शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

अडीच वर्षांत राज्यावरील कर्ज फेडू

By admin | Updated: December 2, 2014 00:14 IST

विनोद तावडे : चर्चा करून शैक्षणिक धोरण ठरविणार

कणकवली : शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेईन आणि मग राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवेन, असे सांगून राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. भ्रष्टाचारामुळे यातील बरेचसे कर्ज झाले आहे. आम्ही आहोत तर भ्रष्टाचार होणार नाही आणि विकासही गतिमान होईल. त्यामुळे हे कर्ज येत्या अडीच वर्षांत फेडणे शक्य होईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. जानवली येथील वृंदावन मंगल कार्यालयात संस्था प्रतिनिधींशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, अ‍ॅड. अजित गोगटे, राजन तेली, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उपाध्यक्ष एस. टी. सावंत, हरेश पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू राऊळ, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे, सरचिटणीस प्रमोद रावराणे, जयदेव कदम, चारुदत्त देसाई, काका कुडाळकर, प्रभाकर सावंत, डॉ. अभय सावंत, उपस्थित होते. तावडे म्हणाले, आधीच्या सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांनी आता थोडा धीर धरावा. आम्हाला थोडा वेळ द्यावा, आम्ही शेतकऱ्यांचे चित्र बदलू. दुष्काळी भागात अजित पवारांचे दौरे सुरू असून, त्या भागासाठी कर्ज देण्याची मागणी करत आहेत. मंत्री असताना ते कधी या भागात दिसले नाहीत. सिंधुदुर्गाच्या मातीने अनेकांना मोठे केलं. आम्हाला ज्या मातीने मोठे केले. त्या मातीला कधीच विसरणार नाही. सिंधुदुर्गाचे प्रश्न आपलेपणाने सोडवेन. मंत्रिपदाचा लालदिवा असला तरी कधीही आपल्यामध्ये अंतर पडणार नाही, असे तावडे म्हणाले.विविध संस्थांसमवेत गटचर्चाकार्यक्रम १२.४५ वाजता सुरू झाला. कार्यक्रमात शिक्षणमंत्री तावडे यांचे एकट्याचे भाषण झाले. त्यानंतर तावडे यांनी व्यासपीठावरून खाली येत संस्था प्रतिनिधींच्या गटांशी वेगवेगळी चर्चा केली आणि निवेदने स्वीकारली. स्वच्छतागृहांअभावी शाळा सोडतातराज्यातील शिक्षणक्षेत्राची माहिती घेताना धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सातवीनंतर मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातील ५ टक्के मुली शेतीच्या कामांसाठी म्हणून शाळा सोडतात, पण ९५ टक्के मुली स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने शाळा सोडतात. स्वच्छतागृहांअभावी मुलींना योग्यप्रकारे स्वच्छता ठेवता येत नाही. त्यांना विविध आजाराला तोंड द्यावे लागते. त्यामुळे पालक शिक्षण सोड, पण जीव वाचव, असे सांगून शाळा सोडायला लावतात.