकासही गतिमान होईल. त्यामुळे हे कर्ज येत्या अडीच वर्षांत फेडणे शक्य होईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. जानवली येथील वृंदावन मंगल कार्यालयात संस्था प्रतिनिधींशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, अ‍ॅड. अजित गोगटे, राजन तेली, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उपाध्यक्ष एस. टी. सावंत, हरेश पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू राऊळ, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे, सरचिटणीस प्रमोद रावराणे, जयदेव कदम, चारुदत्त देसाई, काका कुडाळकर, प्रभाकर सावंत, डॉ. अभय सावंत, उपस्थित होते. तावडे म्हणाले, आधीच्या सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांनी आता थोडा धीर धरावा. आम्हाला थोडा वेळ द्यावा, आम्ही शेतकऱ्यांचे चित्र बदलू. दुष्काळी भागात अजित पवारांचे दौरे सुरू असून, त्या भागासाठी कर्ज देण्याची मागणी करत आहेत. मंत्री असताना ते कधी या भागात दिसले नाहीत. सिंधुदुर्गाच्या मातीने अनेकांना मोठे केलं. आम्हाला ज्या मातीने मोठे केले. त्या मातीला कधीच विसरणार नाही. सिंधुदुर्गाचे प्रश्न आपलेपणाने सोडवेन. मंत्रिपदाचा लालदिवा असला तरी कधीही आपल्यामध्ये अंतर पडणार नाही, असे तावडे म्हणाले.विविध संस्थांसमवेत गटचर्चाकार्यक्रम १२.४५ वाजता सुरू झाला. कार्यक्रमात शिक्षणमंत्री तावडे यांचे एकट्याचे भाषण झाले. त्यानंतर तावडे यांनी व्यासपीठावरून खाली येत संस्था प्रतिनिधींच्या गटांशी वेगवेगळी चर्चा केली आणि निवेदने स्वीकारली. स्वच्छतागृहांअभावी शाळा सोडतातराज्यातील शिक्षणक्षेत्राची माहिती घेताना धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सातवीनंतर मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातील ५ टक्के मुली शेतीच्या कामांसाठी म्हणून शाळा सोडतात, पण ९५ टक्के मुली स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने शाळा सोडतात. स्वच्छतागृहांअभावी मुलींना योग्यप्रकारे स्वच्छता ठेवता येत नाही. त्यांना विविध आजाराला तोंड द्यावे लागते. त्यामुळे पालक शिक्षण सोड, पण जीव वाचव, असे सांगून शाळा सोडायला लावतात.