शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

सरकारला शेवटची विनंती, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पुन्हा संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 10:47 IST

देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांविरोधात काम करणारच. सहा महिन्यात देवेंद्र फडणवीसांवर केलेला आरोप दाखवा असं त्यांनी म्हटलं. 

छत्रपती संभाजीनगर - Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis ( Marathi News ) सरकारला शेवटची विनंती, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका. मराठा समाजाचे पुढचे आंदोलन साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात करा. जनता मालक की सरकार बघूया. मराठा समाजातील वकिलांना विनंती आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांच्यासाठी लढा. वकिलांनी मोफत लढावे, न्यायालयातून जामीन करून घ्या. देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत. तुम्ही सगळ्यांनी शांततेत राहा. मी बघतो काय करायचे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर निशाणा साधला. जरांगे पाटील म्हणाले की,घटनेने आम्हाला मुलभूत स्वातंत्र्य दिलंय, संचारबंदी लागू करता, मराठ्यांविषयी एवढा खूनशीपणा दाखवता. मराठ्यांच्या बाजूने आमदारांनी बोलायला हवे. तुम्ही नेत्यांसाठी बोलताय. पक्षातील नेत्यांसाठी आमदार बोलतायेत, पण मी मराठा समाजासाठी बोलतोय. नेत्यांकडून बोलतायेत, मला दोषी ठरवतायेत. नेत्याला जातीपेक्षा मोठे समजायला लागलेत. तू जातीकडून बोल, नेत्याकडून बोलू नको. चूक केली तर सोडणार नाही. मराठा समाजावर माझी निष्ठा आहे. मी फटकळ बोलतोय असं काहींना वाटेल, पण समाजाविरोधात गेला तर मी बोलतो. मी समाजाला दैवत मानलंय. गोरगरिब मराठा समाजासाठी मी लढतोय. मराठा आणि सत्तेच्या मधला मी अडसर ठरतोय असं सरकारला वाटतो. सगेसोयरे आणि ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आता माझ्याविरोधात बोलायला काहींना सांगितले. नाईलाजास्तव पक्षातील आमदार माझ्याविरोधात बोलतील. पण मराठा समाजाने माझ्यासोबत राहावे. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांविरोधात काम करणारच. सहा महिन्यात देवेंद्र फडणवीसांवर केलेला आरोप दाखवा असं त्यांनी म्हटलं. 

तसेच अंतरवालीतील गुन्हे जाणूनबुजून ठेवलेत. कुठे ना कुठे गौप्यस्फोट करणे गरजेचे होते. संचारबंदी लावायला कापाकापी झाली होती का? कसं लावली? आम्ही दहशतवादी आहोत का? मराठ्यांवर हा अन्याय आहे. मराठ्यांनी घाबरण्याची गरज नाही. आपण कोर्टात जाऊ. काय करायचे ते करू द्या. तुम्ही मराठ्यांची मर्यादा तोडली म्हणून आम्ही बोललो. आम्ही त्यादिवशी पुढे सरकलो असतो, तर पोलिसांनी लाठीचार्ज केला असता. आमच्यासोबत ५ हजार महिला आणि २५ हजार कार्यकर्ते होते. जर काही घडलं असतं तर संपूर्ण राज्य बेचिराख झालं असतं म्हणून आम्ही मागे सरकलो असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. 

दरम्यान, पोलिसांकडून काही झालं असतं तर राज्यातला मराठा पेटून उठला असता. आम्ही शहाणपणाची जबाबदारी घेतली. तुम्ही स्वागत करायला पाहिजे. तुम्ही मराठ्यांचे आमदारसोबत घेतले. १० टक्के आरक्षणाविरोधात लोकांनी कोर्टात धाव घेतली. तुमच्या हातातून वेळ गेली नाही आणखी रोष घेऊ नका. काय गुन्हे दाखल करायचे ते करा, आम्ही न्यायालयातून जामीन घेऊ. तुम्ही जिंकणार नाही, तुम्हाला हा पठ्ठ्या हरवणारच. मराठ्यांना न्याय द्या हीच माझी मागणी आहे असंही जरांगे म्हणाले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस