शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सरकारला शेवटची विनंती, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पुन्हा संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 10:47 IST

देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांविरोधात काम करणारच. सहा महिन्यात देवेंद्र फडणवीसांवर केलेला आरोप दाखवा असं त्यांनी म्हटलं. 

छत्रपती संभाजीनगर - Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis ( Marathi News ) सरकारला शेवटची विनंती, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका. मराठा समाजाचे पुढचे आंदोलन साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात करा. जनता मालक की सरकार बघूया. मराठा समाजातील वकिलांना विनंती आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांच्यासाठी लढा. वकिलांनी मोफत लढावे, न्यायालयातून जामीन करून घ्या. देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत. तुम्ही सगळ्यांनी शांततेत राहा. मी बघतो काय करायचे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर निशाणा साधला. जरांगे पाटील म्हणाले की,घटनेने आम्हाला मुलभूत स्वातंत्र्य दिलंय, संचारबंदी लागू करता, मराठ्यांविषयी एवढा खूनशीपणा दाखवता. मराठ्यांच्या बाजूने आमदारांनी बोलायला हवे. तुम्ही नेत्यांसाठी बोलताय. पक्षातील नेत्यांसाठी आमदार बोलतायेत, पण मी मराठा समाजासाठी बोलतोय. नेत्यांकडून बोलतायेत, मला दोषी ठरवतायेत. नेत्याला जातीपेक्षा मोठे समजायला लागलेत. तू जातीकडून बोल, नेत्याकडून बोलू नको. चूक केली तर सोडणार नाही. मराठा समाजावर माझी निष्ठा आहे. मी फटकळ बोलतोय असं काहींना वाटेल, पण समाजाविरोधात गेला तर मी बोलतो. मी समाजाला दैवत मानलंय. गोरगरिब मराठा समाजासाठी मी लढतोय. मराठा आणि सत्तेच्या मधला मी अडसर ठरतोय असं सरकारला वाटतो. सगेसोयरे आणि ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आता माझ्याविरोधात बोलायला काहींना सांगितले. नाईलाजास्तव पक्षातील आमदार माझ्याविरोधात बोलतील. पण मराठा समाजाने माझ्यासोबत राहावे. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांविरोधात काम करणारच. सहा महिन्यात देवेंद्र फडणवीसांवर केलेला आरोप दाखवा असं त्यांनी म्हटलं. 

तसेच अंतरवालीतील गुन्हे जाणूनबुजून ठेवलेत. कुठे ना कुठे गौप्यस्फोट करणे गरजेचे होते. संचारबंदी लावायला कापाकापी झाली होती का? कसं लावली? आम्ही दहशतवादी आहोत का? मराठ्यांवर हा अन्याय आहे. मराठ्यांनी घाबरण्याची गरज नाही. आपण कोर्टात जाऊ. काय करायचे ते करू द्या. तुम्ही मराठ्यांची मर्यादा तोडली म्हणून आम्ही बोललो. आम्ही त्यादिवशी पुढे सरकलो असतो, तर पोलिसांनी लाठीचार्ज केला असता. आमच्यासोबत ५ हजार महिला आणि २५ हजार कार्यकर्ते होते. जर काही घडलं असतं तर संपूर्ण राज्य बेचिराख झालं असतं म्हणून आम्ही मागे सरकलो असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. 

दरम्यान, पोलिसांकडून काही झालं असतं तर राज्यातला मराठा पेटून उठला असता. आम्ही शहाणपणाची जबाबदारी घेतली. तुम्ही स्वागत करायला पाहिजे. तुम्ही मराठ्यांचे आमदारसोबत घेतले. १० टक्के आरक्षणाविरोधात लोकांनी कोर्टात धाव घेतली. तुमच्या हातातून वेळ गेली नाही आणखी रोष घेऊ नका. काय गुन्हे दाखल करायचे ते करा, आम्ही न्यायालयातून जामीन घेऊ. तुम्ही जिंकणार नाही, तुम्हाला हा पठ्ठ्या हरवणारच. मराठ्यांना न्याय द्या हीच माझी मागणी आहे असंही जरांगे म्हणाले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस