शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

अडीच वर्षांत राज्यावरील कर्ज फेडू

By admin | Updated: December 2, 2014 00:14 IST

विनोद तावडे : चर्चा करून शैक्षणिक धोरण ठरविणार

कणकवली : शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेईन आणि मग राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवेन, असे सांगून राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. भ्रष्टाचारामुळे यातील बरेचसे कर्ज झाले आहे. आम्ही आहोत तर भ्रष्टाचार होणार नाही आणि विकासही गतिमान होईल. त्यामुळे हे कर्ज येत्या अडीच वर्षांत फेडणे शक्य होईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. जानवली येथील वृंदावन मंगल कार्यालयात संस्था प्रतिनिधींशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, अ‍ॅड. अजित गोगटे, राजन तेली, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उपाध्यक्ष एस. टी. सावंत, हरेश पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू राऊळ, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे, सरचिटणीस प्रमोद रावराणे, जयदेव कदम, चारुदत्त देसाई, काका कुडाळकर, प्रभाकर सावंत, डॉ. अभय सावंत, उपस्थित होते. तावडे म्हणाले, आधीच्या सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांनी आता थोडा धीर धरावा. आम्हाला थोडा वेळ द्यावा, आम्ही शेतकऱ्यांचे चित्र बदलू. दुष्काळी भागात अजित पवारांचे दौरे सुरू असून, त्या भागासाठी कर्ज देण्याची मागणी करत आहेत. मंत्री असताना ते कधी या भागात दिसले नाहीत. सिंधुदुर्गाच्या मातीने अनेकांना मोठे केलं. आम्हाला ज्या मातीने मोठे केले. त्या मातीला कधीच विसरणार नाही. सिंधुदुर्गाचे प्रश्न आपलेपणाने सोडवेन. मंत्रिपदाचा लालदिवा असला तरी कधीही आपल्यामध्ये अंतर पडणार नाही, असे तावडे म्हणाले.विविध संस्थांसमवेत गटचर्चाकार्यक्रम १२.४५ वाजता सुरू झाला. कार्यक्रमात शिक्षणमंत्री तावडे यांचे एकट्याचे भाषण झाले. त्यानंतर तावडे यांनी व्यासपीठावरून खाली येत संस्था प्रतिनिधींच्या गटांशी वेगवेगळी चर्चा केली आणि निवेदने स्वीकारली. स्वच्छतागृहांअभावी शाळा सोडतातराज्यातील शिक्षणक्षेत्राची माहिती घेताना धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सातवीनंतर मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातील ५ टक्के मुली शेतीच्या कामांसाठी म्हणून शाळा सोडतात, पण ९५ टक्के मुली स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने शाळा सोडतात. स्वच्छतागृहांअभावी मुलींना योग्यप्रकारे स्वच्छता ठेवता येत नाही. त्यांना विविध आजाराला तोंड द्यावे लागते. त्यामुळे पालक शिक्षण सोड, पण जीव वाचव, असे सांगून शाळा सोडायला लावतात.